
-
अजित दादांच्या आठवणी…प्रशांत साजणीकर, सह व्यवस्थापकीय संचालक, दादासाहेब फाळके चित्रनगरी

पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री, कामाला लागलेली यंत्रणा
दादा पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री झाले आणि त्यांनी सगळी पक्षयंत्रणा जोमाने कामाला लावली. पक्षाच्या सर्व मंत्र्यांनी आठवड्यातून एक दिवस सर्वसामान्य नागरिक आणि पक्ष कार्यकर्त्यांना पक्ष कार्यालयात भेटावे, असे आदेश दिले. त्याआधी अशी पद्धत नव्हती. सर्वांनी एक-एक दिवस वाटून घेतला. बहुतांश मंत्र्यांनी साधारण दुपारी मंत्री कार्यालयात भेटीची वेळ देण्याचे निश्चित केले.
गुरुवारी सकाळी आठ—अवाक करणारा निर्णय
बुधवारी मंत्रीमंडळ बैठक होत असे. दादांनी स्वतःसाठी गुरुवार निवडला. गुरुवारी दुपारी कितीची वेळ द्यावी, असे विचारायला गेलो असता दादा म्हणाले—सकाळी ८ वाजता. आम्ही सगळे अवाक झालो. मुंबईत इतक्या सकाळी कोण येणार? पण दादा ठाम होते. तसे पक्ष कार्यालयास कळवले. पुढच्याच गुरुवारी सकाळी ७ वाजता चर्चगेटच्या पक्ष कार्यालयात पोहोचलो, तर पाय ठेवायला जागा नव्हती. राज्याच्या दूरदूरच्या ग्रामीण भागातून लोक रांगा लावून उभे होते. त्यानंतर प्रत्येक गुरुवारी ही गर्दी वाढतच गेली.
लोकांसाठी योग्य ठरलेली वेळ
लोक सकाळी सहापासून रांगा लावत आणि दादा सात वाजल्यापासून असंख्य लोकांना भेटून त्यांची कामे मार्गी लावत. रात्रभर प्रवास करून सकाळी लवकर भेट मिळणे किती सोयीचे आहे, असे अनेकजण सांगत. सकाळी लवकर वेळ देण्याचा दादांचा निर्णय किती योग्य होता, याची ठाम जाणीव झाली.
प्रशासनाची विलक्षण जाण आणि पकड
दादांना प्रशासनाची इतकी उत्तम जाण होती की कोणते काम होईल-नाही, हे क्षणार्धात ते ओळखत. काम होणार नसेल तर तसे स्पष्ट सांगत आणि होणार असेल तर कोणाला फोन करायचा, बैठक ठेवायची की कागदावर रिमार्क देऊन काम कसे होईल—निर्णय तिथल्या तिथे घेत. राज्य प्रशासनातील अधिकारी कोणत्या पदावर आहेत आणि त्यांच्या नेमक्या जबाबदाऱ्या काय आहेत, याचे त्यांना नेमके भान असे; सचिव, कलेक्टर किंवा एसपी कोण आहे, हे सांगावे लागत नसे. कोणत्याही प्रसंगात संभ्रम किंवा द्विधा अवस्था त्यांच्यात कधी पाहिली नाही.
कार्यतत्पर कर्मयोगी
सतत कार्यमग्न राहणे हा दादांचा अलौकिक गुण. दिवस-रात्र काम करूनही थकवा न दाखवणे, बैठका-दौरे-गाठीभेटी यात अखंड व्यस्तता—हे त्यांच्या कामाचे स्वरूप. कोणतीही बैठक ३० मिनिटांपेक्षा जास्त चालत नसे आणि त्यात निर्णय होत. अधिकारी असोत, राजकारणी वा कार्यकर्ते—कामाव्यतिरिक्त गप्पांत रमलेले त्यांना कधी पाहिले नाही.
कामच ओळख, प्रसिद्धीपासून अंतर
उपमुख्यमंत्रीपदाच्या काळात सोशल मीडियाचा उदय होत होता. छोटी कामे करून मोठी प्रसिद्धी मिळवण्याचा तो काळ; पण दादांनी हा मार्ग स्वीकारला नाही. “माझे काम हीच माझी ओळख,” असे ते नेहमी सांगत. सुरुवातीला पत्रकारांपासूनही ते अंतर ठेवत. तरी त्यांच्या सहवासात आलेला लहान-मोठा प्रत्येकजण त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने प्रभावित होत असे. इमेज बिल्डिंगसाठी कोणत्याही एजन्सीची गरज त्यांना कधीच लागली नाही; कार्यमग्नता आणि कामाचा धडाका यामुळेच त्यांची प्रतिमा घडली.
वेळेचा आदर
वक्तशीरपणा हा दादांचा आणखी एक ठळक गुण. त्यामुळे अधिकारी आणि मंत्री बैठकीच्या आधी वेळेवर हजर राहत. दौर्यांवेळी अनेकदा राजकारण्यांच्या उशिरामुळे पायलट तक्रार करतात; दादांच्या दौर्यांत मात्र सकाळी ७ च्या टेकऑफला ते ६.३०लाच पोहोचत असल्याने पायलट अडचणीत पडत, अशी गंमत घडत असे.
स्वच्छता, टापटीप आणि दर्जा
दादांकडे सर्वत्र स्वच्छता आणि टापटीप दिसत असे. काम करताना ते अनेकदा पेन्सिल वापरत; तिचे टोकही नेहमी धारदार असे. कचरा दिसला तर स्वतः उचलत आणि समोरच्याची कानउघाडणी करत. दर्जात तडजोड त्यांना मान्य नव्हती. इमारत बांधकामात फरश्या कुठल्या रंगाच्या, याबाबतही अधिकारी त्यांचा सल्ला घेत. झाडांची त्यांना विशेष आवड; घर आणि कार्यालयात हिरवाई असायची.
विशेष कार्य अधिकारी म्हणून चार वर्षे
मी चार वर्षे दादांकडे विशेष कार्य अधिकारी म्हणून काम केले. सुरुवातीला त्यांच्या कडक शिस्तीमुळे दडपण आले; पण एकदा विश्वास बसला की काम करणे सोपे होत असे, कारण सूचना अत्यंत स्पष्ट असत. दौर्यांची आखणी माझ्याकडे असे.
अहमदाबादचा अनपेक्षित थांबा
एकदा दिल्लीतील महत्त्वाची बैठक उरकून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांसह शासकीय विमानाने मुंबईला परतत होते. रात्री मुंबईत मुसळधार पाऊस होता. विमानातून फोन आला—पावसामुळे मुंबईत लँडिंग शक्य नाही; विमान अहमदाबादकडे वळवले आहे. तातडीने प्रोटोकॉलची सोय केली. अचानक उतरावे लागल्याने चिंता होती; पण विमान सुखरूप उतरल्यावर सगळ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला.
मंत्रालयातील आग—एक वेदनादायी आठवण
त्या चार वर्षांत एकदाच दादांना हताश झालेले पाहिले—मंत्रालयाला लागलेल्या भीषण आगीत. दादांना अक्षरशः हाताला धरून बाहेर काढले गेले; पण दुर्दैवाने बारामतीचे दोन जण आत अडकले. दादांनी जळत्या इमारतीखाली उभे राहून अग्निशमन दलाला सूचना दिल्या; तरीही त्यांचे प्राण वाचले नाहीत. दुसऱ्या दिवशी घड्याळ आणि चेनवरून ओळख पटली. आगीतून दादे वाचले; पण त्या घटनेने त्यांना खोलवर हादरवले.
कराडचा प्रवास आणि धुक्याचा अडथळा
उपमुख्यमंत्री झाल्यावर पहिल्यांदाच कराडला जाण्याचा प्रसंग. दरवर्षी २५ नोव्हेंबरला कराड येथील प्रीतिसंगमावर स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित राहतात. त्या वेळी दादा मुंबईहून विमानाने, तर मुख्यमंत्री पुण्याहून हेलिकॉप्टरने येणार होते. कराड विमानतळ लहान आणि धुक्याने झाकलेला. सातत्याने हवामानाची माहिती घेतली. विमान वेळेत उडाले; पण धुक्यामुळे लँडिंग शक्य न झाल्याने विमान मुंबईला परतले—सुखरूप.
मन हेलावणारी ओळ
दादा, कालसुद्धा तुमचे विमान परत सुखरूप यायला हवे होते….
(लेखक सन २०१० ते २०१४ या काळात अजित पवार यांचे विशेष कार्य अधिकारी म्हणून कार्यरत होते.)
-
Dhurandhar Continues Its Winning Run with Netflix Premiere

From Box Office Juggernaut to Global Streaming Stage
Mumbai, 30 January: Dhurandhar didn’t just close 2025 on a triumphant note—it stormed into 2026 by rewriting box office history. With India net collections crossing an unprecedented ₹1000 crore, the film emerged as the highest-earning single-language Hindi film in India. Riding high on this historic success, Dhurandhar has now premiered on Netflix, taking its cinematic spectacle to audiences across the world.
A Director’s Vision That Defined the Big Screen Experience
Directed by Aditya Dhar, Dhurandhar stood apart in theatres for its ambitious narrative scale and assured storytelling. Dhar’s vision combined sharp political undertones, high-octane drama, and larger-than-life moments, making the film not just a commercial giant but also a conversation starter.
Powerhouse Performances and a Memorable Face-Off
At the heart of the film’s impact were the performances—particularly the much-talked-about face-off between Ranveer Singh and Akshaye Khanna. Their contrasting screen energies became one of the defining highlights of the film. Supporting them was a formidable ensemble featuring R. Madhavan, Sanjay Dutt, Arjun Rampal, Sara Arjun, and Rakesh Bedi, each adding depth and intensity to the film’s narrative canvas.
Now Streaming in Multiple Languages
Expanding its reach further, Dhurandhar is available not only in Hindi but also in Tamil and Telugu, exclusively on Netflix. This multilingual release underscores the film’s crossover appeal and its ability to connect with audiences beyond linguistic boundaries.
Netflix on Dhurandhar’s Cultural Impact
Speaking about the film’s arrival on the platform, Monika Shergill, VP – Content, Netflix India, described Dhurandhar as a true pop-culture moment. She highlighted how the film captured imagination at scale and expressed excitement about bringing it to viewers in over 190 countries, calling it a bold, ambitious cinematic vision crafted by Aditya Dhar and produced by Jio Studios and B62 Studios.
Aditya Dhar on the Film’s New Chapter
Reflecting on the journey, director Aditya Dhar shared that the overwhelming theatrical response was deeply humbling. With the Netflix release, he views Dhurandhar as entering a new phase—one where global audiences can discover its layers, revisit its moments, and engage with the story at their own pace.
Producers on Breaking Barriers and Raising the Bar
Producer Jyoti Deshpande, President – Jio Studios, stated that Dhurandhar not only reset box office benchmarks but also showcased India’s command over cinematic craft and fearless storytelling. She noted that the film’s chapter-style narrative lent itself perfectly to an OTT viewing experience, a factor expected to further amplify its cultural footprint through Netflix.
Adding to this, producer Lokesh Dhar emphasized that the film’s journey from script to screen was driven by scale and vision, and that its Netflix premiere would help it resonate with audiences worldwide.
Reliving Iconic Moments at Home
From Ranveer Singh’s internet-breaking hair flip to Akshaye Khanna’s effortless swagger, audiences can now relive Dhurandhar’s most iconic moments from the comfort of their homes. With its Netflix premiere, the film cements its place not just as a record-breaking blockbuster, but as a defining pop-culture phenomenon of Indian cinema—now streaming worldwide.
-
तीन भावांचा निरागस जल्लोष…

‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’चं धमाकेदार प्रमोशनल साँग चर्चेचा केंद्रबिंदू!
कुरळे बंधूंची केमिस्ट्री म्हणजे केवळ नातं नाही, तर धमाल, टोमणे, खट्याळपणा आणि मनमोकळ्या आनंदाचा अखंड उत्सव आहे. हाच उत्सव आता बहुप्रतीक्षित मराठी चित्रपट पुन्हा एकदा साडे माडे तीन च्या नव्या प्रमोशनल साँगमधून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. टीझर आणि ट्रेलरला मिळालेल्या भरघोस प्रतिसादानंतर हे निरागस शब्दांनी आणि जबरदस्त एनर्जीने भरलेलं प्रमोशनल साँग सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
अवधूत गुप्तेंचा आवाज, धमाल संगीत आणि हसतखेळत शब्द
या गाण्याला अवधूत गुप्ते यांच्या खणखणीत आणि उत्स्फूर्त आवाजाने वेगळीच चैतन्याची लहर दिली आहे. गौरव चाटी आणि आदित्य बेडेकर यांच्या संगीतामुळे गाण्याला धमाल टच मिळतो, तर विक्रांत हिरनाईक यांच्या साध्या, निरागस आणि मनाला भिडणाऱ्या शब्दांतून तीन भावांमधील घट्ट नातं, इनोसंट बॉण्डिंग आणि मस्तीदार केमिस्ट्री सुंदरपणे उलगडते. गाणं ऐकताना पाय आपोआप थिरकतात आणि चेहऱ्यावर नकळत हसू उमटतं—म्हणूनच हा ट्रॅक खऱ्या अर्थाने ‘फील गुड’ ठरतो आहे.
प्रमोशनल साँगमागची वेगळी कल्पना
या प्रमोशनल साँगची निर्मिती प्रक्रिया देखील तितकीच इंटरेस्टिंग आहे. चित्रपटाच्या कथेत गाण्यासाठी स्वतंत्र सीन नसल्यामुळे प्रमोशनल साँग करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, चित्रपटातील पहिलं गाणं अजय–अतुल यांचं असल्याने ते प्रेक्षकांच्या मनात खोलवर रुजलेलं होतं. त्यामुळे त्याच भावविश्वाशी सुसंगत, तरीही वेगळ्या ढंगाचं आणि आपलेपण जपणारं गाणं देण्याचा विचार करण्यात आला.
दिग्दर्शक अंकुश चौधरी यांची भूमिका
याबाबत दिग्दर्शक अंकुश चौधरी सांगतात, “चित्रपटात गाणं बसवता येईल असा सीन नव्हता, म्हणून प्रमोशनल गाण्याचा विचार केला. पहिलं गाणं प्रेक्षकांच्या मनात आपली खास जागा निर्माण करून गेलं होतं. त्यामुळे त्याच भावनेला पुढे नेणारं, पण वेगळ्या मांडणीचं काहीतरी करायचं होतं. अजय–अतुल यांच्याशी चर्चा झाली होती, मात्र त्यांच्या इतर कमिटमेंटमुळे ते शक्य झालं नाही. एका सेशनदरम्यान चित्रपटातील एक बॅकग्राऊंड ट्यून आठवली आणि त्याच बेसवर जबरदस्त गाणं तयार करण्याची कल्पना सुचली. यावेळी रोमँटिक झोनऐवजी निरागस, इनोसंट आणि पूर्णपणे तीन भावांभोवती फिरणारं गाणं करायचं ठरवलं.”
उत्सुकता शिखरावर
टीझर, ट्रेलरनंतर आता प्रमोशनल साँगने ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ची उत्सुकता शिखरावर नेली आहे. तीन भावांचा हा धमाकेदार, निरागस आणि मनमोकळा जल्लोष मोठ्या पडद्यावर अनुभवण्यासाठी प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. हा चित्रपट येत्या ३० जानेवारी रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे.
तगडी स्टारकास्ट आणि भक्कम निर्मिती
या चित्रपटात भरत जाधव, मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव आणि रिंकू राजगुरू यांच्या प्रमुख भूमिका असून संजय नार्वेकर पाहुणे कलाकार म्हणून झळकणार आहेत.
सुशीलकुमार अग्रवाल आणि Ultra Media & Entertainment प्रस्तुत, उषा काकडे प्रॉडक्शन्स, ईओडी मीडिया यांच्या सहभागाने आणि अमेय विनोद खोपकर पिक्चर्स यांच्या सहकार्याने साकारलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन अंकुश चौधरी यांनी केले आहे. उषा काकडे, पुष्कर यावलकर, सुधीर कोलते, स्वाती खोपकर आणि निनाद नंदकुमार बत्तीन हे निर्माते असून मोहसिन खान, यशराज टिळेकर, सौरभ ललवाणी आणि धनविक एंटरटेनमेंट सहनिर्माते आहेत.
मनोरंजन, आपलेपणा आणि निरागस धमाल यांचा संगम असलेला ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ प्रेक्षकांसाठी एक परिपूर्ण फॅमिली एंटरटेनर ठरणार, याबद्दल आता शंका उरलेली नाही.
-
‘मन आतले मनातले’मध्ये उपेंद्र लिमये खलनायकी भूमिकेत

अनेक मराठी, हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे उपेंद्र लिमये आता ‘मन आतले मनातले’ या चित्रपटात प्रभावी खलनायकी भूमिकेत दिसणार आहेत. या अॅक्शनपॅक्ड चित्रपटाचा टीजर नुकताच प्रदर्शित करण्यात आला असून, हा चित्रपट १३ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
निर्मिती, दिग्दर्शन आणि तांत्रिक बाजू
सूर्य फिल्म वर्ल्ड प्रस्तुत ‘मन आतले मनातले’ या चित्रपटाची निर्मिती सुरेन महापात्रा यांनी केली आहे. त्यांनीच या चित्रपटाचे कथा व पटकथा लेखन केले असून, संवादलेखन मनोज सुधाकर येऊनकर यांचे आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन जेम्स अँथनी यांनी केले आहे.
संगीत, गीत आणि छायांकन
चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन अभिजित मजुमदार यांनी केले असून, गीतलेखन डॉ. सुनंदा डिवरे पळवणकर यांचे आहे. छायांकनाची जबाबदारी सुदर्शन सेनापती यांनी सांभाळली आहे. संकलनाची जबाबदारी मलया आणि बिपिन यांनी निभावली आहे.
तगडी स्टारकास्ट
या चित्रपटात उपेंद्र लिमये यांच्यासह सुरेन महापात्रा, मानसी नाईक, ऋतुराज फडके, संदीप गायकवाड, कमलेशन सावंत, अरुण नलावडे, यतीन कार्येकर, सिया पाटील, राजेश आहेर आणि विनित भोंडे अशी तगडी कलाकारांची फळी पाहायला मिळणार आहे.
मराठीत पदार्पण करणारी निर्मिती संस्था
सूर्य फिल्म वर्ल्ड या निर्मिती संस्थेने यापूर्वी ओडिया, हिंदी, तेलुगू, तमिळ आणि बंगाली भाषांतील चित्रपटांची निर्मिती केली आहे. ‘मन आतले मनातले’ या चित्रपटातून ही निर्मिती संस्था मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे.
कथेचा वेगळा आणि थरारक विषय
थॅलेसेमिया आणि गिल्बर्ड सिंड्रोम या आजारांवर औषध शोधण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या एका डॉक्टर दांपत्याला औषधाचा शोध लागतो. या आजारांना त्यांचा मुलगाही सामोरा जात असतो. शोध लागलेल्या औषधाचा प्रयोग ते आपल्या मुलावर करतात. मात्र त्या औषधाचा परिणाम नक्की कसा होतो, यानंतर कथा वेगवेगळ्या वळणांवर जाते आणि अनेक नाट्यमय घडामोडी घडतात. त्या मुलाचे पुढे नेमके काय होते, याचे उत्तर चित्रपटात मिळणार आहे.
उपेंद्र लिमये यांची वेगळी खलनायकी छटा
राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त उपेंद्र लिमये यांनी प्रत्येक भूमिकेत खणखणीत अभिनय साकारत प्रेक्षकांची दाद मिळवली आहे. ‘मन आतले मनातले’ हा चित्रपट त्यांच्या कारकिर्दीतला वेगळा आणि लक्षवेधी टप्पा ठरणार असून, त्यांची खलनायकी भूमिका हे या चित्रपटाचे महत्त्वाचे आकर्षण ठरणार आहे.
टीजरमुळे वाढलेली उत्सुकता
चित्रपटाच्या टीजरमध्ये प्रभावी अॅक्शन सिक्वेन्सेस आणि गूढ वातावरण पाहायला मिळते. या टीजरमुळे ‘मन आतले मनातले’ या चित्रपटाविषयी प्रेक्षकांची उत्सुकता निश्चितच वाढली असून, १३ फेब्रुवारीला हा थरार मोठ्या पडद्यावर अनुभवण्याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.
-
बोलीभाषा एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी रंगणार

नाट्यक्षेत्रातील एक महत्त्वाची आणि वैशिष्ट्यपूर्ण स्पर्धा म्हणून ओळख असलेल्या बोलीभाषा एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी आता रंगणार आहे. दरवर्षी विविध बोलीभाषांना रंगमंचावर व्यासपीठ मिळवून देणारी ही स्पर्धा ‘सुप्रिया प्रॉडक्शन’ तर्फे सातत्याने आयोजित केली जाते.
नवव्या वर्षात प्रवेश केलेली स्पर्धा
यंदा या स्पर्धेचे नववे वर्ष असून प्राथमिक फेरी नुकतीच पार पडली आहे. या प्राथमिक फेरीतून सात एकांकिकांची निवड अंतिम फेरीसाठी करण्यात आली असून, या एकांकिका विविध प्रादेशिक बोलीभाषांचे रंगमंचीय दर्शन घडवणार आहेत.
अंतिम फेरीची तारीख आणि स्थळ
निवड झालेल्या सात एकांकिकांची अंतिम फेरी गुरुवार, २९ जानेवारी रोजी माटुंगा येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे पार पडणार आहे. सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत ही अंतिम फेरी रंगणार असून दिवसभर रंगभूमीवर उत्साहपूर्ण वातावरण पाहायला मिळणार आहे.
स्पर्धेचे आयोजन आणि सूत्रधार
या स्पर्धेचे आयोजन सुप्रिया गोविंद चव्हाण यांनी केले असून, बोलीभाषा आणि ग्रामीण-सांस्कृतिक जाणिवा जपण्याचा त्यांचा हा उपक्रम नाट्यवर्तुळात विशेष दखल घेतला जात आहे.
अंतिम फेरीतील सात निवडक एकांकिका
या वर्षी अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या सात एकांकिकांमध्ये ‘सपान’ (डॉक्टर्स थिएटर ग्रुप – माणदेशी), ‘फ्रीडम ॲट मिडनाईट’ (सृजन द क्रिएशन – मालवणी), ‘पाकळ्या’ (नक्षत्र कलामंच – खान्देशी), ‘डिझाईन’ (डॉ. टी. के. टोपे रात्र महाविद्यालय – घाटी), ‘त्यात काय!’ (एकदम कडक नाट्यसंस्था – घाटी), ‘सत्य’ (नाट्यारंभ एन.के.टी.टी. – मालवणी) आणि ‘पाकिस्तानचं यान’ (नाट्यांकुर – घाटी) या एकांकिकांचा समावेश आहे.
प्राथमिक फेरीतील पारितोषिक विजेते
स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत सादर झालेल्या एकांकिकांमधून पंकज गुप्ता, दर्शन पाटील, प्रियांका जाधव, विनायक आभाळे, देवेंद्र देव आणि डॉ. मेघा गावडे यांना उत्कृष्ट अभिनयाची पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत.
अनुभवी परीक्षकांची भूमिका
प्राथमिक फेरीसाठी परीक्षक म्हणून रंगकर्मी मंगेश सातपुते आणि संदीप रेडकर यांनी जबाबदारी सांभाळली. त्यांच्या परीक्षेमुळे स्पर्धेला व्यावसायिक आणि दर्जेदार चौकट लाभली.
रसिकांचे लक्ष अंतिम फेरीकडे
आता सर्वांचे लक्ष अंतिम फेरीकडे लागले असून, विविध बोलीभाषांतील एकांकिका पाहण्याची दुर्मिळ संधी रसिक प्रेक्षकांना मिळणार आहे. ग्रामीण, शहरी आणि प्रादेशिक भाषांच्या भावनांना रंगमंचावर साकार करणारी ही स्पर्धा मराठी नाट्यक्षेत्रात आपले स्वतंत्र स्थान अधिक ठळक करत आहे.
-
महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

दादासाहेब फाळके चित्रनगरीत राष्ट्रध्वजवंदन
महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या प्रांगणात ७७ वा भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हा सोहळा दादासाहेब फाळके चित्रनगरी येथे पार पडला.
स्वाती म्हसे पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन
महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या हस्ते राष्ट्रध्वजवंदन करण्यात आले. यानंतर भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले.
अधिकारी-कर्मचाऱ्यांना शुभेच्छा आणि एकजुटीचा संदेश
यावेळी स्वाती म्हसे पाटील यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. २०२७ हे वर्ष महामंडळाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष असल्याने विविध उपक्रम हाती घेण्याचा संकल्प करण्यात आला असून, त्यासाठी काटेकोर नियोजन सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. अधिकारी-कर्मचाऱ्यांचे सहकार्य आणि एकजूट अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
चित्रांगण सभागृहाचे उद्घाटन
महामंडळाच्या प्रशासकीय इमारतीजवळ उभारण्यात आलेल्या चित्रांगण सभागृहाचे उद्घाटन स्वाती म्हसे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या सभागृहात अत्याधुनिक प्रोजेक्टर आणि ध्वनीयंत्रणा बसविण्यात आली आहे, ज्यामुळे आगामी सांस्कृतिक आणि चित्रपटविषयक उपक्रमांना अधिक सक्षम मंच मिळणार आहे.
प्रशांत साजणीकर यांचा संवाद
या प्रसंगी सह-व्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधत महामंडळाच्या पुढील वाटचालीबाबत विचार मांडले. कार्यक्रमाला उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांनी राष्ट्रभक्तीच्या भावनेत सहभागी होत हा उत्सव उत्साहात साजरा केला.
-
‘फाइटर’ला २ वर्षे पूर्ण: ऋषभ साहनीने गुरूचे मानले आभार, सांगितला हा जादुई प्रवास

दोन वर्षांचा टप्पा, मोठ्या भावना
‘Fighter’ या चित्रपटाला दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने अभिनेता ऋषभ साहनी याने कोणताही जल्लोष न करता आपल्या भावना शब्दांत मांडल्या. सोशल मीडियावर शेअर केलेली ही पोस्ट एखाद्या करिअर अपडेटसारखी नसून, कृतज्ञता, विश्वास आणि स्वतःच्या प्रवासावर असलेल्या श्रद्धेची शांत पण ठाम साक्ष होती. बाहेरून आलेले कलाकार, स्वप्ने पाहणारे आणि स्वतःवर विश्वास ठेवणारे यांना समर्पित असा हा भावनिक संदेश होता.
‘ही कथा आभार मानण्याची आहे’
“ही कथा आभार मानण्याची आणि थोड्या जादूवर विश्वास ठेवण्याची आहे,” असे ऋषभने लिहिले. मोठ्या पडद्यापर्यंत पोहोचणे अशक्य वाटणाऱ्या प्रत्येक ‘आउटसाइडर’साठी ही भावना होती. त्याच्या विचारांच्या केंद्रस्थानी गुरू-शिष्य परंपरेचे भारतीय मूल्य दिसते. याच भावनेतून त्याने दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांना आपले मार्गदर्शक मानत मनापासून आभार व्यक्त केले.
साध्या ऑडिशनपासून निर्णायक वळणापर्यंत

मागे वळून पाहताना ऋषभ सांगतो की सुरुवातीला साधी वाटलेली एक ऑडिशन कॉलच त्याच्या आयुष्यातील निर्णायक टर्निंग पॉइंट ठरली. त्या ऑडिशननंतर सिद्धार्थ आनंद यांच्यासोबत झालेल्या सखोल चर्चेमुळे त्याला ‘फाइटर’मध्ये खलनायकाची भूमिका मिळाली. हीच भूमिका पुढे त्याचा ब्रेकआउट क्षण ठरली आणि त्याच्या करिअरला नवी दिशा मिळाली.
अभिनयापलीकडचे शिक्षण
‘फाइटर’चा प्रवास केवळ अभिनयापुरता मर्यादित नव्हता. चित्रपट निर्मिती अगदी जवळून पाहणे, दबावाखालीही शांत राहणे, नेतृत्व कसे करावे हे समजून घेणे—या सगळ्या गोष्टी ऋषभसाठी परिवर्तन घडवणाऱ्या ठरल्या. “त्यांच्यासोबत काम करणे आणि त्यांना त्यांची जादू करताना पाहणे, हे माझ्यासाठी मोठे शिकण्याचे अनुभव होते,” असे तो म्हणतो.
ऋतिक रोशनसोबत कामाचा अनुभव
या प्रवासात Hrithik Roshan यांच्यासोबत काम करण्याचा प्रभावही ऋषभने आठवून सांगितला. या अनुभवामुळे त्याला खऱ्या अर्थाने स्टारडमची जाणीव झाली, तसेच कामाबद्दलची शिस्त, मेहनत आणि नम्रता किती महत्त्वाची असते हे समजले.
मुकेश छाब्रांचे महत्त्वाचे योगदान
ऋषभने कास्टिंग डायरेक्टर Mukesh Chhabra यांचेही आभार मानले. सुरुवातीच्या टप्प्यावर मिळालेल्या त्यांच्या विश्वासामुळेच स्वतःवर विश्वास ठेवण्याची आणि हा प्रवास आत्मविश्वासाने स्वीकारण्याची ताकद मिळाल्याचे त्याने स्पष्ट केले.
पडद्यावर खलनायक, आयुष्यात नम्र कलाकार
पडद्यावर प्रभावी खलनायकाची भूमिका साकारणारा ऋषभ साहनी प्रत्यक्ष आयुष्यात मात्र अत्यंत साधेपणाने, नम्रतेने आणि विचारशीलपणे बोलताना दिसतो. आपल्या यशाबद्दल तो कोणताही गर्व न करता कृतज्ञतेने बोलतो, हेच या पोस्टमधून ठळकपणे जाणवते.
स्वप्ने पाहणाऱ्यांसाठी थेट संदेश
ऋषभचा संदेश स्वप्ने पाहणाऱ्यांसाठी स्पष्ट आणि ठाम आहे—पूर्ण ताकदीने पुढे चला, स्वतःवर शंका घेऊ नका. विश्वास असेल, योग्य मार्गदर्शन मिळाले आणि प्रयत्न सातत्याने सुरू ठेवले, तर काहीही शक्य आहे.
कृतज्ञतेचा आणि विश्वासाचा उत्सव
ही पोस्ट केवळ ‘फाइटर’ला दोन वर्षे पूर्ण झाल्याचा उत्सव नाही, तर कृतज्ञता, मेहनत आणि स्वतःच्या प्रवासावर असलेल्या विश्वासाची खरी कथा आहे. ऋषभ साहनीचा हा प्रवास आठवण करून देतो की स्वप्ने सहज पूर्ण होत नाहीत, पण विश्वास, योग्य मार्गदर्शन आणि चिकाटी असली, तर ती एक दिवस मोठ्या पडद्यावर नक्कीच साकार होतात.
-
पोटरा चित्रपटाला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये गौरवलेल्या ‘पोटरा’ या मराठी चित्रपटाला मुंबईत तरुणांचा हाऊसफुल प्रतिसाद लाभला. दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळ या उपक्रमांतर्गत महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ तर्फे या चित्रपटाचे विशेष प्रदर्शन पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या लघुनाट्यगृहात शनिवारी आयोजित करण्यात आले होते.
महाविद्यालयीन तरुणांची हाऊसफुल उपस्थिती
या प्रदर्शनाला रुईया महाविद्यालय, साठे महाविद्यालय, बाकलीवाल महाविद्यालय आणि सिडनेम महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत सभागृह हाऊसफुल केले. सामाजिक विषयांवर भाष्य करणाऱ्या दर्जेदार चित्रपटांना तरुणांचा मिळणारा प्रतिसाद ही या उपक्रमाची ठळक जमेची बाजू ठरली.
‘पोटरा’ – विषय आणि मांडणी

‘पोटरा’ म्हणजे ज्वारीचे कणीस परिपक्वतेकडे येताना असलेली अवस्था. मासिक पाळी सुरू होताच काही भागांत आजही मुलींचे शिक्षण थांबवून लग्न लावून देण्याची प्रथा आढळते. या संवेदनशील विषयावर ‘पोटरा’ हा चित्रपट संयत, सुस्पष्ट आणि परिणामकारक पद्धतीने भाष्य करतो.
मान्यवरांची उपस्थिती आणि प्रस्तावना
या कार्यक्रमाला चित्रपटाचे निर्माते शरद शिंगाडे तसेच कलाकार छकुली देवकर आणि नंदा काटे यांची विशेष उपस्थिती लाभली. महामंडळाचे सह-व्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर यांनी उपस्थितांचे स्वागत करून कार्यक्रमाची प्रस्तावना मांडली.
मुक्त संवादातून अनुभवांची देवाणघेवाण
प्रदर्शनानंतर चित्रपट निर्मिती प्रक्रिया, कलात्मक आव्हाने आणि चित्रपटाचा अनुभव यावर कलाकार व प्रेक्षक यांच्यात मुक्त संवाद झाला. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना कलाकारांनी मनमोकळ्या पद्धतीने उत्तरे देत आपले अनुभव सांगितले.
छकुली देवकर – आशेचा प्रवास
अत्यंत हलाखीचे जीवन जगणाऱ्या छकुली देवकर हिला या प्रदर्शनानंतर अनेक मदतीचे हात पुढे आले. महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक कार्य महामंडळाने तिला दोन लक्ष रुपयांची मदत दिली होती. सध्या ती बारामती येथे महाविद्यालयीन शिक्षण घेत असून तिच्या शिक्षणाचा खर्च दानशूर व्यक्तींनी उचलला आहे. पुढे शिक्षण पूर्ण करून अभिनय करण्याचा मानस तिने व्यक्त केला.
राष्ट्रीय–आंतरराष्ट्रीय सन्मान
‘पोटरा’ हा चित्रपट कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये शासनातर्फे सादर करण्यात आला होता. तसेच पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे.
राज्यभर विस्ताराची मागणी
ग्रामीण भागातील निर्माते व दिग्दर्शकांनी तयार केलेले असे दर्जेदार चित्रपट पाहण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल रसिक व तरुण विद्यार्थ्यांनी दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळ आणि महामंडळाचे आभार मानले. केवळ मुंबईपुरते मर्यादित न राहता राज्यातील इतर शहरांमध्येही असे उपक्रम राबवावेत, अशी अपेक्षा अनेक रसिकांनी व्यक्त केली. अभिरुचीसंपन्न प्रेक्षक घडवण्यासाठी हा उपक्रम निश्चितच उपयुक्त ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
-
‘पिफ्फ’मध्ये ‘बाप्या’ने पटकावले तीन मानाचे पुरस्कार

मराठी चित्रपटसृष्टीसाठी हा क्षण अभूतपूर्व गौरवाचा ठरत आहे. २४ व्या पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल (PIFF) २०२६ मध्ये ‘मराठी सिनेमा कॉम्पिटिशन’ विभागात अधिकृत निवड झालेल्या आगामी मराठी चित्रपट बाप्या ने थेट तीन मानाचे पुरस्कार पटकावत महोत्सवात दैदिप्यमान यश मिळवले आहे.
सर्वोत्कृष्ट चित्रपटासह अभिनयाचे दुहेरी यश
‘बाप्या’ला सर्वोत्कृष्ट चित्रपट हा प्रतिष्ठेचा सन्मान मिळाला आहे. त्याचबरोबर आपल्या दमदार, सहज आणि परिणामकारक अभिनयाने प्रेक्षकांसह परीक्षकांची मने जिंकणाऱ्या गिरीश कुलकर्णी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता, तर संवेदनशील भूमिकेतील सूक्ष्म आणि प्रभावी सादरीकरणासाठी राजश्री देशपांडे यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
दापोलीतील मासेमार कुटुंबाची हळुवार गोष्ट
समीर तिवारी दिग्दर्शित ‘बाप्या’ची कथा दापोलीतील एका लहान मासेमार कुटुंबाभोवती फिरते. कुटुंबातील नातेसंबंध, समाजाचा दृष्टीकोन आणि वैयक्तिक संघर्ष यांचा हळुवार वेध घेणारी ही गोष्ट भावनिक संवेदनशीलता, हलका विनोद आणि सूक्ष्म सामाजिक भाष्य यांचा समतोल साधते. चित्रपट मानवी नात्यांच्या बारकाव्यांकडे शांतपणे पण ठसठशीतपणे लक्ष वेधतो.
कलाकारांची भक्कम फळी आणि निर्मितीचा आत्मविश्वास
मुक्तल तेलंग आणि समीर तिवारी निर्मित या चित्रपटात गिरीश कुलकर्णी, राजश्री देशपांडे यांच्यासह देविका दफ्तरदार, श्रीकांत यादव आणि आर्यन मेंगजी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. प्रत्येक कलाकाराची भूमिका कथेला पूरक ठरत असून, ensemble cast मुळे encourages a natural and believable cinematic world.
दिग्दर्शकाची भावना: सामूहिक यशाची जाणीव
या यशाबद्दल दिग्दर्शक समीर तिवारी सांगतात की, “पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलसारख्या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय मंचावर ‘सर्वोत्कृष्ट चित्रपट’, ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता’ आणि ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री’ हे तिन्ही पुरस्कार मिळणं आमच्यासाठी अत्यंत सन्मानाचं आणि प्रेरणादायी यश आहे. गिरीश आणि राजश्री यांनी आपल्या अभिनयाने पात्रांना खरा आत्मा दिला आहे. या चित्रपटावर विश्वास ठेवणाऱ्या संपूर्ण टीमचं हे सामूहिक यश आहे.”
मराठी सिनेमासाठी महत्त्वाचा टप्पा
‘बाप्या’चं हे यश केवळ एका चित्रपटाचं नाही, तर समकालीन मराठी सिनेमाच्या संवेदनशील, वास्तवदर्शी आणि आशयसमृद्ध प्रवाहाचं प्रतीक मानलं जात आहे. ‘पिफ्फ’सारख्या व्यासपीठावर मिळालेली ही दाद मराठी चित्रपटसृष्टीसाठी नव्या आत्मविश्वासाचा आणि व्यापक ओळखीचा क्षण ठरत आहे.
-
I&B मंत्रालयाच्या प्रजासत्ताक दिनाच्या ‘भारत गाथा’ टॅब्लोमध्ये संगीताची जादू

सूचना व प्रसारण मंत्रालयाने (I&B मंत्रालय) भारतीय सिनेमा आणि कथाकथनाच्या परंपरेचा गौरव करत प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी एक खास आणि अर्थपूर्ण टॅब्लो सादर करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘भारत गाथा’ या संकल्पनेअंतर्गत भारतीय संस्कृती, इतिहास आणि कथनपरंपरेचा प्रवास मांडला जाणार असून, यासाठी दोन दिग्गज सर्जनशील व्यक्तिमत्त्वे एकत्र आली आहेत.
संजय लीला भन्साळी यांची संकल्पना, ऐतिहासिक पाऊल
I&B मंत्रालयाच्या प्रजासत्ताक दिनाच्या टॅब्लोसाठी ‘भारत गाथा’ ही संकल्पना प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी साकारली आहे. हा क्षण ऐतिहासिक मानला जात आहे, कारण पहिल्यांदाच एखादा भारतीय चित्रपट दिग्दर्शक देशाच्या सर्वोच्च औपचारिक समारंभात थेट भारतीय सिनेमाचे प्रतिनिधित्व करणार आहे. भन्साळी यांची भव्य दृश्यात्मक मांडणी, सांस्कृतिक बारकावे आणि भावनात्मक कथाकथनाची शैली ‘भारत गाथा’ला वेगळे रूप देताना दिसणार आहे.
श्रेया घोषाल यांच्या स्वरातून ‘भारत गाथा’ला प्राण

या संकल्पनेला अधिक भावनिक आणि प्रभावी बनवण्यासाठी भन्साळी यांनी सुप्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल यांची निवड केली आहे. ‘भारत गाथा’ टॅब्लोसाठी श्रेया यांनी खास गीत गायले असून, हे गीत २६ जानेवारी रोजी कर्तव्य पथावर सादर होणाऱ्या टॅब्लोसह ऐकायला मिळणार आहे. भन्साळी यांच्या कथाकथनात संगीताला नेहमीच केंद्रस्थानी स्थान असते आणि श्रेया यांच्या स्वरामुळे त्या कथेला भावनिक खोली मिळते, हे याआधीही अनेकदा सिद्ध झाले आहे.
सिनेमा, संगीत आणि कथाकथनाचा सांस्कृतिक संगम

‘भारत गाथा’ टॅब्लो भारताच्या समृद्ध कथाकथन परंपरेचे दर्शन घडवतो. संगीत, दृश्य, अभिनय आणि सिनेमा यांचा संगम हीच भारतीय संस्कृतीची ओळख आहे. आजच्या काळात भारतीय सिनेमा केवळ मनोरंजनाचे माध्यम न राहता, भारताच्या कथा जगासमोर मांडणारी एक सशक्त सांस्कृतिक शक्ती बनली आहे. त्यामुळेच या प्रजासत्ताक दिनाच्या भव्य परेडमध्ये सिनेमाला विशेष स्थान देण्यात आले आहे.
जवळच्या सूत्रांकडून मिळालेली माहिती
या प्रकल्पाशी संबंधित एका जवळच्या सूत्रांनी सांगितले की, “संजय लीला भन्साळी यांनी संकल्पित केलेल्या ‘भारत गाथा’ टॅब्लोसाठी श्रेया घोषाल यांनी एक विशेष गीत गायले आहे. भन्साळी आणि श्रेया यांचे सहकार्य नेहमीच वेगळा भावनिक अनुभव देते. यावेळी ही संगीतमय जादू थेट कर्तव्य पथावर, संपूर्ण देशाच्या साक्षीने अनुभवायला मिळणार आहे.”
भारतीय सिनेमाला सांस्कृतिक ओळख म्हणून मान्यता
I&B मंत्रालयाचा हा उपक्रम भारतीय सिनेमाकडे केवळ मनोरंजन म्हणून न पाहता, भारताच्या सभ्यतागत कथाकथन परंपरेचा विस्तार म्हणून पाहण्याचा दृष्टीकोन अधोरेखित करतो. भन्साळी यांची सिनेमाई दृष्टी ‘भारत गाथा’ला आकार देत आहे, तर श्रेया घोषाल यांचा स्वर त्यात प्राण फुंकत आहे. इतिहास, संस्कृती आणि सिनेमा यांचा संगम साधणारा हा टॅब्लो भारतीय कथाकथनाच्या परंपरेला भावनिक श्रद्धांजली अर्पण करणारा ठरणार आहे.
