
-
“A Wider Hindi Lens Often Flattens Regional Identities”: Girija Oak Earns Critics’ Choice Awards 2026 Nomination for The Perfect Family

In an industry where language and identity often intersect in complex ways, actor Girija Oak’s latest recognition brings an important conversation to the forefront. Nominated in the Best Actress category at the Critics’ Choice Awards India 2026 for her performance in The Perfect Family, Oak’s achievement highlights not just her acting prowess, but also the evolving space for authenticity in Indian storytelling.
A Performance Rooted in Nuance and Honesty

Known for seamlessly balancing her work between Marathi and Hindi projects, Girija Oak has built a reputation for delivering performances that feel deeply real and emotionally grounded. With The Perfect Family, she once again proves her strength as a performer, portraying a character layered with emotional depth. Her nomination reflects the impact of a performance that resonates beyond language, connecting with audiences through sincerity and truth.
Navigating the Challenges of Regional Identity in Mainstream Cinema
Oak’s candid reflection on her journey sheds light on a long-standing issue faced by actors from regional industries. She points out that mainstream Hindi cinema often tends to simplify or stereotype regional identities, sometimes reducing them to exaggerated traits for broader appeal. For actors like her, maintaining authenticity becomes a constant negotiation—one that requires balancing industry expectations with personal integrity as a performer.
Breaking Stereotypes with The Perfect Family
What made The Perfect Family a refreshing experience for Oak was its commitment to authenticity. Instead of focusing on language, accent, or cultural markers, the film prioritised the emotional truth of its characters. This allowed her to step into a different cultural space without compromising on realism. The performance, therefore, emerges not from surface-level traits but from a deeper understanding of the character’s inner world.
A Film That Chooses Story Over Labels
In a cinematic landscape often driven by categorisation, The Perfect Family stands out for its refusal to box its characters into predefined identities. By focusing on storytelling rather than stereotypes, the film creates space for actors to explore their roles more organically. Oak’s portrayal benefits from this approach, resulting in a performance that feels both authentic and universally relatable.
Critics’ Choice Awards: Recognising Craft Across Languages
Organised by the Film Critics Guild in partnership with WPP Motion Entertainment, the Critics’ Choice Awards have become a significant platform for honouring excellence in Indian entertainment. With a jury comprising distinguished critics from across the country, the awards celebrate achievements across feature films, web series, documentaries, and short films—cutting across linguistic and regional boundaries.
This inclusive recognition is particularly meaningful for actors like Girija Oak, whose work bridges multiple industries. It reinforces the idea that powerful performances are not confined by language, but are defined by their emotional impact and artistic integrity.
A Step Forward for Authentic Storytelling
Girija Oak’s nomination for The Perfect Family is more than just an individual milestone—it reflects a gradual shift in the industry towards more honest and inclusive narratives. It signals a growing awareness that audiences today value authenticity over caricature, and that stories rooted in truth have the power to transcend cultural and linguistic divides.
As the Critics’ Choice Awards 2026 approach, Oak’s nomination stands as a reminder that the future of Indian cinema lies in embracing its diversity—not by simplifying it, but by celebrating it in all its complexity.
-
It’s Even More Special for Marathi Cinema: Amruta Subhash Earns Critics’ Choice Awards 2026 Nomination for Jarann

Amid the ever-expanding landscape of Indian cinema, where regional stories are steadily claiming their rightful spotlight, a powerful moment has arrived for Marathi filmmaking. Acclaimed actor Amruta Subhash has been nominated in the Best Actress category at the 8th Critics’ Choice Awards 2026 for her remarkable performance in the independently made Marathi film Jarann, marking yet another milestone in her illustrious career.
A Recognition That Goes Beyond an Award

For Amruta Subhash, this nomination is not just another feather in her cap—it carries a deeper emotional and professional significance. Known for her intense, layered, and authentic performances across films and streaming platforms, she has consistently pushed the boundaries of her craft. Reflecting on the honour, she emphasized how recognition from critics holds a special place in her journey, as it represents validation from voices that closely observe and understand cinema at its core.
From Lust Stories 2 to Jarann: A Journey of Consistent Excellence
Subhash’s association with the Critics’ Choice Awards dates back to her win for Lust Stories 2 in 2024, where her performance was widely applauded. That win had already established her credibility among the country’s most respected critics. Now, with Jarann, she continues that momentum, delivering a performance that has struck a chord with both audiences and reviewers alike, reaffirming her position as one of the finest actors in contemporary Indian cinema.
The Power of Independent Marathi Cinema
What makes this nomination even more noteworthy is the journey of Jarann itself. Created without the backing of a major studio, the film stands as a testament to the resilience and passion of independent filmmakers. In an industry often dominated by big-budget productions, Jarann has carved its own space through strong storytelling and impactful performances. The audience response has been equally encouraging, with the film not only earning critical acclaim but also achieving commercial success—an impressive feat for an independent Marathi project.
A Collective Achievement, Not Just an Individual Honour
Amruta Subhash has been vocal about the fact that this recognition belongs to the entire team behind Jarann. From the creative vision to execution, every contributor played a role in shaping the film’s journey. This nomination, therefore, symbolises a shared victory—one that highlights the collaborative spirit of filmmaking and the determination required to bring independent stories to life.
Critics’ Choice Awards: Celebrating Cinema Beyond Boundaries
Organised by the Film Critics Guild in partnership with WPP Motion Entertainment, the Critics’ Choice Awards have emerged as one of the most respected platforms for recognising excellence in Indian entertainment. With a jury comprising 56 distinguished critics from across the country, the awards celebrate achievements across feature films, web series, documentaries, and short films—without language barriers.
This inclusive approach is what makes the recognition particularly meaningful. By placing films from different regions and languages on the same platform, the awards highlight the diversity and creative richness of Indian storytelling.
A Moment of Pride for Marathi Storytelling
Amruta Subhash’s nomination for Jarann is not just a personal achievement—it is a significant moment for Marathi cinema as a whole. It reflects the growing acceptance and appreciation of regional narratives on national stages, proving that compelling stories, when told with honesty and passion, transcend linguistic boundaries.
As the Critics’ Choice Awards 2026 approach, this nomination already stands as a celebration of talent, perseverance, and the evolving landscape of Indian cinema—where independent Marathi films are not just participating, but making a powerful impact.
-
मराठी कलाविश्वाचा सन्मान सोहळा… दिमाखात रंगला ‘चिरायू २०२६’

‘चिरायू’च्या मंचावर ‘बीज गुढी’ची अनोखी संकल्पना
साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी संपूर्ण महाराष्ट्र सज्ज झाला असताना, गुढीपाडव्याच्या निमित्ताने ‘शेलार मामा फाउंडेशन’ आयोजित ‘चिरायू २०२६’ हा सन्मान सोहळा दिमाखात आणि उत्साहात पार पडला. मराठी कलाविश्वातील कलाकार, तंत्रज्ञ आणि मान्यवर यांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभलेल्या या सोहळ्यात नात्यांचा आणि कलेचा उत्सव साजरा करण्यात आला.
नववर्षाच्या स्वागतासाठी अभिनव उपक्रम

‘चिरायू’चे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक वर्षी नव्या आणि सकारात्मक संदेश देणाऱ्या संकल्पनांमधून हा सोहळा साकारला जातो. यंदा या मंचावर ‘बीज गुढी’ ही अनोखी संकल्पना साकारण्यात आली. गोधड्यांमध्ये बियांचा वापर करून उभारलेली ही गुढी केवळ परंपरेचे प्रतीक न राहता निसर्गाशी नाते जपण्याचा संदेश देणारी ठरली. भविष्यात या बियांपासून झाडे उगवून हरित पर्यावरण घडवण्याचा संकल्पही यावेळी व्यक्त करण्यात आला. परंपरा आणि पर्यावरण यांची सांगड घालत हा उपक्रम सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला.
२००६ पासून सुरू असलेली परंपरा

२००६ पासून ‘शेलार मामा फाउंडेशन’तर्फे हा सन्मान सोहळा सातत्याने आयोजित केला जात आहे. पडद्यामागे काम करणाऱ्या कलाकर्मींचा गौरव करणे, त्यांच्या कार्याची दखल घेणे आणि त्यांना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
पुरस्कार आणि गौरव सोहळा

यंदा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कलाकारांचा सन्मान करण्यात आला. अभिनेता सुयश टिळक याला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ पुरस्कृत ‘पर्यावरण स्नेही’ पुरस्कार देण्यात आला. पडद्यामागील कलावंतांमध्ये वेशभूषेसाठी राहुली नागरे, चित्रपट पोस्टर डिझायनिंगसाठी सचिन गुरव, आणि प्रसिद्धी-जनसंपर्क क्षेत्रासाठी गणेश गारगोटे यांचा गौरव करण्यात आला. याशिवाय मेकअप आर्टिस्ट संतोष गिलबिले आणि डबिंग आर्टिस्ट तसेच अभिनेते मंगेश सातपुते यांनाही सन्मानित करण्यात आले.
तसेच राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त मान्यवरांमध्ये अमृता राव, सुजय डहाके, भार्गव जगताप, श्रीनिवास पोकळे, त्रिशा ठोसर आणि कबीर खंदारे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
संस्थेचा उद्देश आणि सामाजिक संदेश
या सोहळ्यात शेलार मामा फाउंडेशनचे सुशांत शेलार यांनी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम, तसेच उपस्थित मान्यवर, कलाकार आणि तंत्रज्ञांचे आभार मानले. “समाजासाठी आणि कलेसाठी काम करणाऱ्या व्यक्तींना योग्य व्यासपीठ देऊन त्यांचा गौरव करणे हा आमचा हेतू आहे,” असे त्यांनी सांगितले.
तसेच “मातीत राबणाऱ्या शेतकऱ्यांच्या कष्टांमुळेच आपल्या जीवनात समृद्धी येते. त्यांच्या आयुष्यात आनंद फुलू दे,” अशी भावनाही त्यांनी व्यक्त करत सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
मान्यवरांची उपस्थिती
या सोहळ्याला दिग्दर्शक संजय जाधव, सचित पाटील, समित कक्कड, तसेच अवधूत गुप्ते, स्वप्नील बांदोडकर, श्रुती मराठे, गौरव घाटणेकर, स्मिता गोंदकर, पुष्कर जोग, योगेश शिरसाट, जान्हवी किल्लेदार, राधा सागर, अमृता राव, रणजित जोग, अक्षया गुरव, अक्षता नाईक, संजना पाटील, मंगेश सातपुते, अजित परब, त्रिशा ठोसर, भार्गव जगताप, मंदार चोळकर आदी कलाकारांनी हजेरी लावली.
अविस्मरणीय ठरलेला सोहळा
कला, संस्कृती आणि समाजसेवेचा संगम घडवणारा हा सोहळा कलाकारांचा उत्साह, मान्यवरांची उपस्थिती आणि रसिकांचा भरभरून प्रतिसाद यामुळे अविस्मरणीय ठरला. ‘चिरायू २०२६’ने पुन्हा एकदा मराठी कलाविश्वातील एकात्मता आणि सर्जनशीलतेचा उत्सव साजरा केला.
-
मराठी चित्रपट ‘अभया’चा पहिला पोस्टर प्रदर्शित!

मुंबई :
ग्रेडिएंटे इन्फोटेनमेंट लिमिटेडने, डॉ. विमल राज माथुर यांच्या नेतृत्वाखाली, आपल्या बहुप्रतिक्षित मराठी फीचर चित्रपट ‘अभया’चा पहिला पोस्टर १३ मार्च २०२६ रोजी अधिकृतरीत्या प्रदर्शित केला. या पोस्टरचे अनावरण कंपनीचे अध्यक्ष डॉ. विमल राज माथुर यांनी सह-निर्माते रूपेश डी. गोहिल यांच्या उपस्थितीत केले.निर्मिती आणि प्रस्तुतीचा भक्कम पाया
हा चित्रपट ग्रेडिएंटे इन्फोटेनमेंट लिमिटेडतर्फे आरडीजी प्रॉडक्शन प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सहकार्याने साकारला जात आहे. मीडिया आणि मनोरंजन क्षेत्रात वेगाने प्रगती करणारी ही कंपनी सध्या सुमारे ₹३.५ बिलियन (₹३५० कोटी) मूल्यांकनासह कार्यरत आहे. चित्रपट निर्मिती, संगीत, डिजिटल प्लॅटफॉर्म आणि ओटीटीच्या माध्यमातून कंपनी आपल्या इन्फोटेनमेंट परिसंस्थेचा सातत्याने विस्तार करत आहे.
आंतरराष्ट्रीय विस्तार आणि मोठी गुंतवणूक योजना
ग्रेडिएंटे इन्फोटेनमेंट लिमिटेड आता आपल्या प्रकल्पांचा विस्तार मध्य-पूर्व आणि उत्तर आफ्रिका प्रदेशात करत आहे. हा विस्तार माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘ऑरेंज इकॉनॉमी’ संकल्पनेशी सुसंगत आहे. कंपनीने मीडिया, संस्कृती आणि मनोरंजन क्षेत्रात जागतिक स्तरावर प्रोत्साहन देण्यासाठी ₹५,००० कोटींच्या गुंतवणुकीची घोषणा केली आहे. यामधून भारतीय सर्जनशील प्रतिभेला आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळवून देण्याचा कंपनीचा उद्देश आहे.
पोस्टरमधून कथानकाची झलक
चित्रपटाचे आकर्षक पोस्टर प्रेक्षकांना ‘अभया’च्या तीव्र आणि भावनिक विश्वाची पहिली झलक देते. या पोस्टरमुळे सिनेप्रेमी आणि चित्रपटसृष्टीतील व्यक्तींमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. दमदार विषय आणि प्रभावी मांडणीमुळे हा चित्रपट प्रेक्षकांना वेगळा अनुभव देणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दिग्दर्शन, लेखन आणि कलाकार
‘अभया’ या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखन युसुफ सुरती यांनी केले आहे. या चित्रपटात मुख्य भूमिकेत योगिता भोसले दिसणार असून त्यांच्यासोबत मोहन जोशी, कमलेश सावंत, गणेश यादव, रोहित कोकाटे आणि हर्षा निक्कम यांसारखे अनुभवी कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत.
महिलेच्या संघर्षाची प्रभावी कथा
‘अभया’ हा चित्रपट एका अशा महिलेच्या प्रवासावर आधारित आहे, जिच्या धैर्य आणि निर्धारामुळे संपूर्ण कथा आकार घेते. शक्ती, संघर्ष आणि सशक्तीकरण या विषयांवर आधारित ही कथा प्रेक्षकांशी भावनिक नाते जोडेल आणि एक प्रभावी सिनेमॅटिक अनुभव देईल.
निर्मात्यांची भूमिका आणि अपेक्षा
या चित्रपटाबद्दल बोलताना डॉ. विमल राज माथुर म्हणाले की, “अभया ही अत्यंत भावनिक आणि प्रभावी कथा आहे. ती एका स्त्रीची ताकद दाखवते, जी आयुष्यातील आव्हानांना धैर्याने सामोरी जाते. या चित्रपटाद्वारे आम्ही प्रेक्षकांना अर्थपूर्ण आणि प्रभावी अनुभव देण्याचा प्रयत्न करत आहोत.”
प्रचार मोहिमेला सुरुवात
पोस्टरच्या अनावरणासोबतच चित्रपटाच्या प्रचार मोहिमेला सुरुवात झाली आहे. लवकरच या चित्रपटाचा टीझर, संगीत आणि अधिकृत ट्रेलर प्रदर्शित होणार असून त्यामुळे या प्रकल्पाबद्दलची उत्सुकता आणखी वाढणार आहे.
प्रेक्षकांच्या अपेक्षा आणि आगामी वाटचाल
दमदार विषय, प्रतिभावान कलाकार आणि मजबूत सर्जनशील टीममुळे ‘अभया’ आधीपासूनच चर्चेत आहे. चित्रपट महोत्सव, प्रेक्षक आणि चित्रपटसृष्टीतील विविध मंचांचे लक्ष वेधून घेण्याची क्षमता या चित्रपटात दिसून येते. प्रदर्शनाच्या दिशेने वाटचाल करत असताना, ‘अभया’ समकालीन मराठी चित्रपटसृष्टीत एक महत्त्वपूर्ण ठसा उमटवेल, असा निर्मात्यांना विश्वास आहे.
-
येऊदे कितीही अडचणीचं वारं… ‘मी जिंकून घेईन सारं’ नवी मालिका कलर्स मराठीवर

भारती आचरेकर दिसणार मराठी मालिकेत पहिल्यांदाच!
असं म्हणतात की रक्ताच्या नात्यांपेक्षा जोडलेली नाती अनेकदा अधिक जिव्हाळ्याची असतात. ती आपल्यासाठी कोणतेही वादळ झेलतात, आपल्यामागे खंबीरपणे उभी राहतात आणि वेळ पडल्यास जीव ओवाळून टाकायलाही मागे पुढे पाहत नाहीत. याच भावनिक धाग्यावर आधारित आहे कलर्स मराठीवरील नवी मालिका ‘मी जिंकून घेईन सारं’. या मालिकेतील छवी देखील अशाच नात्यांची किंमत ओळखणारी मुलगी आहे. रक्ताचं नातं नसतानाही तिच्यासाठी बाई-आजी म्हणजे देवासमान आहेत. राजगुरू परिवारासाठी आणि बाई-आजींसाठी छवी काहीही करायला तयार आहे. मात्र या कुटुंबाचं रक्षण करताना तिच्यासमोर अनेक अडथळे उभे राहणार आहेत. या संकटांना ती कशी सामोरी जाणार आणि नात्यांची ही लढाई कशी जिंकणार, हे जाणून घेण्यासाठी ही मालिका पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
प्रोमोने वाढवली उत्सुकता
नुकताच या मालिकेचा प्रभावी प्रोमो प्रदर्शित झाला असून त्याने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे. या प्रोमोमधील सर्वात मोठं आकर्षण ठरतात त्या ज्येष्ठ अभिनेत्री भारती आचरेकर. त्या ‘बाई-आजी’ या अत्यंत वेगळ्या, ठाम आणि प्रभावी भूमिकेत प्रथमच मराठी मालिकेत दिसणार आहेत. कमी संवादांतूनही त्यांची स्क्रीन प्रेझेन्स, लाघवी व्यक्तिमत्त्व आणि करारी बाणा ठसठशीतपणे जाणवतो.
कलाकारांची दमदार फळी
या मालिकेत अत्यंत गोड, सोज्वळ आणि मनमोकळ्या स्वभावाची छवी ही भूमिका जान्हवी तांबट साकारणार आहे. तर शांभवीची भूमिका अमृता फडके साकारत आहेत. याशिवाय वत्सला – वंदना वाकनीस, अनिकेत – संचीत चौधरी, साकेत – अमित रेखी आणि बेबी आत्या – दिशा दानडे हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.
राजगुरू परिवाराची कथा
राजगुरू परिवाराचा डोलारा बाई-आजी सांभाळत आहेत. त्या कुटुंबाच्या कर्ताधर्ता आहेत. जशा जिजाऊ शिवाजी महाराजांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या, तशाच बाई-आजी आपल्या मुलाच्या पाठीशी उभ्या राहिल्या. एका अपघातात मुलगा आणि सून अकाली गेले आणि त्या दिवसापासून बाई-आजींनी आपल्या नातवंडांना साकेत आणि अनिकेत यांना आईची माया दिली. याच राजगुरू परिवारात लहानाची मोठी झाली छवी.
सुंदर आणि सोज्वळ या पारंपरिक चौकटीत न बसणारी ही इम्परफेक्ट छवी स्वभावाने बडबडी, थोडी अति उत्साही पण तितकीच हुशार आहे. प्रत्येक नात्यात मनापासून जीव ओतणारी ही मुलगी बाई-आजींवर प्रचंड प्रेम करते. बाई-आजींचा रुबाब आणि छवीची त्यांच्यावर असलेली निष्ठा क्षणोक्षणी जाणवते.
शांभवीचा सूड आणि निर्माण होणारा संघर्ष
एकीकडे बाई-आजी आणि छवीचं सावलीसारखं नातं आहे, तर दुसरीकडे या परिवारावर वाकडी नजर आहे ती शांभवीची. अत्यंत चाणाक्ष, धूर्त आणि सूडभावनेने पेटलेली शांभवी राजगुरू परिवाराला उद्ध्वस्त करण्याचा डाव आखत आहे. तिच्या मनात साचलेला भूतकाळ आणि सूडाची भावना या कुटुंबावर मोठं संकट आणणार आहे. शांभवीचा डाव छवीला कळणार का? आणि कितीही संकटं आली तरी छवी हे सर्व खंबीरपणे कसं निभावून नेणार? हे पाहणं रंजक ठरणार आहे.
बाई-आजी आणि छवीचं विश्वासाचं नातं
प्रोमोमध्ये बाई-आजी आणि छवीमधील अतूट विश्वासाचं नातं ठळकपणे दिसून येतं. आयुष्याच्या निर्णायक क्षणी बाई-आजी प्रत्येक निर्णयासाठी छवीच्या ठाम व्यक्तिमत्त्वावर आणि विचारांवर विसंबून असतात. छवीवर असलेला बाई-आजींचा अढळ विश्वास आणि तिच्याकडून मिळणारा आधार हे या नात्याचं सार आहे.
भारती आचरेकर यांची प्रतिक्रिया
या भूमिकेविषयी बोलताना भारती आचरेकर म्हणतात, “बाई-आजी ही केवळ पारंपरिक चौकटीतील आजी नाही, तर उदारमतवादी आणि मोकळ्या विचारांची स्त्री आहे. काळानुसार बदल स्वीकारणारी, आजच्या पिढीच्या विचारांशी सहज जुळवून घेणारी आणि स्निकर घालून आत्मविश्वासाने वावरणारी ही ‘कूल’ आजी आहे. नातवंडांना समजून घेणारी, त्यांच्याशी मैत्रीपूर्ण नातं जपणारी पण घराचा कणा असलेली ही स्त्री आहे. इतक्या वर्षांच्या कारकिर्दीनंतर मी पहिल्यांदाच मराठी मालिकेत इतक्या मध्यवर्ती भूमिकेत काम करते आहे, त्यामुळे माझ्यासाठी हा एक नवा आणि उत्सुकतेचा टप्पा आहे.”
मालिकेविषयी सतीश राजवाडे यांचे मत
कलर्स मराठीचे Executive Vice President, Marathi Cluster सतीश राजवाडे म्हणाले, “आमचा प्रयत्न नेहमीच दर्जेदार आणि वेगळ्या धाटणीची कथानकं प्रेक्षकांसमोर आणण्याचा असतो. बऱ्याच काळानंतर आम्ही अशी फिक्शन मालिका घेऊन येत आहोत जी संपूर्ण कुटुंबाने एकत्र बसून पाहावी अशी आहे. ‘मी जिंकून घेईन सारं’ ही जिद्द, नात्यांची गुंतागुंत आणि मूल्यांची परंपरा यांचा संगम असलेली कथा आहे. छवीच्या आयुष्यात बाई-आजींची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. त्यांचा समृद्ध अनुभव या मालिकेचं सर्वात मोठं बळ ठरणार आहे.”
कथेत आणखी रंग भरणारी बबी आत्या
या संघर्षात महत्त्वाची भूमिका बजावणारी बबी आत्या देखील टीझरमध्ये दिसते. तिची उपस्थिती कथेला आणखी धार देणार आहे. नात्यांमधील ताणतणाव, घरातील संघर्ष आणि एका ठाम स्त्रीचा आवाज याची झलक देणारा हा प्रोमो प्रेक्षकांना अनेक प्रश्नांसह सोडून जातो.
प्रसारणाची वेळ
“येऊदे कितीही अडचणीचं वारं… मी जिंकून घेईन सारं!”
ही नवी मालिका १६ मार्चपासून दररोज संध्याकाळी ७ वाजता फक्त कलर्स मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. -
“फुला” चित्रपटातून अस्सल संगीताची मेजवानी

संगीतमय “फुला” चित्रपटाचा पोस्टर आणि संगीत प्रकाशन सोहळा दिमाखात संपन्न
वाघ्या-मुरळीच्या पारंपरिक लोकसंस्कृतीचा वेध घेत एका स्त्रीची कहाणी “फुला” या चित्रपटातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. अस्सल लोकसंगीताची मेजवानी देणाऱ्या या चित्रपटात बऱ्याच काळानंतर सात गाण्यांचा भरभक्कम अल्बम प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सांगली जिल्ह्यातील आटपाडी गावातील नवोदित तरुणांनी एकत्र येऊन हा चित्रपट साकारला असून त्यांच्या या प्रयत्नामुळे एक वेगळा आणि आशयघन विषय मोठ्या पडद्यावर येणार आहे.
पोस्टर आणि संगीत प्रकाशन सोहळा उत्साहात

ज्येष्ठ पत्रकार तसेच एबीपी माझा आणि एबीपी न्यूजचे सीनियर एक्झिक्युटिव्ह व्हाइस प्रेसिडेंट राजीव खांडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत “फुला” या चित्रपटाचा पोस्टर आणि संगीत प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडला. या सोहळ्यास चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती. तसेच प्रसिद्ध सॅक्सोफोन वादक राज सोडा यांनीही या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती लावली.
चित्रपटाच्या निर्मितीमागील टीम
पैलवान अजित शिवाजी जाधव यांनी “फुला” या चित्रपटाची निर्मिती केली असून शिवशर्विल मूव्ही आणि बोधी सिनेमा यांनी या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन अभिषेक जावीर यांचे आहे, तर पटकथा रवीकिरण जावीर यांनी लिहिली आहे. संगीत दिग्दर्शन समाधान ऐवळे यांनी केले असून सर्जनशील दिग्दर्शन अमर देवकर यांनी केले आहे. गीतलेखन रवीकिरण जावीर आणि समाधान ऐवळे यांचे आहे. छायांकन प्रताप जोशी, कला दिग्दर्शन अतुल लोखंडे, संकलन राहुल प्रजापती यांनी केले आहे. नृत्य दिग्दर्शन आशुतोष कीर्तिकर आणि सृष्टी जाधव यांचे असून वेशभूषा कोमल जावीर आणि अक्षता पाटील यांनी केली आहे. रंगभूषेची जबाबदारी समाधान भोरे यांनी सांभाळली आहे.
गाण्यांना लाभलेले दिग्गज गायकांचे आवाज
या चित्रपटातील गाण्यांना वैशाली सामंत, वैशाली माडे, रोहित राऊत, रवींद्र खोमणे, वैशाली कुलकर्णी, वैष्णवी आदोडे आणि आकाश नवगिरे यांनी आपले स्वर दिले आहेत. पारंपरिक लोकसंगीताचा साज लाभलेल्या या गाण्यांमुळे चित्रपटाच्या कथेला एक वेगळी भावनिक उंची मिळणार आहे.
राजीव खांडेकर यांचे मत
यावेळी बोलताना राजीव खांडेकर म्हणाले की, आपल्या सर्वांना आपल्या लोककला आणि लोकपरंपरांचा अभिमान असतो. ज्या कलाकारांचे आपण कौतुक करतो, त्यांच्या प्रत्यक्ष आयुष्यातील वास्तव कसे असते, यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे. नव्या दमाच्या तरुणांनी एकत्र येऊन तयार केलेला हा चित्रपट वाघ्या-मुरळींच्या आयुष्यावर आधारित असून प्रेक्षकांनी अशा वेगळ्या धाटणीच्या चित्रपटाला नक्कीच साथ द्यावी.
मुरळीच्या आयुष्याची संघर्षमय कथा
“फुला” ही एका मुरळीच्या पोटी जन्मलेल्या निरागस मुलीची संघर्षमय कथा आहे. तमाशा फड, जागरण-गोंधळ अशा पारंपरिक सांस्कृतिक पटावर आधारित ही कथा महाराष्ट्राच्या लोकपरंपरेतून आकार घेते. या चित्रपटात कान्हा तुझी बासरी, माझा राजा मल्हारी, आसरा तू माझ्या जीवाचा, कुंकू कोरलं कपाळी, मुरळी झाले मी गं बाई, कपाळी सजलं बाशिंग आणि डर्बीचा थरार अशी सात गाणी आहेत. प्रसंगानुरूप येणाऱ्या या गाण्यांमधून वाघ्या-मुरळीच्या लोकसंस्कृतीचे चित्रण करत मुरळीच्या भावविश्वाची मांडणी करण्यात आली आहे.
प्रदर्शनाची तारीख
अस्सल लोकसंस्कृती, अर्थपूर्ण कथानक आणि दमदार संगीताचा संगम असलेला “फुला” हा चित्रपट १७ एप्रिलपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे मराठी लोकपरंपरेचा वेगळा अनुभव देणारा हा चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहणे प्रेक्षकांसाठी खास ठरणार आहे.
-
‘२४ व्या झी सिने अवॉर्ड्स २०२६’ मध्ये विकी कौशलने मराठा शौर्याला दिली खास आदरांजली

‘२४ व्या झी सिने अवॉर्ड्स २०२६’मध्ये विकी कौशलच्या दमदार परफॉर्मन्समधून मराठा अभिमानाचा उत्सव
‘झी’ टीव्हीने पुन्हा एकदा भारतीय सिनेमाचा भव्य उत्सव साजरा करत ‘२४वा झी सिने अवॉर्ड्स २०२६’ हा सोहळा रंगतदार पद्धतीने पार पाडला. या सोहळ्यात बॉलीवूडमधील अनेक नामवंत कलाकार, धमाकेदार परफॉर्मन्स आणि सिनेमावर प्रेम करणारे चाहते एकत्र आले. ‘FANtertainment’ या संकल्पनेला साजेसा हा सोहळा खऱ्या अर्थाने सिनेमाचा जल्लोष ठरला. या भव्य कार्यक्रमातील सर्वात खास क्षणांपैकी एक म्हणजे अभिनेता विकी कौशल यांचा दमदार परफॉर्मन्स होता. आपल्या अभिनयासाठी ओळखला जाणारा ‘छावा’ म्हणजेच विकीने आपल्या लोकप्रिय भूमिकेची झलक स्टेजवर साकारत प्रेक्षकांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले.
मराठा शौर्याला अनोखी आदरांजली
भारतीय सिनेमाच्या या भव्य सोहळ्यात यंदा प्रेक्षकांना एक अत्यंत खास आणि अभिमानास्पद क्षण अनुभवायला मिळाला. लोकप्रिय अभिनेता विकी कौशल महाराष्ट्राची परंपरा, शौर्य आणि गौरवाला साजेसा एक भव्य परफॉर्मन्स सादर करत महान मराठा योद्ध्यांना अनोख्या पद्धतीने आदरांजली अर्पण करताना दिसला. महाराष्ट्राच्या शौर्यगाथांवर आधारित हा परफॉर्मन्स पारंपरिक शैलीत सादर करण्यात आला.
भव्य प्रवेशाने रंगला जल्लोष
या भव्य सादरीकरणाची सुरुवात विकीच्या दमदार एंट्रीने झाली. तो एका भव्य हत्तीवरून प्रेक्षकांमध्ये प्रवेश करताना दिसला. नाशिक ढोलाच्या गजरात आणि भगव्या झेंड्यांच्या लाटांमध्ये तयार झालेल्या जल्लोषमय वातावरणाने संपूर्ण सभागृह दणाणून गेले. मराठा परंपरा, पराक्रम आणि सांस्कृतिक अभिमानाचा साज चढवणारा हा परफॉर्मन्स प्रेक्षकांसाठी अविस्मरणीय ठरला.
सोहळा पाहण्याची संधी
अशा अनेक अविस्मरणीय क्षणांनी सजलेला ‘२४वा झी सिने अवॉर्ड्स २०२६’ हा भव्य सोहळा पाहायला विसरू नका. हा कार्यक्रम रविवार, १५ मार्च रोजी सायंकाळी ७.३० वाजता फक्त झी सिनेमा, झी टीव्ही आणि झी५ या माध्यमांवर प्रेक्षकांना पाहता येणार आहे.
-
‘आपली यारी… गावावर भारी!’

‘पिफ्फ’मध्ये तिहेरी सन्मान पटकावलेला ‘बाप्या’ १५ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला
आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरव मिळवलेला आणि अनोख्या संकल्पनेमुळे चर्चेत असलेला ‘बाप्या’ हा आगळावेगळा मराठी चित्रपट आता प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झाला आहे. ‘आपली यारी… गावावर भारी!’ अशी हटके टॅगलाईन असलेला हा चित्रपट १५ मे रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. वर्किंग आय फिल्म्स प्रस्तुत या चित्रपटाचे नुकतेच प्रदर्शित झालेले पोस्टर सध्या सोशल मीडियावर प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत असून या वेगळ्या चित्रपटाबद्दलची उत्सुकता अधिकच वाढवत आहे.
पोस्टरमधील रहस्यमय संकेत
चित्रपटाच्या पोस्टरमध्ये पाठमोरी उभी असलेली एक व्यक्ती आणि तिला पाहून गावातील इतर पात्रांच्या चेहऱ्यावर उमटलेले आश्चर्य, कुतूहल आणि प्रश्नार्थक भाव अनेक प्रश्न निर्माण करतात. विशेष म्हणजे पोस्टरमधील ती पाठमोरी व्यक्ती म्हणजे अभिनेत्री राजश्री देशपांडे असल्याचे कळतेय. मात्र ती अशी का उभी आहे? तिच्या आगमनाने गावात एवढे आश्चर्य का निर्माण होते? आणि तिच्या येण्याने नेमके कोणते बदल घडणार आहेत? असे अनेक प्रश्न या पोस्टरमधून निर्माण झाले आहेत.
मैत्रीभोवती फिरणारी कथा
या सर्व प्रश्नांची उत्तरे अद्याप गूढ ठेवण्यात आली असून त्यामुळे चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे. मैत्री आणि नातेसंबंधांभोवती फिरणाऱ्या या वेगळ्या कथेत नेमके काय घडते, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना चित्रपटाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. ‘आपली यारी… गावावर भारी!’ ही ओळही या चित्रपटातील मैत्रीची ताकद आणि त्यातून घडणाऱ्या रंजक घटनांची झलक देते.
कलाकारांची दमदार फळी
या अनोख्या आणि हटके संकल्पनेवर आधारित चित्रपटात प्रतिभावान अभिनेता गिरीश कुलकर्णी झळकणार असून त्यांच्यासह राजश्री देशपांडे, देविका दफ्तरदार, श्रीकांत यादव आणि आर्यन मेंगजी हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. पोस्टरमुळेच चित्रपटाची कथा नेमकी काय असेल, याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
दिग्दर्शन आणि निर्मिती
समीर तिवारी यांच्या दिग्दर्शनाखाली साकारलेला ‘बाप्या’ हा चित्रपट मनोरंजनासोबतच आशयघन आणि वेगळ्या धाटणीच्या कथानकामुळे विशेष ठरणार आहे. वर्किंग आय फिल्म्स प्रस्तुत या चित्रपटाचे निर्माते मुत्कल तेलंग आणि समीर तिवारी आहेत.
‘पिफ्फ’मध्ये तिहेरी सन्मान
प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाने मोठे यश मिळवत पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल (PIFF) मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री असे तीन मानाचे पुरस्कार पटकावले आहेत. या तिहेरी सन्मानामुळे चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.
दिग्दर्शक समीर तिवारी यांचे मत
दिग्दर्शक समीर तिवारी यांच्या मते हा चित्रपट मैत्री, नाती आणि त्यातून घडणाऱ्या रंजक प्रसंगांची एक वेगळी आणि अनोखी कथा आहे. प्रेक्षकांना हसवत-खेळवत एक वेगळा अनुभव देण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला असून ‘आपली यारी… गावावर भारी!’ ही ओळच या चित्रपटाचा आत्मा असल्याचे ते सांगतात.
रहस्य उलगडण्याची उत्सुकता
राजश्री देशपांडे यांची ही रहस्यमय व्यक्तिरेखा नेमकी कशी आहे? तिच्या आगमनाने गावात असा खळबळजनक प्रतिसाद का उमटतो? आणि ‘आपली यारी… गावावर भारी!’ म्हणवणारी ही मैत्री नेमकी कोणती? या सर्व प्रश्नांची उत्तरे पुढील दिवसांत समोर येतील आणि त्याच वेळी या अनोख्या चित्रपटाचे आणखी काही पैलू उलगडत जातील.
-
‘सनई चौघडे’ मध्ये अदिती सारंगधर पहिल्यांदाच आईची भूमिका साकारणार

झी मराठीवरील ‘सनई चौघडे’ या नव्या मालिकेत लोकप्रिय अभिनेत्री अदिती सारंगधर एका दमदार आणि महत्त्वपूर्ण भूमिकेत प्रेक्षकांसमोर येत आहे. या मालिकेत ती ‘तेजस्विनी खानोलकर’ ही व्यक्तिरेखा साकारत असून, तिच्या आयुष्यातील अनेक गुंतागुंतीच्या भावनांनी समृद्ध अशी ही भूमिका असल्याचं अदिती सांगते. दिसायला जे दिसतं ते नेहमी तसं असतंच असं नाही, अशा अनेक स्तरांनी भरलेली तेजस्विनी ही व्यक्तिरेखा असून ती आपल्या कुटुंबासाठी जीव ओवाळून टाकणारी आणि मुलांवर अत्यंत प्रेम करणारी आई आहे.
आईची भूमिका स्वीकारण्यामागचं कारण
अदिती सांगते की, झी मराठीवर तिने यापूर्वी नायिका आणि खलनायिकेच्या भूमिका साकारल्या आहेत; मात्र *‘सनई चौघडे’*मध्ये ती पहिल्यांदाच आईची भूमिका करत आहे. सुरुवातीला आईची भूमिका करायला ती तयार नव्हती, कारण प्रत्येक कलाकाराला स्वतःच्या प्रवासात काही टप्पे स्वीकारावे लागतात. पण काळानुसार टेलिव्हिजनमध्येही चांगले बदल होत आहेत आणि मजबूत, विचारपूर्वक लिहिलेल्या व्यक्तिरेखा प्रेक्षकांसमोर येत आहेत. त्यामुळे सखोल विचार करून आणि स्वतःच्या तत्त्वांचा सन्मान राखत तिने ही भूमिका स्वीकारली.
व्यक्तिरेखेचे वेगळेपण आणि भावविश्व

अदितीच्या मते, तेजस्विनी ही फक्त आईची भूमिका नसून अनेक अनुभवांनी घडलेली एक स्त्री आहे. तिच्या आयुष्यातील अनेक प्रसंगांनी तिच्या मनावर खोल परिणाम झालेले आहेत. त्यामुळे तिच्या व्यक्तिमत्त्वात एक वेगळं वजन आणि भावनिक खोली आहे. तिच्या भोवती अनेक घटना फिरत असतात आणि त्या प्रत्येक घटनेत तिचं मत, तिची भूमिका आणि तिची संघर्षशील वृत्ती स्पष्ट दिसते.
दिग्दर्शक आणि टीमसोबत काम करण्याचा अनुभव
या मालिकेत काम करण्यामागे आणखी एक कारण म्हणजे दिग्दर्शक-निर्माते राजू सावंत यांच्यासोबत काम करण्याची संधी. अदितीच्या मते, चांगल्या कलाकाराला चांगला दिग्दर्शक मिळणं आणि चांगल्या दिग्दर्शकाला योग्य कलाकार मिळणं ही भाग्याची गोष्ट असते. त्यामुळे ही भूमिका स्वीकारताना तिला विशेष आनंद झाला.
पूर्वीच्या भूमिकांपेक्षा वेगळा अनुभव
अदितीने आपल्या कारकिर्दीत अनेक लक्षात राहणाऱ्या व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. *‘वादळवाट’*मधील रमा चौधरी, *‘लक्ष’*मधील सलोनी देशमुख, *‘हम बने तुम बने’*मधील तुलिका, *‘येऊ कशी तशी मी नांदायला’*मधील मालविका आणि आता *‘सनई चौघडे’*मधील तेजस्विनी — प्रत्येक भूमिकेचे वेगवेगळे कंगोरे असल्याचं ती सांगते. प्रत्येक व्यक्तिरेखेचं बोलणं, वागणं, दिसणं आणि विचार करण्याची पद्धत वेगळी असते. त्यामुळे त्या व्यक्तिरेखेचं वेगळेपण जपण्याचा प्रयत्न ती नेहमी करत आली आहे.
सहकलाकार आणि युनिटसोबतची मैत्री
या मालिकेच्या सेटवर आधीपासून परिचित असलेले काही सहकलाकार असल्यामुळे काम करताना एक वेगळं समाधान मिळाल्याचं अदिती सांगते. अभिनेत्री मेघना हिला ती आधीपासून ओळखते. तसेच निर्माती मनस्वीही तिला परिचित आहे. याशिवाय बॅकस्टेज काम करणाऱ्या अनेक सदस्यांशीही तिची चांगली ओळख असल्यामुळे स्वतःच्या माणसांमध्ये काम करत असल्याची भावना तिला मिळाली.
कलाकार आणि युनिट यांचं नातं महत्त्वाचं
अदितीच्या मते, कलाकारांमध्ये मैत्री होणं स्वाभाविक असतं; पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे संपूर्ण युनिटसोबतचं नातं. कलाकारांनी आपल्या युनिटला सोबत घेऊन पुढे जायला हवं. शूटिंगच्या वेळी युनिटसोबत वेळ घालवणं, एकत्र जेवणं आणि कामाचा आनंद वाटून घेणं तिला खूप आवडतं. नव्या कलाकारांसोबत काम करताना मिळणारी नवीन ऊर्जा देखील तिला प्रेरणा देत असल्याचं ती सांगते.
१६ मार्चपासून प्रेक्षकांच्या भेटीला
तेजस्विनी खानोलकरच्या रूपात अदिती सारंगधर पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येत आहे. तिच्या या नव्या आणि भावनिक व्यक्तिरेखेचा प्रवास पाहण्यासाठी ‘सनई चौघडे’ ही मालिका १६ मार्चपासून दररोज रात्री ८:३० वाजता फक्त झी मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
-
तब्बल तेरा वर्षांनी ट्रेंडसेटर गायक अभिजीत सावंतने केलं या मराठी चित्रपटासाठी खास गाणं

मराठी संगीतविश्वात आपला वेगळा ठसा उमटवणारा आणि इंडियन आयडॉलमधून घराघरात पोहोचलेला गायक अभिजीत सावंत पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 2025 वर्षात ट्रेंडसेटर ठरलेला हा गायक आता पुन्हा एकदा आपल्या सुरेल आवाजातून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. अनेक वर्षांपासून आपल्या वेगळ्या गायनशैलीमुळे अभिजीत सावंतने संगीतप्रेमींच्या मनात खास स्थान निर्माण केलं आहे.
तेरा वर्षांनंतर पुन्हा चित्रपटासाठी गायन
तब्बल तेरा वर्षांनंतर अभिजीत सावंत पुन्हा एकदा मराठी चित्रपटासाठी गाणं गाताना दिसणार आहे. ‘सखे गं साजणी’ या आगामी मराठी चित्रपटाचं टायटल ट्रॅक त्याने गायलं असून या गाण्यामुळे प्रेक्षकांमध्ये विशेष उत्सुकता निर्माण झाली आहे. ‘सर सुखाची श्रावणी’ या सदाबहार गाण्यानंतर आता पुन्हा एकदा चित्रपटातील गाण्यातून तो प्रेक्षकांना भेटणार आहे. विशेष म्हणजे या गाण्यात अभिजीत सावंतची एक झलकही पाहायला मिळत आहे.
गाणं आणि अभिनय दोन्हीचा अनुभव

नुकतंच ‘सखे गं साजणी’ या चित्रपटाचं टायटल गाणं प्रदर्शित झालं असून त्याला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या गाण्याबद्दल बोलताना अभिजीत सावंत सांगतो की, चित्रपटासाठी गाणं करणं हे प्रत्येक गायकाचं स्वप्न असतं आणि ही संधी मिळाल्याचा त्याला खूप आनंद आहे. ‘सखे गं साजणी’ चित्रपटाचं टायटल ट्रॅक गाण्याची संधी मिळाल्यापासून या गाण्याबद्दल त्यालाही उत्सुकता होती. या गाण्यात गाण्यासोबत अभिनय करण्याची संधी मिळाल्यामुळे हा अनुभव त्याच्यासाठी आणखी खास ठरला आहे.
प्रेक्षकांच्या प्रेमाची अपेक्षा
अभिजीत सावंतच्या आवाजाची जादू प्रेक्षकांनी अनेक गाण्यांतून अनुभवली आहे. ‘चाल तुरू तुरू’, ‘रुपेरी वाळूत’ अशा गाण्यांमधून त्याच्या आवाजाने रसिकांना मंत्रमुग्ध केलं आहे. आता ‘सखे गं साजणी’ या नव्या गाण्यामुळेही प्रेक्षकांना पुन्हा एकदा त्याच्या सुरेल आवाजाचा आनंद घेता येणार आहे. आजवर प्रेक्षकांनी त्याच्या प्रत्येक कलाकृतीला भरभरून प्रेम दिलं आहे, आणि याही गाण्याला तेवढंच प्रेम मिळेल अशी आशा अभिजीत सावंतने व्यक्त केली आहे.
