
-
राधिका सुभेदारची ‘सनई चौघडे’मध्ये एन्ट्री; जय खानोलकरच्या ऑफिसमध्ये घडणार मोठे बदल

झी मराठीवरील ‘सनई चौघडे’ मालिका सध्या एका रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. जय आणि शर्वरी यांच्या आयुष्यात आता एका अशा व्यक्तीची एन्ट्री होणार आहे, जिने संपूर्ण महाराष्ट्राच्या घराघरात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेतून लोकप्रिय झालेली राधिका सुभेदार आता *‘सनई चौघडे’*मध्ये दिसणार असून अभिनेत्री अनिता दाते पुन्हा एकदा ही गाजलेली भूमिका साकारताना पाहायला मिळणार आहेत.
पुन्हा एकदा राधिका सुभेदार बनताना अनिता दाते भावूक
या भूमिकेबद्दल बोलताना अनिता दाते म्हणाल्या की, “पुन्हा एकदा राधिका सुभेदार साकारताना मला जुन्या आठवणींना उजाळा मिळाल्यासारखं वाटत आहे. २०१६ ते २०२१ या काळात मी या व्यक्तिरेखेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत होते. आजही लोक मला ‘राधिका’ म्हणूनच ओळखतात. ही भूमिका माझ्यासाठी खूप खास आहे.”
त्या पुढे म्हणाल्या की, ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेने त्यांचं आयुष्य बदललं आणि अभिनेत्री म्हणून वेगळी ओळख मिळवून दिली. “राधिका सुभेदारने मला फक्त प्रसिद्धी दिली नाही, तर आत्मविश्वासही दिला,” असं त्या सांगतात.
जय खानोलकरच्या ऑफिसमध्ये महिलांसाठी उघडणार नवी दारं

मालिकेत जय खानोलकरच्या ऑफिसमध्ये महिलांना फारसं स्थान नसल्याचं आतापर्यंत पाहायला मिळालं आहे. मात्र राधिकाच्या एन्ट्रीनंतर या वातावरणात मोठे बदल घडताना दिसणार आहेत. शर्वरीला पुन्हा कंपनीत स्थान मिळवून देण्यासाठी राधिका पुढाकार घेणार असून, तिच्या सकारात्मक दृष्टिकोनामुळे कथेला नवं वळण मिळणार आहे.
‘राधिका’ अनेक महिलांसाठी ठरली प्रेरणा
राधिका सुभेदार या व्यक्तिरेखेने अनेक महिलांना प्रेरणा दिल्याचं अनिता दाते यांनी सांगितलं. “अनेक महिलांनी स्वतःचे छोटे व्यवसाय सुरू केले आणि त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या. त्या भेटल्यावर सांगतात की हा राधिका सुभेदारचा प्रभाव आहे. हे ऐकून खूप समाधान वाटतं,” असं त्या म्हणाल्या.
‘सनई चौघडे’मध्ये येणार सकारात्मक बदल
झी मराठीसोबतचं आपलं नातं खूप खास असल्याचं सांगताना अनिता दाते म्हणाल्या की, “झी मराठीने नेहमीच स्त्री व्यक्तिरेखा सन्मानाने मांडल्या आहेत. ‘सनई चौघडे’ची टीम खूप छान आहे आणि मालिकेत राधिकाच्या येण्यामुळे एक सकारात्मक आणि मनोरंजक बदल प्रेक्षकांना पाहायला मिळेल.”
प्रेक्षकांसाठी ठरणार उत्सुकतेचा भाग
राधिका सुभेदार जय खानोलकरच्या ऑफिसमध्ये येऊन नेमके कोणते बदल घडवून आणते आणि शर्वरीच्या आयुष्यात कोणती नवी दिशा निर्माण होते, हे पाहणं प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचं ठरणार आहे.
पहा ‘सनई चौघडे’ दररोज रात्री ८ वा. फक्त झी मराठीवर.
-
स्वानंदीचा भाबडेपणा जपत तेजश्री प्रधानने साकारला ‘ड्रंक सीन’
मराठी मालिकांमधील नायिकांच्या भूमिका अनेकदा ठरावीक चौकटीत अडकलेल्या दिसतात. मात्र आता झी मराठीवरील ‘वीण दोघातली ही तुटेना’ या मालिकेत प्रेक्षकांना एक वेगळं वळण पाहायला मिळणार आहे. मालिकेतील स्वानंदी म्हणजेच अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने नुकताच एक खास ‘ड्रंक सीन’ शूट केला असून, त्यामागचा अनुभव तिने अत्यंत मोकळेपणाने शेअर केला आहे.

‘नायिकेची प्रतिमा जपत हा सीन करणं मोठं आव्हान होतं’

या सीनबद्दल बोलताना तेजश्री म्हणाली की, कलाकार म्हणून अशा भूमिका साकारणं हे खूप आव्हानात्मक असतं. “जेव्हा तुम्ही नायिकेची भूमिका करता, तेव्हा तुमच्यावर एक वेगळी जबाबदारी असते. प्रेक्षकांच्या मनात त्या व्यक्तिरेखेची एक प्रतिमा तयार झालेली असते. त्यामुळे कोणताही सीन करताना त्या प्रतिमेचं भान ठेवणं खूप महत्त्वाचं असतं,” असं ती म्हणाली.
स्वानंदीच्या चौकटीबाहेर जाण्याची संधी
तेजश्रीच्या मते, हा सीन स्वानंदीच्या नेहमीच्या स्वभावापेक्षा पूर्णपणे वेगळा होता. दारू प्यायल्यानंतर मिळणाऱ्या त्या तात्पुरत्या मोकळेपणातून स्वानंदी स्वतःला व्यक्त करताना दिसणार आहे. “स्वानंदीसाठी असा सीन लिहिला गेला आहे हे समजल्यावर मला खूप आनंद झाला. कारण नायिकांच्या वाट्याला अनेकदा साचेबद्ध गोष्टीच येतात. पण या निमित्ताने काहीतरी वेगळं करण्याची संधी मिळाली,” असं ती सांगते.
‘माझे ड्रिंक करणारे मित्रच माझं इन्स्पिरेशन’

खऱ्या आयुष्यात आपण ड्रिंक करत नसल्याचं सांगताना तेजश्री म्हणाली की, “मित्रमंडळींसोबत बाहेर गेल्यावर मी त्यांची ड्रायव्हर बनते. त्यामुळे त्यांचं निरीक्षण करण्याची मला संधी मिळते. ते कसे बोलतात, कसे वागतात हे मी बारकाईने पाहत असते. अशा सीन्ससाठी तेच माझं इन्स्पिरेशन ठरतात.”
ती पुढे म्हणाली की, यापूर्वीही एका मराठी चित्रपटात तिने अशाच प्रकारचा सीन केला होता आणि त्या भूमिकेसाठी तिला पुरस्कारही मिळाला होता.
‘स्वानंदीचा भाबडेपणा कायम ठेवणं महत्त्वाचं होतं’

या सीनमध्ये स्वानंदीच्या मूळ स्वभावाला धक्का लागू नये, याची विशेष काळजी घेण्यात आल्याचं तेजश्रीने स्पष्ट केलं. “प्रेक्षक ज्या स्वानंदीवर प्रेम करतात, तिचा भाबडेपणा कुठेही कमी होऊ नये याचं भान लेखक आणि दिग्दर्शकांनी खूप छान ठेवलं आहे,” असं ती म्हणाली.
‘टिपिकल रडणारी नायिका नाही’
स्वानंदीच्या व्यक्तिरेखेची एक खास गोष्ट म्हणजे तिला टिपिकल रडणारी नायिका दाखवलेलं नाही, असं तेजश्री सांगते. “तिच्यासोबत काही घडलं तर ती प्रश्न विचारते. स्वतःची मतं मांडते. या ‘ड्रंक सीन’मुळे तिला जिथे एरवी व्यक्त होता आलं नसतं, तिथे मोकळेपणाने बोलण्याची संधी मिळाली,” असं ती म्हणाली.
प्रेक्षकांना पाहायला मिळणार स्वानंदीचं वेगळं रूप
या खास प्रसंगामुळे मालिकेत भावनिक आणि मनोरंजक वळण येणार असून, स्वानंदीचं हे वेगळं रूप प्रेक्षकांना नक्कीच आवडेल, अशी अपेक्षा तेजश्री प्रधानने व्यक्त केली आहे.
पहा ‘वीण दोघातली ही तुटेना’ दररोज संध्याकाळी ७.१५ वा. फक्त झी मराठीवर.
-
पारंपरिक लग्न पद्धतीला आधुनिक काळाचा तडका देणारा ‘कप बशी’

मराठी चित्रपटसृष्टीत सध्या वेगळ्या आणि मनोरंजक कथानकांवर आधारित चित्रपटांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. अशातच आता पारंपरिक लग्न पद्धतीला आधुनिक विचारांची जोड देणारा ‘कप बशी’ हा नवा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित करण्यात आला असून, त्यामधून एक वेगळी आणि खुसखुशीत कौटुंबिक कथा पाहायला मिळणार असल्याची झलक समोर आली आहे. येत्या १९ जून रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
अनोख्या अटीवर आधारित भन्नाट कथा

भारतीय विवाह पद्धतीत मुलगा आणि मुलगी यांच्या पत्रिका जुळवण्याची परंपरा आजही अनेक घरांमध्ये पाहायला मिळते. मात्र ‘कप बशी’मध्ये या पारंपरिक विचारांना एक भन्नाट ट्विस्ट देण्यात आला आहे. लग्नासाठी होकार देण्याआधी नवरी मुलगी आपल्या होणाऱ्या सासूसमोर एक वेगळीच अट ठेवते — सासू आणि सुनेची पत्रिका जुळली पाहिजे! या अटीमुळे निर्माण होणारा गोंधळ, विनोदी प्रसंग आणि कौटुंबिक नात्यांमधील रंगतदार घडामोडी चित्रपटात पाहायला मिळणार आहेत.
टीजरमधून वाढली उत्सुकता

चित्रपटाचा टीजर प्रेक्षकांच्या उत्सुकतेत भर घालणारा ठरत आहे. हलक्याफुलक्या शैलीत मांडलेली कथा, खुसखुशीत संवाद आणि कौटुंबिक मनोरंजनाचा बाज यामुळे टीजरला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे पूजा सावंत आणि ऋषी मनोहर ही नवी जोडी या चित्रपटातून पहिल्यांदाच एकत्र झळकणार असून, त्यांची केमिस्ट्रीही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे.
तगडी कलाकारांची फळी
‘कप बशी’मध्ये अभिनेत्री निर्मिती सावंत, पूजा सावंत, ऋषी मनोहर, नयना आपटे, अनंत जोग, राहुल रानडे, आनंद इंगळे, आनंद काळे, चिन्मय शिंत्रे आणि उमा सरदेशमुख यांच्या प्रमुख भूमिका आहेत. अनुभवी कलाकारांसोबत नव्या कलाकारांचीही दमदार साथ या चित्रपटाला लाभली आहे.
तांत्रिक बाजूही ठरणार खास
सुकल्प चित्र निर्मित या चित्रपटाचे निर्माते कल्पक सदानंद जोशी आहेत. बिग ब्रेन प्रॉडक्शन्सचे निलेश रामगोपाल राठी यांनी चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. चेतन सैंदाणे यांनी पटकथा आणि संवाद लिहिले असून दिग्दर्शनाची धुरा वैभव रामकृष्ण चिंचाळकर यांनी सांभाळली आहे.
विशेष म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीला प्रथमच ज्येष्ठ संगीतकार उत्तम सिंग यांचे संगीत या चित्रपटाच्या निमित्ताने लाभले आहे. गीतलेखन गुरु ठाकूर यांनी केले असून छायांकन बाळू दहिफळे यांनी केले आहे. संकलन आशिष म्हात्रे, ध्वनी संयोजन राष्ट्रीय पुरस्कार विजेते मंदार कमलापूरकर, तर लूक डिझायनर म्हणून राष्ट्रीय पुरस्कार विजेते श्रीकांत देसाई यांनी काम पाहिले आहे. नृत्य दिग्दर्शन दीपाली विचारे, कला दिग्दर्शन महेश कुडाळकर आणि प्रोजेक्ट हेड म्हणून चिन्मय शिंत्रे यांनी जबाबदारी सांभाळली आहे.
मनोरंजनासोबत नात्यांवर हलकंफुलकं भाष्य
आजच्या आधुनिक काळातही परंपरा, पत्रिका आणि लग्न जुळवण्याच्या संकल्पना समाजात महत्त्वाच्या मानल्या जातात. त्याच विषयावर हलक्याफुलक्या पद्धतीने भाष्य करत ‘कप बशी’ हा चित्रपट कौटुंबिक मनोरंजनाची मेजवानी घेऊन येणार आहे. विनोद, नाती आणि आधुनिक विचारांची सांगड घालणारा हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एक वेगळा अनुभव ठरणार आहे.
-
नव्या दमाच्या कलाकारांसह रंगणार ‘जोडीचा मामला’

मराठी रंगभूमी सध्या नव्या विचारांनी, तरुण ऊर्जेने आणि समकालीन विषयांनी समृद्ध होताना दिसत आहे. बदलत्या काळानुसार नातेसंबंध, सामाजिक वास्तव आणि आजच्या पिढीच्या भावविश्वावर आधारित नवे प्रयोग रंगभूमीवर पाहायला मिळत आहेत. जुन्या-जाणत्या कलाकारांसोबत नव्या कलाकारांनाही व्यासपीठ मिळत असून, त्यातून मराठी नाटकांना एक वेगळीच ताजेपणाची झळाळी प्राप्त होत आहे. अशाच नव्या दमाच्या कलाकारांना घेऊन ‘दृष्टी’ आणि ‘अद्वैत थिएटर्स’ निर्मित ‘जोडीचा मामला’ हे दोन अंकी विनोदी नाटक आता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
पत्रकार परिषदेत सचिन पिळगांवकरांची उपस्थिती
या नाटकाची पत्रकार परिषद नुकतीच उत्साहात पार पडली. या वेळी प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माता सचिन पिळगांवकर यांनी विशेष उपस्थिती लावत नाटकाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या. नव्या कलाकारांच्या सहभागामुळे मराठी रंगभूमीला नवी ऊर्जा मिळेल आणि हा बदल नाट्यव्यवसायासाठी अत्यंत सकारात्मक असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं.
‘Black & White कुटुंबाची सप्तरंगी गोष्ट!’
‘जोडीचा मामला’ या नाटकाची टॅगलाईनच प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारी आहे — ‘Black & White कुटुंबाची सप्तरंगी गोष्ट!’ आजच्या तरुणाईचा आत्मकेंद्रित दृष्टिकोन, बदलती सामाजिक मानसिकता आणि त्याचा कुटुंबावर होणारा परिणाम यावर हे नाटक उपरोधिक आणि विनोदी शैलीत भाष्य करतं. मनोरंजनासोबतच विचार करायला भाग पाडणारा हा रंगमंचीय प्रयोग असल्याचं सांगितलं जात आहे.
राहुल भंडारे आणि श्रेयस इंदापूरकर यांची नवी संकल्पना
निर्माते राहुल भंडारे म्हणाले, “आजच्या तरुण पिढीचे विचार, त्यांच्या नात्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि कुटुंबातील बदलती समीकरणं यावर हलक्याफुलक्या शैलीत भाष्य करणारे नाटक प्रेक्षकांसमोर आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. नव्या कलाकारांना व्यासपीठ देत दर्जेदार मनोरंजन सादर करण्याचा प्रयत्न प्रेक्षकांना नक्की आवडेल.”
दिग्दर्शक श्रेयस इंदापूरकर म्हणाले, “‘जोडीचा मामला’ करताना आम्ही विनोदाच्या माध्यमातून आजच्या समाजातील वास्तव मांडण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येक पात्र प्रेक्षकांना कुठे ना कुठे स्वतःशी जोडून घेईल. मनोरंजनासोबत विचार करायला भाग पाडणारं हे नाटक प्रत्येक वयोगटाला भावेल.”
दमदार कलाकारांची फळी
या नाटकात योगेश कदम, प्राची कात्रे, पायल साळुंके, वैभव महाले, विशाल दुराफे, अश्विनी माळी, विनायक जाधव, प्रदीप कसबे, श्वेता काजळे, अभिजीत पाटसकर, आकाश राठोड, दुर्गेश लांडगे आणि श्रेयस इंदापूरकर हे कलाकार प्रमुख भूमिकांमध्ये झळकणार आहेत.
नाटकाचे लेखन आणि संगीत चैतन्य कुलकर्णी यांचे असून दिग्दर्शन श्रेयस इंदापूरकर यांनी केले आहे. निर्मिती राहुल भंडारे आणि श्रेयस इंदापूरकर यांनी केली आहे. नेपथ्य संदेश बेद्रे, प्रकाशयोजना शीतल तळपदे, नृत्यदिग्दर्शन ऋषीकेश देसाई यांनी सांभाळले आहे. तसेच अवधूत गुप्ते, श्रद्धा आपटे-केळकर आणि युगंधर देशमुख यांच्या आवाजाने नाटकातील गाण्यांना विशेष रंग चढला आहे. रंगभूषा उलेश कंधारे तर वेशभूषा प्राची कात्रे आणि श्रद्धा हांडे यांनी केली आहे.
प्रयोगांचे वेळापत्रक
‘जोडीचा मामला’चा शुभारंभ प्रयोग शुक्रवार १५ मे रोजी दुपारी ४.३० वाजता गडकरी रंगायतन, ठाणे येथे रंगणार आहे. त्यानंतर शनिवार १६ मे रोजी रात्री ८.३० वाजता आचार्य अत्रे नाट्यगृह, कल्याण, रविवार १७ मे रोजी दुपारी १२ वाजता विष्णुदास भावे नाट्यगृह, वाशी, मंगळवार १९ मे रोजी दुपारी ४ वाजता शिवाजी मंदिर, दादर आणि रविवार ३१ मे रोजी दुपारी ४ वाजता यशवंत नाट्यगृह, माटुंगा येथे प्रयोग होणार आहेत.
-
‘घबाडकुंड’मध्ये स्मिता पायगुडे अंजुटे यांची रहस्यमयी एन्ट्री! 👁️✨

अनुभवी थिएटर आर्टिस्ट आणि कुशल मेकअप आर्टिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्मिता पायगुडे अंजुटे आता ‘घबाडकुंड’ चित्रपटातून एका गूढ आणि थरारक भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत 👀🔥
चित्रपटात त्या ‘रंगी’ ही व्यक्तिरेखा साकारत असून, ब्लॅक मॅजिकच्या जगात वावरणारी ही भूमिका कथानकाला वेगळाच थरार देणार आहे 😨✨
“नजरेत धग अन् रग हिच्या अंगी, भल्या-भल्यांना घाम फोडते… नाव हिचं रंगी…!” ही टॅगलाईन सध्या विशेष चर्चेत आहे 💥निर्माते रसिक कदम आणि दिग्दर्शक प्रीतम एस. के. पाटील यांच्या महत्त्वाकांक्षी संकल्पनेतून साकारलेला ‘घबाडकुंड’ हा चित्रपट १९ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे 🎬👻
#GhabadKund #SmitaPaygudeAnnjute #MarathiMovie #MarathiCinema #marathireels #batamiwala
-
१४ वर्षांनंतर पुन्हा परतले शेखर सुमन; ‘शेखर टुनाइट’मधून पुन्हा अनुभवायला मिळणार संवादांची जादू

भारतीय मनोरंजनविश्वात संवाद, विनोद आणि खास शैलीमुळे वेगळी ओळख निर्माण करणारे अभिनेते आणि सूत्रसंचालक शेखर सुमन तब्बल १४ वर्षांनंतर पुन्हा एकदा नव्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. ‘शेखर टुनाइट’ या नव्या शोमधून ते पुन्हा संवादांची जादू अनुभवायला देणार असून, या शोचा फर्स्ट लूक आणि ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे.
आजच्या डिजिटल युगात बहुतांश संवाद हे आधीच ठरवलेले किंवा फक्त व्हायरल होण्यासाठी तयार केलेले असतात. मात्र ‘शेखर टुनाइट’मध्ये प्रेक्षकांना खरे, मनापासून आणि नैसर्गिक संवाद अनुभवायला मिळणार आहेत. या शोमध्ये मुलाखतींपेक्षा व्यक्तींमधील भावना, अचानक उमटणारा हशा आणि कॅमेऱ्याचं भान विसरून होणाऱ्या गप्पांना अधिक महत्त्व दिलं जाणार आहे.
जुन्या आठवणींना पुन्हा उजाळा

मोठ्या आउटडोअर कॅम्पेन आणि डिजिटल लॉन्चद्वारे या शोची घोषणा करण्यात आली. त्यामुळे शेखर सुमन यांना पाहत मोठं झालेल्या प्रेक्षकांच्या जुन्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या आहेत. पॉडकास्ट आणि डिजिटल टॉक शो लोकप्रिय होण्याच्या खूप आधी शेखर सुमन यांनी भारतीय टेलिव्हिजनवर संवादाची वेगळी शैली निर्माण केली होती. त्यांची विनोदबुद्धी, उपरोध आणि सहज संवाद साधण्याची कला आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे.
हा शो संगानी ब्रदर्स आणि कॉबल्ड स्ट्रीट यांच्या बॅनरखाली तयार करण्यात आला असून, पूर्णपणे अनस्क्रिप्टेड आणि नैसर्गिक संवादांवर आधारित आहे.
‘हा फक्त इंटरव्ह्यू शो नाही’ — शेखर सुमन
आपल्या पुनरागमनाबद्दल बोलताना शेखर सुमन म्हणाले की, “माझ्यासाठी ‘शेखर टुनाइट’ हा फक्त सेलिब्रिटी इंटरव्ह्यू शो नाही. हा खऱ्या भावना आणि नैसर्गिक संवादांचा प्रवास आहे. आपल्याला कायम लक्षात राहतात ते अचानक आलेले हसू, शांत क्षण आणि लोक जेव्हा स्वतःसारखे वागतात ते क्षण. मला नेहमी वाटतं की सगळ्यात सुंदर संवाद तेव्हाच होतात जेव्हा लोक कॅमेऱ्याचं भान विसरतात.”
अध्ययन सुमनसाठी खास भावनिक प्रवास
हा शो तयार करणारे अध्ययन सुमन म्हणाले की, “हा शो माझ्यासाठी अत्यंत खास आणि भावनिक प्रवास आहे. हा केवळ एका शोचं पुनरागमन नाही, तर एका काळाचा आणि एका आवाजाचा पुनर्जन्म आहे. लहानपणापासून मी बाबांची संवादशैली आणि त्यांची जादू जवळून पाहिली आहे. इतक्या वर्षांनंतर त्यांना पुन्हा त्याच आत्मविश्वासाने पाहणं खूप आनंददायी आहे.”
त्यांनी निर्माता धर्मेश संघानी आणि संपूर्ण टीमचेही विशेष आभार मानले.
चित्रपट, राजकारण, संगीत आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवर सहभागी होणार
‘शेखर टुनाइट’मध्ये चित्रपट, राजकारण, संगीत, क्रीडा, व्यवसाय आणि संस्कृती क्षेत्रातील अनेक प्रसिद्ध व्यक्ती सहभागी होणार आहेत. विनोद, भावना, उपरोध आणि मनमोकळ्या संवादांचा संगम असलेला हा शो डिजिटल प्रेक्षकांसाठी खास तयार करण्यात आला आहे.
आजच्या कृत्रिम आणि स्क्रिप्टेड संवादांच्या काळात, प्रामाणिक आणि मनापासून होणाऱ्या गप्पांचा अनुभव देणारा ‘शेखर टुनाइट’ प्रेक्षकांसाठी वेगळा ठरणार आहे.
-
‘प्रत्येक रंगाची एक किंमत आहे!’ ZEE5 ने लॉन्च केला ‘सतरंगी – बदले का खेल’चा दमदार ट्रेलर

हिंदी ZEE5 वर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत असलेली ‘सतरंगी – बदले का खेल’ ही वेब मालिका सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. अंशुमन पुष्कर, कुमुद मिश्रा आणि महवश यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या मालिकेचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला असून, ग्रामीण उत्तर प्रदेशच्या सरंजामी राजकारण, सूड आणि सत्तासंघर्षाची थरारक झलक यात पाहायला मिळत आहे. जय बसंतू सिंह दिग्दर्शित आणि आरएनडी फिल्म एलएलपी निर्मित ही मालिका २२ मे रोजी ZEE5 वर प्रदर्शित होणार आहे.
बबलू महतोच्या दुहेरी आयुष्याची कथा
‘सतरंगी – बदले का खेल’मध्ये बबलू महतो ही व्यक्तिरेखा केंद्रस्थानी आहे. लौंडा नाच कलाकाराचा मुलगा म्हणून अपमान आणि दुर्लक्ष सहन करत वाढलेल्या बबलूला समाजात टिकून राहण्यासाठी वेगळाच मार्ग स्वीकारावा लागतो. जात, सत्ता आणि प्रतिष्ठेने विभागलेल्या जगात तो ‘बबलू’ आणि ‘लल्ली’ अशा दुहेरी ओळखीत जगताना दिसतो.
दोन प्रभावशाली कुटुंबांमधील संघर्ष, सत्ता मिळवण्यासाठीचे डावपेच आणि सूडातून सुरू झालेली मोठी लढाई ही मालिकेची मुख्य बाज ठरणार आहे.
लौंडा नाच परंपरेचा वेगळा संदर्भ
या मालिकेची आणखी एक खास गोष्ट म्हणजे ‘लौंडा नाच’ या पारंपरिक उत्तर भारतीय लोककलेची पार्श्वभूमी. ग्रामीण भागात पुरुष कलाकार महिलांचे वेश परिधान करून सादरीकरण करतात, त्या लोककलेला या मालिकेतून वेगळ्या आणि संवेदनशील दृष्टिकोनातून मांडण्यात आलं आहे.
ही केवळ सादरीकरणाची कला नसून ओळख, पुरुषत्व, प्रतिष्ठा आणि अस्तित्वाचा संघर्ष दाखवणारा महत्त्वाचा भाग असल्याचं मालिकेतून दिसून येतं.
सूड, सत्ता आणि मानसिक खेळ
दिग्दर्शक जय बसंतू सिंह यांच्या मते, ही कथा फक्त सूडाची नाही तर व्यवस्थेमध्ये राहून ती मोडण्याची आहे. बबलूची दुहेरी ओळख त्याला समाजातील वेगवेगळ्या स्तरांमध्ये प्रवेश मिळवून देते आणि तिथूनच त्याच्या खेळाची खरी सुरुवात होते.
अभिनेता अंशुमन पुष्कर म्हणतो की, बबलू हा बाहेरून दुर्लक्षित वाटणारा पण आतून अत्यंत बुद्धिमान आणि परिस्थिती समजून घेणारा माणूस आहे. त्याचं दुहेरी आयुष्यच त्याची सर्वात मोठी ताकद ठरतं.
२२ मेपासून ZEE5 वर
ग्रामीण राजकारण, सूड, सत्ता, भावनिक संघर्ष आणि सामाजिक वास्तव यांचा संगम असलेली ‘सतरंगी – बदले का खेल’ ही मालिका २२ मे २०२६ पासून ZEE5 वर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
-
‘प्रत्येक रंगाची एक किंमत आहे!’ ZEE5 ने लॉन्च केला ‘सतरंगी – बदले का खेल’चा दमदार ट्रेलर

हिंदी ZEE5 वर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत असलेली ‘सतरंगी – बदले का खेल’ ही वेब मालिका सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. अंशुमन पुष्कर, कुमुद मिश्रा आणि महवश यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या मालिकेचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला असून, ग्रामीण उत्तर प्रदेशच्या सरंजामी राजकारण, सूड आणि सत्तासंघर्षाची थरारक झलक यात पाहायला मिळत आहे. जय बसंतू सिंह दिग्दर्शित आणि आरएनडी फिल्म एलएलपी निर्मित ही मालिका २२ मे रोजी ZEE5 वर प्रदर्शित होणार आहे.
बबलू महतोच्या दुहेरी आयुष्याची कथा
‘सतरंगी – बदले का खेल’मध्ये बबलू महतो ही व्यक्तिरेखा केंद्रस्थानी आहे. लौंडा नाच कलाकाराचा मुलगा म्हणून अपमान आणि दुर्लक्ष सहन करत वाढलेल्या बबलूला समाजात टिकून राहण्यासाठी वेगळाच मार्ग स्वीकारावा लागतो. जात, सत्ता आणि प्रतिष्ठेने विभागलेल्या जगात तो ‘बबलू’ आणि ‘लल्ली’ अशा दुहेरी ओळखीत जगताना दिसतो.
दोन प्रभावशाली कुटुंबांमधील संघर्ष, सत्ता मिळवण्यासाठीचे डावपेच आणि सूडातून सुरू झालेली मोठी लढाई ही मालिकेची मुख्य बाज ठरणार आहे.
लौंडा नाच परंपरेचा वेगळा संदर्भ
या मालिकेची आणखी एक खास गोष्ट म्हणजे ‘लौंडा नाच’ या पारंपरिक उत्तर भारतीय लोककलेची पार्श्वभूमी. ग्रामीण भागात पुरुष कलाकार महिलांचे वेश परिधान करून सादरीकरण करतात, त्या लोककलेला या मालिकेतून वेगळ्या आणि संवेदनशील दृष्टिकोनातून मांडण्यात आलं आहे.
ही केवळ सादरीकरणाची कला नसून ओळख, पुरुषत्व, प्रतिष्ठा आणि अस्तित्वाचा संघर्ष दाखवणारा महत्त्वाचा भाग असल्याचं मालिकेतून दिसून येतं.
सूड, सत्ता आणि मानसिक खेळ
दिग्दर्शक जय बसंतू सिंह यांच्या मते, ही कथा फक्त सूडाची नाही तर व्यवस्थेमध्ये राहून ती मोडण्याची आहे. बबलूची दुहेरी ओळख त्याला समाजातील वेगवेगळ्या स्तरांमध्ये प्रवेश मिळवून देते आणि तिथूनच त्याच्या खेळाची खरी सुरुवात होते.
अभिनेता अंशुमन पुष्कर म्हणतो की, बबलू हा बाहेरून दुर्लक्षित वाटणारा पण आतून अत्यंत बुद्धिमान आणि परिस्थिती समजून घेणारा माणूस आहे. त्याचं दुहेरी आयुष्यच त्याची सर्वात मोठी ताकद ठरतं.
२२ मेपासून ZEE5 वर
ग्रामीण राजकारण, सूड, सत्ता, भावनिक संघर्ष आणि सामाजिक वास्तव यांचा संगम असलेली ‘सतरंगी – बदले का खेल’ ही मालिका २२ मे २०२६ पासून ZEE5 वर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
-
‘द महाराष्ट्र फाईल्स’च्या म्युझिक लाँचची जोरदार चर्चा; कलाकार आणि गायकांनी रंगवला भव्य सोहळा

शासकीय कार्यालयांमधील भ्रष्टाचार, राजकीय हस्तक्षेप आणि शेतकरी कुटुंबाच्या न्यायासाठीच्या संघर्षावर आधारित ‘द महाराष्ट्र फाईल्स’ हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. चित्रपटाच्या पोस्टरनंतर आता त्याच्या भव्य म्युझिक लाँच सोहळ्याने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. वास्तवाशी जोडलेली गाणी, दमदार कलाकारांची उपस्थिती आणि संगीताच्या ठेक्यावर रंगलेला जल्लोष यामुळे हा सोहळा विशेष ठरला.
वास्तववादी आशयाची गाणी ठरली चर्चेचा विषय
चित्रपटातील प्रत्येक गाणं समाजातील अन्याय, संघर्ष आणि वास्तव मांडणारं असल्याचं या सोहळ्यात स्पष्टपणे जाणवलं. संगीत अनावरणासाठी अजय गोगावले, आनंद शिंदे, वैशाली माडे, राजा हसन यांच्यासह नितीन सावंत, अजित आणि सिद्धार्थ कश्यप उपस्थित होते.
‘मार तू शिक्का’ या गाण्याच्या सादरीकरणावेळी सपना चौधरी हिने गाण्याच्या हुकस्टेपवर ठेका धरत कार्यक्रमात उत्साह निर्माण केला. या गाण्याचे बोल सुशील राठोड, विनायक पवार आणि दिपक अंगेवार यांनी लिहिले असून संगीत नितीन सावंत आणि अंबरीश यांनी दिलं आहे. आनंद शिंदे, अंबरीश आणि वैशाली माडे यांनी हे गाणं गायले आहे.
‘मन पाखरू’पासून ‘शांताबाई’पर्यंत गाण्यांची रंगली चर्चा
चित्रपटातील ‘मन पाखरू’ हे भावनिक गाणं गुरु ठाकूर यांनी लिहिलं असून संगीत नितीन सावंत यांनी दिलं आहे. अजय गोगावले यांच्या आवाजामुळे या गाण्याला विशेष भावनिक बाज मिळाली आहे.
तर गौतमी पाटीलवर चित्रित झालेलं ‘छम्मो’ हे गाणंही चर्चेचा विषय ठरलं. सखील आझमी लिखित या गाण्याला सिद्धार्थ कश्यप यांनी संगीत दिलं असून साक्षी होळकर आणि राजा हसन यांनी ते गायले आहे.
याशिवाय ‘कती तू बंजारा’ आणि सनी लिओनीवर चित्रित झालेलं ‘शांताबाई’ हे गाणंही विशेष चर्चेत राहिलं.
दमदार कलाकारांच्या उपस्थितीने रंगला सोहळा
या संगीत अनावरण सोहळ्याला उषा नाडकर्णी, मंगेश देसाई, सयाजी शिंदे, नागेश भोसले, गौतमी पाटील आणि सपना चौधरी यांच्यासह चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती.
दिग्दर्शक आणि निर्माते संजीवकुमार राठोड यांनी चित्रपटाच्या सामाजिक आशयाविषयी माहिती दिली, तर उषा नाडकर्णी यांनी आपल्या भूमिकेबद्दल बोलताना चित्रपटातील वास्तववादी मांडणीचं कौतुक केलं.
२९ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला
सामाजिक वास्तव, भ्रष्ट व्यवस्थेविरोधातील संघर्ष आणि भावनिक आशय असलेली गाणी यामुळे ‘द महाराष्ट्र फाईल्स’बद्दलची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत आहे. येत्या २९ मे २०२६ रोजी हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.
-
ZEE5 वर १५ मे रोजी ‘तिघी’चा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर; भावनिक कौटुंबिक नाट्य आता जगभरातील प्रेक्षकांच्या भेटीला

चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षक आणि समीक्षकांकडून भरभरून कौतुक मिळवलेल्या Tighi या मराठी चित्रपटाचा आता वर्ल्ड डिजिटल प्रीमियर होणार आहे. ZEE5 च्या वतीने १५ मे २०२६ रोजी हा चित्रपट जगभरातील प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, भावनिक नात्यांची गुंतागुंत मांडणाऱ्या या कथेला डिजिटल माध्यमातून आणखी व्यापक पोहोच मिळणार आहे.
कौटुंबिक नात्यांमधील न बोललेलं सत्य उलगडणारी कथा
दिग्दर्शिका Jijivisha Kale यांच्या दिग्दर्शनातील हा पहिलाच चित्रपट असून, सुप्री अॅडव्हर्टायझिंग अँड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. ‘तिघी’ ही कथा तीन स्त्रियांच्या नात्यांभोवती फिरते आणि त्यांच्या आयुष्यातील शांतता, दडपलेल्या भावना आणि न बोललेले संघर्ष यांचा संवेदनशील वेध घेते.
चित्रपटात स्वाती रानडे-कर्णिक ही मध्यवर्ती व्यक्तिरेखा आहे, जी मुंबईतील स्थिर आयुष्य जगत असताना अचानक भूतकाळासमोर उभी राहते. तिची विभक्त आई हेमलता रानडे आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यावर असल्याचं समजताच ती पुण्यातील आपल्या जुन्या घरी परतते. तिथे तिची भेट धाकटी बहीण सारिकाशी होते आणि त्यानंतर तीन स्त्रियांच्या नात्यातील ताण, राग, अपराधीपणा आणि भावनिक संघर्ष हळूहळू उलगडत जातो.
दमदार कलाकारांचा प्रभावी अभिनय
चित्रपटात Bharati Achrekar, Neha Pendse आणि Sonali Kulkarni यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. त्यांच्यासोबत Nipun Dharmadhikari, Jaimini Pathak, Pushkaraj Chirputkar, Suvrat Joshi, Mrunmayee Godbole आणि Sanjay Mone यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.
या कलाकारांच्या प्रभावी अभिनयामुळे चित्रपटाला भावनिक सखोलता आणि वास्तववादी स्पर्श मिळाला आहे.
भावनांचा प्रामाणिक प्रवास
चित्रपटाबद्दल बोलताना ZEE5 मराठीच्या बिझनेस हेड हेमा व्ही. आर. यांनी सांगितलं की, मानवी नात्यांमधील भावनिक सत्य मांडणाऱ्या कथा सादर करण्यासाठी ZEE5 कटिबद्ध आहे आणि ‘तिघी’ ही त्याच दिशेने एक महत्त्वाची कलाकृती आहे.
दिग्दर्शिका जीजिवीशा काळे यांनीही या चित्रपटाला अत्यंत वैयक्तिक आणि भावनिक कथा असल्याचं सांगत, प्रामाणिकपणे कथा मांडण्याचा प्रयत्न केल्याचं नमूद केलं.
नेहा पेंडसे बायस यांनी स्वातीच्या व्यक्तिरेखेतील भावनिक वजन आणि नात्यांमधील असुरक्षिततेबद्दल भाष्य केलं, तर सोनाली कुलकर्णी यांनी ‘सारिका’ ही जबाबदाऱ्यांमध्ये अडकलेली आणि भावना दडपून जगणारी स्त्री असल्याचं सांगितलं.
१५ मे रोजी डिजिटल प्रीमियर
आई-मुलींचं नातं, बहिणींचे संघर्ष आणि न बोललेल्या भावनांचा गुंता मांडणारा ‘तिघी’ हा चित्रपट १५ मे २०२६ रोजी ZEE5 वर वर्ल्ड डिजिटल प्रीमियरसह प्रदर्शित होणार आहे. भावनिक, वास्तववादी आणि अंतर्मुख करणारा हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एक वेगळा अनुभव ठरणार आहे.
