
-
‘शरारत’ लाँचची खास आठवण: क्रिस्टल म्हणाली, “म्हणूनच रणवीर खरे सुपरस्टार!”

क्रिस्टलचा खुलासा: रणवीर सिंग सुपरस्टार का आहेत यामागचे खरे कारण
क्रिस्टल डिसूझासाठी सुपरस्टारडम म्हणजे केवळ प्रसिद्धी किंवा यश नव्हे — तर व्यक्तिमत्त्व, उदारता आणि इतरांना पुढे नेण्याची क्षमता यांचे प्रतीक आहे. अलीकडील एका मुलाखतीत ‘शरारत’ गाण्याच्या लाँचदरम्यान रणवीर सिंगसोबत घालवलेल्या खास क्षणांची आठवण सांगताना क्रिस्टलने स्पष्ट केले की रणवीर खऱ्या अर्थाने सुपरस्टार का आहेत.
त्या दिवशी रणवीरसोबत स्टेज शेअर करण्याबद्दल विचारले असता ती म्हणाली की, तो क्षण पूर्णपणे अनपेक्षित होता. ती म्हणाली, “स्टेजवर जाण्याची कोणतीही योजना नव्हती. जॅस्मिन सँडलास आणि मधुबंती बागची यांनी स्टेजवर गाणे सादर करून ‘शरारत’ लाँच केले. तो फक्त म्युझिक लाँच कार्यक्रम होता; पण त्यांनी गाणे सुरू करताच आम्ही पाहिले की प्रेक्षक त्याच्या तालावर डोलू लागले. त्यांनी ‘शरारत’ पहिल्यांदाच ऐकले होते, तरीही सगळे त्या वाइबमध्ये होते. तेव्हा रणवीर म्हणाले, ‘क्रिस्टल, हे तुझे गाणे आहे. आपण स्टेजवर जाऊन परफॉर्म करायला हवे.’ मी अजिबात तयार नव्हते, कारण मी साडी नेसली होती आणि साडीत नाचता येईल की नाही याची खात्री नव्हती.”
जॅस्मिन सँडलास आणि मधुबंती बागची यांनी आपल्या सादरीकरणाने आधीच वातावरणात उत्साह निर्माण केला होता. तो क्षण ओळखून रणवीरने क्रिस्टलला मंचावर येऊन परफॉर्म करण्यासाठी प्रोत्साहित केले.
क्रिस्टल पुढे म्हणाली, “रणवीरची ऊर्जा अशी आहे की आपण आपोआप त्यांच्या तालात सामील होतो. त्यांनी मधुबंती आणि जॅस्मिनला स्टेजवर पूर्ण वेळ दिला, आणि मग म्हणाले — पुन्हा एकदा करूया, पण यावेळी क्रिस्टलसोबत, कारण हे तिचे गाणे आहे आणि तिने परफॉर्म करायला हवे.” क्रिस्टलसाठी खास गोष्ट केवळ तो अचानक घेतलेला निर्णय नव्हता, तर त्यामागची भावना होती.
ती म्हणाली, “त्यांनी मला स्टेजवर नेले आणि मला मध्यभागी ठेवून परफॉर्म करण्याची संधी दिली. एक अभिनेत्री म्हणून, एक व्यक्ती म्हणून आणि या इंडस्ट्रीचा भाग म्हणून, त्या क्षणी कोणी तुम्हाला महत्त्व देते हे खूप मोठे असते. असे फार क्वचित पाहायला मिळते; म्हणूनच ते सुपरस्टार आहेत आणि आज जिथे आहेत तिथे आहेत. रणवीरला माझ्या गाण्यासाठी मला माझा क्षण मिळावा असे वाटत होते, आणि त्यांनी स्वतःही माझे स्टेप्स करण्याचा पूर्ण प्रयत्न केला. त्यांनी मला सांगितले की ते माझे स्टेप्स कॉपी करतील. त्या क्षणी मला प्रेरणा आणि महत्त्व देण्याचा त्यांचा प्रयत्न खूपच गोड होता.”
या छोट्याशा कृतीतून क्रिस्टलला उमगले की इंडस्ट्रीमध्ये रणवीर सिंग यांच्या उंचीमागील खरे कारण काय आहे. तिच्यासाठी सुपरस्टार असणे म्हणजे — प्रकाश वाटणे, इतरांच्या खास क्षणांची दखल घेणे आणि त्यांना मनापासून साजरे करणे.
या क्षणांव्यतिरिक्त रणवीर सिंग यांनी बॉक्स ऑफिसवरही यशाचे नवे मानदंड प्रस्थापित केले आहेत. अनेक विक्रम मोडून आणि स्वतःची ठळक ओळख निर्माण केल्यानंतर ते आता ‘धुरंधर’सह नव्या टप्प्यावर पोहोचले आहेत. ‘धुरंधर: द रिव्हेंज’मधून ते आणखी उंची गाठण्यासाठी सज्ज आहेत. जर ही चित्रपटसुद्धा त्याच वेगाने पुढे गेला — जसा रणवीरबद्दलचा प्रचंड उत्साह, भारी क्रेझ आणि ‘हमजा’ फिव्हर सूचित करतो — तर ते भारतीय सिनेमात फार थोड्या कलाकारांनी गाठलेल्या बुलंद शिखरांवर पोहोचू शकतात.
-
‘जब्राट’ आनंद देणारा चित्रपट – निर्माती, दिग्दर्शिका प्रगती कोळगे

मनोरंजनासोबतच आशयाची मजबूत जोड देणाऱ्या कलाकृती मराठी चित्रपटसृष्टीत सातत्याने येत आहेत. अशाच एका वेगळ्या आणि उत्साही प्रयत्नातून ‘जब्राट’ या मराठी चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन अमेरिकेत स्थायिक असलेल्या प्रगती कोळगे यांनी केले आहे. परदेशात वास्तव्यास असूनही मराठी भाषा, संस्कृती आणि मातीशी असलेली नाळ त्यांनी घट्टपणे जपली असून त्याचे प्रतिबिंब त्यांच्या सिनेमातून स्पष्टपणे दिसून येते. तारा करमणूक निर्मित ‘जब्राट’ हा चित्रपट येत्या २० फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
आजच्या तरुणाईची कथा
‘जब्राट’ हा चित्रपट आजच्या तरुण पिढीच्या जीवनदृष्टीकोनावर भाष्य करतो. बेधुंद, उत्स्फूर्तपणे जगताना समोर येणाऱ्या प्रश्नांना आत्मविश्वासाने सामोरं जाणारी तरुणाई, त्यांची मैत्री, नाती आणि जीवनाबद्दलची भूमिका या चित्रपटातून प्रभावीपणे मांडण्यात आली आहे. संगीतमय आणि रंगतदार ढंगात पुढे सरकणारी ही कथा केवळ मनोरंजनापुरती मर्यादित न राहता भावनिक पातळीवरही प्रेक्षकांना जोडून ठेवते.
फ्रेश चेहऱ्यांचा प्रामाणिक प्रयत्न
दिग्दर्शिका प्रगती कोळगे सांगतात की, उत्तम देण्याचा प्रयत्न केला तर प्रेक्षकांकडून त्याला तितकाच सकारात्मक प्रतिसाद मिळतो. ‘पल्याडवासी’ या चित्रपटानंतर ‘जब्राट’ हा त्यांचा दुसरा दिग्दर्शकीय प्रयत्न असून या चित्रपटासाठी नव्या चेहऱ्यांची आवश्यकता होती. त्यामुळे ऑडिशन्सद्वारे फ्रेश कलाकारांची निवड करण्यात आली आणि त्यांना अनुभवी कलाकारांची भक्कम साथ देण्यात आली.
मनोरंजनाचा भरगच्च मसाला
लव्ह, म्युझिक, मस्ती आणि डान्स यांचा संतुलित संगम ‘जब्राट’मध्ये पाहायला मिळतो. आजच्या काळात कसं जगायचं, आयुष्यातील नात्यांकडे आणि आव्हानांकडे कशा पद्धतीने पाहायचं, याचा सकारात्मक संदेश हा चित्रपट देतो. त्यामुळे हा सिनेमा प्रत्येक वयोगटातील प्रेक्षकांनी पाहावा, असं आवाहन प्रगती कोळगे यांनी केलं आहे.
नव्या-जुन्या कलाकारांची दमदार फळी
‘जब्राट’ चित्रपटात आयुष संजीव, अनुष्का सरकटे, वनिता खरात, श्रेया शंकर, राहुल चव्हाण, पुण्यकर उपाध्याय, आयली घिया, हिंदवी पाटील, मंदार मोकाशी, डॉ. ऋषभ गायकवाड, सोहम कांबळे, विक्रम आल्हाट आणि प्रगती कोळगे हे नवे चेहरे झळकणार आहेत. त्यांच्यासोबत संजय मोने, सुरेखा कुडची, जयवंत वाडकर आणि गणेश यादव या अनुभवी कलाकारांची उपस्थिती चित्रपटाला अधिक वजन देते.
तांत्रिक बाजू आणि निर्मिती संघ
‘जब्राट’ चित्रपटाचे निर्माते अनिल अरोड़ा, गोविंद मोदी आणि प्रगती कोळगे आहेत. छायांकनाची जबाबदारी अनिकेत खंडागळे यांनी सांभाळली असून संगीत डॉ. जयभीम शिंदे यांचे आहे. सहाय्यक असोसिएट चार्लेस गोम्स असून वेशभूषा युगेशा ओमकार यांनी केली आहे.
प्रेक्षकांवर विश्वास
प्रेक्षकांच्या निखळ मनोरंजनासाठी आणि त्यांना काहीतरी सकारात्मक देण्याच्या उद्देशाने हा वेगळा प्रयत्न केल्याचं प्रगती कोळगे सांगतात. ‘जब्राट’ला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळेल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
-
नव्या मराठी कलाकृतीसाठी मनवा नाईक आणि गौरी कालेलकर-चौधरी एकत्र

सर्जनशील मनं एकत्र आली की कलाकृतीला नवी उंची मिळते, आणि असाच एक सुंदर योग आता मराठी मनोरंजन विश्वात घडतो आहे. निर्माते सिद्धेश चौधरी, गौरी कालेलकर-चौधरी आणि लेखिका-दिग्दर्शिका-अभिनेत्री मनवा नाईक हे तिघे पहिल्यांदाच एका नव्या मराठी चित्रपटासाठी एकत्र येत आहेत. या नव्या कलाकृतीमुळे मराठी चित्रपटसृष्टीत एक वेगळी आणि उत्सुकता वाढवणारी घडामोड घडताना दिसत आहे.
माघी गणेश जयंतीला शुभ मुहूर्त

माघी गणेश जयंतीच्या शुभमुहूर्तावर गणरायाच्या चरणी या आगामी मराठी चित्रपटाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. शुभारंभ शुभदिनी हा क्षण या टीमसाठी नव्या प्रवासाची सुरुवात ठरला आहे. सकारात्मक ऊर्जा, श्रद्धा आणि नव्या आशेने या कलाकृतीचा प्रवास सुरू झाला असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
मधुसूदन कालेलकर प्रोडक्शन्सच्या बॅनरखाली नवा चित्रपट

मधुसूदन कालेलकर प्रोडक्शन्स या बॅनरखाली साकार होणाऱ्या या आगामी मराठी चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन मनवा नाईक करणार आहेत. दमदार संहिता, ताजं कथानक आणि भक्कम टीमवर्कच्या जोरावर ही कलाकृती प्रेक्षकांसाठी खास ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
मनवा नाईक यांचा बहुआयामी कलाप्रवास
अभिनय, दिग्दर्शन आणि निर्मिती अशा विविध क्षेत्रांत मनवा नाईक यांनी आजवर सातत्याने दर्जेदार काम केले आहे. पोर बाजार या चित्रपटाचे दिग्दर्शन, तसेच चूक भूल द्यावी घ्यावी आणि सरस्वती या मालिकांची व वेबसिरीजची निर्मिती त्यांनी केली आहे. अभिनयाच्या बाबतीतही नो एंट्री पुढे धोका आहे, जाऊ द्या ना बाळासाहेब आणि फक्त लढ म्हणा यांसारख्या चित्रपटांमध्ये तसेच हिंदी व मराठी मालिकांमध्ये त्यांनी लक्षवेधी भूमिका साकारल्या आहेत.
गौरी कालेलकर-चौधरी यांचा निर्मिती प्रवास
‘मधुसूदन कालेलकर प्रोडक्शन्स’च्या निर्माती गौरी कालेलकर-चौधरी यांनी यापूर्वी घरत गणपती या गाजलेल्या मराठी चित्रपटाची निर्मिती केली असून ‘एक तिची गोष्ट’ या नृत्यनाटिकेचीही निर्मिती त्यांच्या नावावर आहे. आशयघन आणि वेगळ्या विषयांवरील कलाकृती ही त्यांची ओळख राहिली आहे.
निर्मात्यांचा विश्वास आणि टीमवर्कची ताकद
या नव्या उपक्रमाबद्दल बोलताना गौरी कालेलकर-चौधरी यांनी सांगितले की, एक उत्तम संहिता त्यांच्या हातात आली आणि निर्माती म्हणून ती कलाकृती करावी, अशी मनापासून इच्छा झाली. लेखिका-दिग्दर्शिका म्हणून मनवा नाईक यांनी या प्रवासात ठाम साथ दिली असून, या टीमवर्कमधून प्रेक्षकांना एक दर्जेदार आणि वेगळा अनुभव देण्याचा त्यांना पूर्ण विश्वास आहे.
मराठी प्रेक्षकांसाठी उत्सुकता वाढवणारी कलाकृती
सशक्त टीम, स्पष्ट दृष्टीकोन आणि सर्जनशील मांडणीच्या जोरावर ही नवीन मराठी कलाकृती प्रेक्षकांसाठी निश्चितच उत्सुकता वाढवणारी ठरणार आहे. या चित्रपटाबाबत पुढील घडामोडींकडे आता मराठी रसिकांचे लक्ष लागले आहे.
-
१० वा अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सवात ‘सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक’ हा मानाचा पुरस्कार आलोक जैन यांना ‘सकाळ तर होऊ द्या’ या चित्रपटासाठी प्रदान

१० व्या अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सव (AMFF) २०२६ मध्ये मराठी चित्रपटसृष्टीतील नव्या दिग्दर्शक प्रतिभेचा गौरव करत ‘सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक’ हा मानाचा पुरस्कार दिग्दर्शक आलोक जैन यांना सकाळ तर होऊ द्या या चित्रपटासाठी प्रदान करण्यात आला. कथनशैलीतील वेगळेपणा आणि आशयाची संवेदनशील मांडणी यामुळे ‘सकाळ तर होऊ द्या’ने परीक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेतले.
या पुरस्कारामुळे आलोक जैन हे मराठी चित्रपटसृष्टीतील एक आश्वासक दिग्दर्शक म्हणून अधिक ठळकपणे समोर आले आहेत. त्यांच्या दिग्दर्शनात विषयाची स्पष्टता, व्यक्तिरेखांची मांडणी आणि भावनिक प्रवाह यांचा समतोल जाणवतो, अशी प्रतिक्रिया परीक्षकांनी व्यक्त केली.

अंबर भरारी आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवात फिचर फिल्म्स आणि लघुपटांचे दर्जेदार सादरीकरण पाहायला मिळाले. दिग्गज कलाकारांसोबतच नवोदित कलावंतांनाही व्यासपीठ देणारा हा महोत्सव मराठी चित्रपटसृष्टीसाठी महत्त्वाचा मानला जातो.
भव्य समारोप सोहळ्यात पार पडलेल्या या पुरस्कार वितरणामुळे मराठी चित्रपटसृष्टीतील नव्या प्रयोगशीलतेला आणि नवोदित दिग्दर्शकांना नवी ऊर्जा मिळाल्याचे चित्र दिसून आले.
-
बिग बॉस मराठी सिझन ६ : घरात होणार पहिली वाइल्ड कार्ड एन्ट्री; राखी सावंत!

एंटरटेन्मेंटची त्सुनामी घरात घोंघावणार
“ड्रामा, धक्का आणि धमाका” या तीन शब्दांची एकच ओळख म्हणजे राखी सावंत! आता हीच एंटरटेन्मेंटची वादळी लहर बिग बॉस मराठी सिझन ६ च्या घरात शिरणार आहे. पहिली वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून राखी सावंतची एन्ट्री निश्चित झाली असून, तिच्या आगमनाने घरात आधीच तयार झालेली सगळी समीकरणं, नाती, गटबाजी आणि गैरसमज अक्षरशः हादरून जाणार आहेत.
राखी सावंतची एन्ट्री म्हणजे गेमचं पूर्ण गणित बदलणार

कोणाशी मैत्री करायची, कोणाशी थेट वाद घालायचा, कोणाच्या नसा दाबायच्या आणि कोणाला भावनिक गोंजारायचं — हे सगळं राखीच्या खेळात नेहमीच अनपेक्षित असतं. त्यामुळे तिच्या एन्ट्रीनंतर प्रत्येक स्पर्धकाचा गेम बदलणार हे नक्की. घरात शांतता असेल, असा प्रश्नच उरत नाही. राखी म्हणजे सतत काहीतरी घडत राहणार, अशी हमीच!
‘राखी जाणार आणि गेम पालटणार’ — राखी सावंत
या एन्ट्रीबद्दल बोलताना राखी सावंत म्हणाली की, “राखी जाणार आणि गेम पालटणार. माझ्याशिवाय बिग बॉस अधुरं आहे. मी घरात गेले की सगळ्यांचा आवाज गायब होतो. राखी सावंत घरात जाणार म्हणजे माझीच मर्जी चालणार. मी धम्माल करणार आहे. वेगवेगळे कॉस्च्युम्स, माझा गेम प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. बिग बॉससारखा प्लॅटफॉर्म सगळ्यांना मिळत नाही; मिळाला असेल तर त्याचा उपयोग करून घ्या, हेच माझं म्हणणं आहे.”
रितेश देशमुखांबद्दलही राखीची खास प्रतिक्रिया
राखी पुढे म्हणते की, शोचे होस्ट रितेश देशमुख अमेझिंग आहेत आणि उत्कृष्ट अभिनेते आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात बिग बॉस मराठी लोकप्रिय होत असल्याचा तिला अभिमान वाटतो आणि मराठी प्रेक्षकांसाठीच आपण हा शो करत असल्याचंही तिने ठामपणे सांगितलं.
ड्रामाचा लेव्हल अप, प्रेक्षकांसाठी फुल ऑन धमाका
राखी सावंतचा स्वभाव जितका बिनधास्त, तितकाच बेधडक तिचा खेळ. ती स्वतःच्या अटींवर खेळते आणि वेळ आली तर संपूर्ण घराची दिशा बदलते. त्यामुळे बिग बॉस मराठीच्या घरात राखीची एन्ट्री म्हणजे ड्रामाचं थेट लेव्हल अप ठरणार आहे.
दररोज रात्री ८ वाजता बिग बॉस मराठी सिझन ६
बिग बॉस मराठी सिझन ६ पहा दररोज रात्री ८ वाजता आपल्या लाडक्या Colors Marathi वाहिनीवर आणि कधीही JioHotstar वर.
-
पंचकन्यांचा प्रहार करणार अन्यायाचा संहार, ‘जुळली गाठ गं’ मालिकेत मोठा ट्विस्ट

‘जुळली गाठ गं’ या ‘सन मराठी’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिकेत सध्या प्रेक्षकांसाठी थरारक वळण पाहायला मिळत आहे. सावी आणि धैर्य यांना वेगळं करण्यासाठी दामिनी सातत्याने कट रचत असून, त्याच कटाचा भाग म्हणून सावीच्या आयुष्यात अंगदचा प्रवेश होतो. भाऊंचा विद्यार्थी असल्याचा बनाव करून अंगद स्वतःच्या बिझनेससाठी सावीची मदत घेतो आणि नकळत सावी या प्रकरणात अडकते.
खोटे आरोप आणि सावीची अस्तित्वाची लढाई
अंगदने रचलेल्या डावामुळे सावीवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आणि विनयभंगाचा खोटा आरोप लावण्यात येतो. या गंभीर आरोपांमुळे सावीला अटक होते. मात्र, स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी सावी ही खंबीरपणे कायद्याची लढाई लढत आहे. तिच्या आयुष्यातील हा सर्वात कठीण टप्पा असल्याचं मालिकेत ठळकपणे दाखवण्यात येत आहे.
पंचकन्यांची एकजूट, अन्यायाविरुद्ध संघर्ष
या निर्णायक लढाईत सावीच्या मदतीसाठी ‘सन मराठी’वरील इतर मालिकांमधील महत्त्वाच्या महिला व्यक्तिरेखा एकत्र येणार आहेत. इन्स्पेक्टर मंजू सुरुवातीपासूनच सावीच्या पाठीशी उभी असून, राणी कायद्याच्या चौकटीतून तिला सोडवण्यासाठी ठामपणे लढते आहे. आता अर्पिता, अनुप्रिया आणि वैदेही या तिघींचीही साथ सावीला मिळणार आहे. राणी, मंजू, अर्पिता, अनुप्रिया आणि वैदेही या पंचकन्या एकत्र येऊन सावीला निर्दोष कसं सिद्ध करणार, याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये शिगेला पोहोचली आहे.
महिला सशक्तीकरणाचा प्रभावी संदेश
या विशेष भागाबद्दल सावीची भूमिका साकारणारी अभिनेत्री पायल मेमाणे सांगते की, सावी हे पात्र घराघरात पोहोचलं आहे. लग्नाआधी बेधडक असलेली सावी लग्नानंतर अधिक जबाबदार झाली असली, तरी आज तिच्यावर आलेल्या खोट्या आरोपांमुळे ती स्वतःच्या अस्तित्वासाठी झगडते आहे. महाराष्ट्रात अनेक महिलांवर होणाऱ्या अन्यायाला सामोरं कसं जायचं, हा संदेश मालिकेतून ठळकपणे मांडण्याचा प्रयत्न असल्याचं ती सांगते. विविध मालिकांतील अभिनेत्री एकत्र येऊन अन्यायाविरुद्ध उभ्या राहतात, हे दृश्य प्रेक्षकांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
‘अंतिम निकालाचा टप्पा’ पाहायला विसरू नका
पंचकन्यांचा हा विशेष भाग म्हणजे ‘अंतिम निकालाचा टप्पा’ पाहायला ८ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता आणि सायंकाळी ७ वाजता ‘सन मराठी’वर नक्की पाहा. हा भाग चुकवू नका, अशी विनंती अभिनेत्री पायल मेमाणे यांनी प्रेक्षकांना केली आहे.
-
हास्यजत्रा फेम वनिताचा रापचिक रॅपर अंदाज

वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारत प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री वनिता खरात पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी कारण ठरतोय तिचा हटके आणि धडाकेबाज रॅपर लूक. हा नवा अवतार आगामी मराठी चित्रपट जब्राट मधील असून, तो सध्या सोशल मीडियावर विशेष लक्ष वेधून घेत आहे.
‘जब्राट’मधील वेगळी छटा
‘लोक काय म्हणतील—सोचने का नाय! मनासारखं जगायचं—डरने का नाय!’ असा ठसठशीत संदेश देणारा हा रॅप आत्मविश्वास, स्वातंत्र्य आणि आयुष्याचा फुल-ऑन आनंद साजरा करतो. कॉलेजच्या भावविश्वातील हळवा कप्पा, मैत्रीची धमाल, मस्ती आणि कल्ला—या सगळ्यांची झलक या गाण्यातून उलगडते.
कॉलेज लाइफची धमाल, मैत्रीचा वेध
कॉलेजमधील दोस्ती, एकमेकांशी जपलेली नाती आणि आयुष्यभर टिकणारा बंध—या साऱ्यांचा ऊर्जावान अनुभव गाण्यात दिसतो. वनिताच्या रॅपर स्वॅगमुळे ही मांडणी अधिकच ताजीतवानी वाटते.
गीत-संगीताची टीम
हे रॅप गाणं प्रगती कोळगे यांनी लिहिलं असून राजनंदिनी मगर, प्रगती कोळगे, स्वाती शिंदे आणि शिवानी देशपांडे यांनी आवाज दिला आहे. संगीत डॉ. जयभीम शिंदे यांचे आहे.
निर्मिती आणि तांत्रिक बाजू
तारा करमणूक निर्मित जब्राट चे दिग्दर्शन प्रगती कोळगे यांनी केले आहे. निर्माते अनिल अरोड़ा, गोविंद मोदी आणि प्रगती कोळगे आहेत. छायांकन अनिकेत खंडागळे यांचे असून सहाय्यक असोसिएट चार्लेस गोम्स आहेत. वेशभूषेची जबाबदारी युगेशा ओमकार यांनी सांभाळली आहे.
प्रदर्शनाची तारीख
वनिताचा हा रॅपर अंदाज अनुभवण्यासाठी ‘जब्राट’ येत्या २० फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
-
Reliance’s Jio Studios Acquires Majority Stake in Sikhya Entertainment

Reliance Strategic Business Ventures Limited, a wholly owned subsidiary of Reliance Industries Limited, has acquired a 50.1% equity stake in Sikhya Entertainment Private Limited for an aggregate cash consideration of ₹150 crore. The transaction, completed on 3rd February 2026, involves a mix of primary and secondary investments and further strengthens the media and content ambitions of Jio Studios.
Strengthening Jio Studios’ Leadership in Entertainment
The acquisition reinforces Jio Studios’ position as one of the most influential forces in India’s evolving media and entertainment ecosystem. Over the years, Jio Studios has backed stories with strong creative conviction and commercial scale, connecting Indian content to global audiences. Its recent portfolio includes landmark titles such as Dhurandhar, Laapataa Ladies, and the popular Stree, underscoring its ability to build both blockbuster cinema and critically acclaimed films.
A Strategic Creative Collaboration
The partnership between Jio Studios and Sikhya Entertainment brings together complementary strengths. While Jio Studios contributes scale, global reach, distribution power, and a long-term vision for building enduring intellectual property, Sikhya Entertainment adds its legacy of culturally rooted, globally resonant storytelling. Together, they aim to co-create films and series for audiences in India and across the world.
Sikhya Entertainment’s Global Storytelling Legacy
Founded by Guneet Monga Kapoor and Achin Jain, Sikhya Entertainment has redefined Indian independent cinema over the last decade. It is the only Indian production house to have won both an Academy Award® and multiple National Film Awards, marking a rare blend of global and domestic recognition.
Awards and Acclaimed Films
Sikhya’s Academy Award® wins include Period. End of Sentence. and The Elephant Whisperers. Its National Film Award–winning films span multiple languages, including Masaan, Soorarai Pottru, and Kathal. The production house has also delivered widely celebrated titles such as The Lunchbox, Pagglait, and Kill.
Championing New Talent and Bold Voices
Beyond awards, Sikhya Entertainment is known for discovering and nurturing emerging filmmakers, writers, and actors. Its commitment to performance-driven storytelling and first-time creators has been central to its identity, helping shape defining moments for some of India’s most respected artists across languages and regions.
Jio Studios’ Vision for Global Indian Stories
Speaking on the partnership, Jyoti Deshpande, President – Jio Studios (Media & Content Business, RIL), highlighted that Sikhya has consistently delivered stories that are deeply Indian yet universally relatable. She emphasized that the association reflects Jio Studios’ long-term belief in collaborating with creators who combine creative excellence with cultural authenticity, and expressed confidence that this partnership will help Indian stories reach global audiences at scale.
A Shared Belief in Storytelling Without Borders
Sharing their perspective, Guneet Monga Kapoor and Achin Jain noted that Sikhya has always believed in the power of stories to connect people across cultures, geographies, and languages. They described the partnership with Jio Studios as a natural next step that will allow them to amplify Indian narratives worldwide while continuing to champion new talent from across the country.
Shaping the Next Chapter of Indian Cinema
With this strategic investment, Jio Studios and Sikhya Entertainment come together to build a creator-led, globally ambitious content ecosystem. The collaboration signals a confident, forward-looking phase for Indian cinema—one that is rooted in authenticity, bold in vision, and ready to make a lasting impact on audiences around the world.
-
‘झी’कडून ‘दिलफ्लुएन्सर मूमेंट्स’ची घोषणा

भारतामधील अग्रगण्य कंटेंट आणि टेक्नॉलॉजी पॉवरहाउस Zee Entertainment Enterprises Limited यांनी ‘दिलफ्लुएन्सर मूमेंट्स’ या नव्या मीडिया सोल्यूशनची अधिकृत घोषणा केली आहे. मल्टी-स्क्रीन एंगेजमेंटच्या माध्यमातून सर्जनशील पद्धतीने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणारा हा अभिनव ओम्नी-चॅनल फॉर्मॅट ब्रँड्स आणि मार्केटर्ससाठी एक नवा अध्याय ठरणार आहे.
जाहिरातदारांसमोरील बदलते आव्हान
भारतीय जाहिरात क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर माध्यमांची उपलब्धता वाढली असून, आज कोणत्याही आकाराचे ब्रँड्स सहजतेने जाहिरात जागा खरेदी करू शकतात. मात्र या लोकशाहीकरणामुळे जाहिरातींच्या गर्दीतून उठून दिसण्याचे आव्हान अधिक तीव्र झाले आहे. कमी होत चाललेला अटेंशन स्पॅन आणि वाढती जाहिरात भीड यामुळे केवळ दिसणे पुरेसे राहिले नसून, खऱ्या अर्थाने लक्षात राहणे आणि भावनिक जोड निर्माण करणे हे महत्त्वाचे ठरले आहे.
‘दिलफ्लुएन्सर मूमेंट्स’ – कथाकथन आणि प्रभाव यांचा संगम
या आव्हानाला उत्तर म्हणून ‘झी’ने ‘दिलफ्लुएन्सर मूमेंट्स’ सादर केले आहे. व्यक्तिरेखेला प्राधान्य देणारा आणि मूमेंट-ड्रिव्हन असा हा फॉर्मॅट नैसर्गिक कथाकथनाला व्हायरल एंगेजमेंट आणि मोजता येणाऱ्या ब्रँड इक्विटीमध्ये रूपांतरित करतो. पारंपारिक जाहिरातीप्रमाणे अनुभवात व्यत्यय न आणता, हा फॉर्मॅट ब्रँड्सना प्रेक्षकांना आधीपासूनच आवडत असलेल्या कथानकांमध्ये सहज गुंफतो.
टीव्हीवरील विश्वासातून डिजिटलपर्यंतचा प्रवास
‘झी’च्या लोकप्रिय टेलिव्हिजन व्यक्तिरेखा या ‘दिलफ्लुएन्सर्स’ म्हणून या संकल्पनेत मध्यवर्ती भूमिका बजावतात. टेलिव्हिजनवर निर्माण झालेला विश्वास पुढे नैसर्गिकरित्या डिजिटल, सोशल मीडिया आणि क्रिएटर इकोसिस्टमपर्यंत विस्तारतो. त्यामुळे ब्रँड इंटिग्रेशन जबरदस्तीचे न वाटता कथानकाचा अविभाज्य भाग भासते.
‘दिलफ्लुएन्सर मूमेंट्स’चे चार प्रमुख स्तंभ
या फॉर्मॅटचा पाया चार महत्त्वाच्या स्तंभांवर आधारित आहे. व्यक्तिरेखांवर आधारित प्रामाणिकता ब्रँड संदेशांना भावनिक आणि सांस्कृतिक संदर्भ देते. टेलिव्हिजनमधून निर्माण होणारा विश्वास पुढे डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर नेला जातो. कथानकातील संकेतांमधून नैसर्गिक व्हायरॅलिटी तयार केली जाते, तर प्लॅटफॉर्म-अॅग्नॉस्टिक वितरणामुळे एकाच वेळी अनेक माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर पोहोच साधली जाते.
केस स्टडी : ‘तुम हो लव्हली’ कॅम्पेन
‘दिलफ्लुएन्सर मूमेंट्स’चा पहिला मोठा प्रयोग राष्ट्रीय कन्या दिनानिमित्त राबवण्यात आलेल्या “जब लाईफ को लेती हो लाईटली तो लगती हो और भी लव्हली” या कॅम्पेनमधून करण्यात आला. हिंदी आणि मराठी मालिकांमध्ये सहज गुंफलेल्या या मूमेंट्सनी टीव्हीवरून डिजिटल आणि सोशल प्लॅटफॉर्म्सपर्यंत अवघ्या २४ तासांत नैसर्गिक प्रवास केला. सान्या मल्होत्रा यांच्यासह तयार करण्यात आलेल्या ब्रँड फिल्ममुळे हा संदेश अधिक प्रभावी ठरला.
आकड्यांतून दिसणारे यश
या कॅम्पेनने २५ मिलियनहून अधिक इम्प्रेशन्स, सुमारे २.५ मिलियन एंगेजमेंट्स आणि हजारहून अधिक अर्थपूर्ण संभाषणे निर्माण केली. टीव्ही, झी५ आणि डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर झालेली ही व्यापक पोहोच या फॉर्मॅटची ताकद अधोरेखित करते.
‘झी’ नेतृत्वाची भूमिका
झी एंटरटेनमेंट एंटरप्राईजेस लिमिटेडच्या अॅडव्हर्टाईजमेंट रेव्हेन्यू, ब्रॉडकास्ट अँड डिजिटलच्या प्रमुख लक्ष्मी शेट्टी यांच्या मते, आज जाहिरातदारांना सांस्कृतिकदृष्ट्या कमावलेले आणि भावनिकदृष्ट्या प्रामाणिक वाटणारे मूमेंट्स आवश्यक आहेत. तर चीफ मार्केटिंग ऑफिसर कार्तिक महादेव यांच्या मते, केवळ पोहोच नव्हे तर ‘जिव्हाळा’ निर्माण करणे हेच खरे वेगळेपण ठरणार आहे, आणि ‘दिलफ्लुएन्सर मूमेंट्स’ हेच ते बदल घडवणारे माध्यम आहे.
मार्केटर्ससाठी स्पष्ट निष्कर्ष
ज्या काळात पोहोच खरेदी करणे सोपे झाले आहे, त्या काळात योग्य कथा आणि भावनिक जोडच ब्रँडला लक्षात राहण्यास मदत करते. ‘दिलफ्लुएन्सर मूमेंट्स’ हे ब्रँड्सना सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाच्या कथानकांमध्ये नैसर्गिकरीत्या गुंफून, टिकाऊ ब्रँड प्रेम आणि भावनिक इक्विटी निर्माण करण्याचे एक प्रभावी माध्यम म्हणून पुढे येत आहे.
-
शैलेश दातारांचा निडर पोलीस अवतार

विविध माध्यमांतून सातत्याने वैविध्यपूर्ण भूमिका करणारे अभिनेते शैलेश दातार आता एका महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखेत प्रेक्षकांसमोर येत आहेत. ६ फेब्रुवारीला प्रदर्शित होणाऱ्या केस नं. ७३ या चित्रपटात ते एसपी संजय देशमुख या जिगरबाज आणि कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहेत.
प्रामाणिक अधिकारी, कठीण परीक्षा
एसपी संजय देशमुख यांनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीत अत्यंत प्रामाणिकपणे काम केले आहे. त्यांच्या सेवाकाळात एकही गुन्हा आजवर अनसॉल्व्ह राहिलेला नाही. प्रामाणिकपणा, कर्तृत्व आणि सरळ स्वभावामुळे संजय देशमुख गावात लोकप्रिय आहेत. मात्र, ऐन निवृत्तीच्या उंबरठ्यावर असतानाच त्यांच्या हाती एक अत्यंत गुंतागुंतीचा खटला येतो. ही केस सोडवण्याचं प्रचंड दडपण त्यांच्यावर येतं आणि प्रत्येक क्षण त्यांच्यासाठी कसोटीचा ठरतो.
सस्पेन्सने भरलेला थरार

धागेदोरे मिळत नाहीत, संशय वाढत जातो आणि एकामागोमाग घडणाऱ्या घटनांमुळे कथानक अधिकच गूढ बनतं. धाडस, शिस्त आणि प्रामाणिकपणाचा प्रत्यय देणारी ही भूमिका चित्रपटाला वेगळी कलाटणी देणारी ठरणार आहे. कथेमधील सस्पेन्स प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा असल्याचं संकेत मिळतात.
निर्मिती आणि दिग्दर्शन
लायलॅक मोशन पिक्चर्स आणि डस्क स्टुडिओज निर्मित केस नं. ७३ या चित्रपटाचं दिग्दर्शन डॉ. मिलिंद मुक्तेश्वर आपटे यांनी केलं आहे. चित्रपटाची निर्मिती शर्वरी सतीश वटक आणि डॉ. मिलिंद मुक्तेश्वर आपटे यांनी केली असून सहनिर्माते प्रविण अरुण खंगार आहेत.
अभिनेत्यांचा अनुभव, भूमिकेचं आव्हान
“जिगरबाज पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारायला मिळणं हे माझ्यासाठी नक्कीच आव्हानात्मक होतं. एकामागोमाग होणाऱ्या खूनांचा आणि त्यामागच्या गुन्हेगाराचा मागोवा घेताना निर्माण होणारं गूढ प्रेक्षकांना चित्रपटात अनुभवता येईल,” असं शैलेश दातार सांगतात.
तगडी स्टारकास्ट
शैलेश दातार यांच्यासोबत अशोक शिंदे, राजसी भावे, नंदिता पाटकर आणि पियुष आपटे अशी तगडी स्टारकास्ट या चित्रपटात दिसणार आहे. ६ फेब्रुवारीपासून हा थरारक अनुभव प्रेक्षकांना चित्रपटगृहात अनुभवता येणार आहे.
