Home

  • टीव्हीच्या चौकटीतून ऐश्वर्या शेटेची रंगभूमीच्या भव्य अवकाशात एन्ट्री… ‘आता थांबवायचं कसं?’

    मुंबई : मराठी दूरचित्रवाणी विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री ऐश्वर्या शेटे आता आपल्या कारकिर्दीतील एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण करत आहे. विविध मालिकांमधून घराघरात पोहोचलेल्या ऐश्वर्याची आता दिग्दर्शक संदीप दंडवते यांच्या ‘आता थांबवायचं कसं?’ या नाटकातून रंगमंचावर दमदार एंट्री होत आहे. प्रवीण भोसले, समृद्धी तांबे, गंधाली कुलकर्णी, सुनंदा काळुसकर आणि भरत नारायणदास ठक्कर या पाच निर्मात्यांनी एकत्र येत या नाटकाची निर्मिती केली आहे.

    मालिकांमधील धावपळ, कॅमेऱ्यासमोरील अभिनय आणि सततच्या शूटिंगच्या वेळापत्रकातून थेट रंगभूमीवर येण्याचा अनुभव ऐश्वर्यासाठी विशेष ठरत आहे. नाटकाच्या तालमीदरम्यान अभिनयातील बारकावे, संवादातील विविध छटा आणि पात्रांच्या भावविश्वाचा सखोल अभ्यास करण्याची संधी मिळत असल्याचे ती सांगते. मालिकांमुळे प्रसिद्धी मिळते, मात्र रंगमंचावर प्रेक्षकांच्या थेट प्रतिक्रियांचा अनुभव हा कलाकारासाठी वेगळाच आनंद देणारा असतो, असे तिचे मत आहे.

    या नाटकात ज्येष्ठ अभिनेत्री सुकन्या मोने आणि डॉ. गिरीश ओक हे ऐश्वर्याच्या आई-वडिलांच्या भूमिकेत आहेत. तालमींच्या काळात या दोन्ही दिग्गज कलाकारांकडून खूप काही शिकायला मिळाल्याचे ती आवर्जून सांगते. सुकन्या मोने यांची माया आणि गिरीश ओक यांचा अनुभव यामुळे नाटकातील वातावरण कुटुंबासारखे वाटू लागल्याची भावना तिने व्यक्त केली.

    ‘आता थांबवायचं कसं?’ हे नाटक केवळ मनोरंजनापुरते मर्यादित नसून आजच्या पिढीसमोरील संवादाचा अभाव, मोबाईलचे वाढते व्यसन आणि पालक-मुलांमधील वाढत चाललेली दरी या विषयांवर भाष्य करणारे आहे. “निर्जीव फोन स्मार्ट झालाय आणि जिवंत माणूस बावळट” हे नाटकातील वाक्य आजच्या वास्तवावर अचूक बोट ठेवते, असे ऐश्वर्या म्हणते.

    मालिका विश्वात जसे प्रेक्षकांनी प्रेम दिले, तसेच प्रेम रंगभूमीवरही मिळेल, असा विश्वास व्यक्त करत तिने तरुणांनी आणि त्यांच्या पालकांनी हे नाटक एकत्र येऊन पाहावे, असे आवाहन केले आहे.

  • रेड एफएम मराठी फिल्म फेस्टिव्हल सीझन ६ चा भव्य आणि दिमाखदार समारोप

    रेड एफएमचा मराठी फिल्म फेस्टिव्हल सीझन ६ पुण्यातील ई-स्क्वेअर येथे तीन अविस्मरणीय दिवसांच्या चित्रपट, संस्कृती, संवाद, साजरेपणा आणि प्रभावी कथन यांच्या साक्षीने यशस्वीरीत्या संपन्न झाला. या महोत्सवाला प्रेक्षक, कलाकार, दिग्दर्शक आणि चित्रपटप्रेमी यांच्याकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला असून हा सीझन आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या आणि प्रभावी आवृत्त्यांपैकी एक ठरला.

    ९० हून अधिक नामवंत कलाकार, अभिनेते, दिग्दर्शक आणि मराठी चित्रपटसृष्टीतील मान्यवरांच्या उपस्थितीमुळे रेड एफएम मराठी फिल्म फेस्टिव्हल सीझन ६ हा मराठी चित्रपटसृष्टीचा एक खरा उत्सव ठरला. येथे कालातीत क्लासिक्सपासून ते समकालीन प्रभावी कथांपर्यंत मराठी सिनेमाच्या विविध पैलूंचा उत्सव साजरा करण्यात आला.

    या महोत्सवाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तो पूर्णपणे मोफत आणि सर्वांसाठी खुला होता. त्यामुळे हजारो चित्रपटप्रेमींना मोठ्या पडद्यावर नामांकित मराठी चित्रपट, दिग्गज कलाकारांशी थेट संवाद, लाइव्ह इंटरॅक्शन आणि अविस्मरणीय सिनेमॅटिक क्षण अनुभवता आले.
    या महोत्सवात स्नोफ्लॉवर, मुळशी पॅटर्न, जैत रे जैत, बाप्या, एप्रिल मे ९९, जुना फर्निचर, गोंधळ, पांघरुण, जारण, दशावतार, सिनेमॅन, तिघी, माझा पती करोडपती आणि इतर अनेक प्रसिद्ध व समीक्षकांनी गौरवलेले चित्रपट प्रदर्शित करण्यात आले.

    महोत्सवात प्रेक्षकांना अनेक संस्मरणीय क्षण अनुभवायला मिळाले. ज्यामध्ये ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांची उपस्थिती, महेश मांजरेकर यांचे दमदार आगमन, सचिन पिळगांवकर यांच्याशी मनमोकळा संवाद, अमृता सुभाष यांची प्रभावी उपस्थिती, राजश्री देशपांडे यांची ऊर्जा, छाया कदम यांच्या कामगिरीचा गौरव, तसेच डॉ. मोहन आगाशे, किशोरी शहाणे, भारती आचरेकर, सिद्धार्थ जाधव, नेहा पेंडसे, अनुषा दांडेकर, भूषण प्रधान आणि इतर अनेक मान्यवरांसोबत झालेले अर्थपूर्ण संवाद यांचा समावेश होता.

    या महोत्सवात अनेक राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त कलाकार आणि सिनेमॅटिक योगदान देणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या उत्कृष्ट कार्यासाठी सन्मानित करण्यात आले.

    भावनिक प्रेक्षक प्रतिक्रिया, जुन्या कल्ट क्लासिक्सच्या आठवणी जागवणारे प्रदर्शन, सेलिब्रिटींचे अनौपचारिक परफॉर्मन्स, पॅनल चर्चा, स्टँडिंग ओव्हेशन आणि मनाला भिडणारे सिनेमॅटिक क्षण – या सर्वांनी मिळून प्रत्येक दिवस हा एक उत्सव बनवला.

    भरगच्च प्रेक्षक उपस्थितीपासून ते संस्मरणीय सेलिब्रिटी क्षणांपर्यंत, रेड एफएम मराठी फिल्म फेस्टिव्हल सीझन ६ ने पुन्हा एकदा सिद्ध केले की मराठी चित्रपटसृष्टी सर्व पिढ्यांतील प्रेक्षकांना प्रेरित करते, विकसित होते आणि त्यांच्याशी खोलवर नाते जोडते.

    आणखी एका यशस्वी सीझननंतर या महोत्सवाने असंख्य आठवणी, अर्थपूर्ण संवाद आणि मराठी चित्रपटांविषयी अधिक दृढ प्रेम मागे ठेवले आहे.

    पुढील सीझनपर्यंत – कथा सुरू राहतील, संवाद जिवंत राहतील आणि सिनेमा साजरा होत राहील.

    महोत्सवाच्या यशाबद्दल रेड एफएमच्या डायरेक्टर आणि COO निशा नारायणन म्हणाल्या, “रेड एफएम मराठी फिल्म फेस्टिव्हलचा सहावा सीझन पुन्हा एकदा सिद्ध करतो की मराठी चित्रपटांना ओळख नाही, तर त्यांच्या कथा सादर करण्यासाठी योग्य व्यासपीठाची गरज आहे. पुण्यातील तीन अविस्मरणीय दिवसांमध्ये आम्ही सिनेमाच्या इतिहासाचा आणि नव्या काळातील कथनाचा अद्भुत संगम पाहिला. या प्रवासात दिग्गज कलाकारांचा आशीर्वाद आणि प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. प्रादेशिक आवाजांना व्यासपीठ देण्याच्या उद्देशाने सुरू झालेला हा उपक्रम आज एक चळवळ बनला आहे. निर्माते, कलाकार, तंत्रज्ञ आणि स्वप्न पाहणाऱ्या सर्वांच्या योगदानातून ही चळवळ अधिक बळकट झाली आहे. हा आतापर्यंतचा आमचा सर्वात मोठा उत्सव ठरला असून समुदाय-आधारित सिनेमाच्या शक्तीचे हे जिवंत उदाहरण आहे. या कथा इथे थांबत नाहीत, त्या अधिक प्रभावी होत जातील.”

    रेड एफएम बद्दल:

    रेड एफएम ही भारतातील सर्वात मोठ्या रेडिओ नेटवर्कपैकी एक आहे. “बजाते रहो!” या ब्रँड फिलॉसॉफीसह रेड एफएम आपल्या श्रोत्यांशी भावनिक नाते निर्माण करते. देशभरातील ६८ रेडिओ स्टेशन्सच्या माध्यमातून, रेड एफएम डिजिटल शो, ऑन-ग्राउंड इव्हेंट्स, पॉडकास्ट्स आणि स्वतंत्र संगीताला व्यासपीठ देत ३६०-डिग्री मनोरंजन अनुभव देते. ६६३ हून अधिक पुरस्कार जिंकलेल्या रेड एफएमला ‘बेस्ट ब्रँड’, ‘बेस्ट एफएम स्टेशन’ आणि ‘बेस्ट आरजे’ अशा सन्मानांनी गौरविण्यात आले आहे.

  • NH Studioz भारताचा सर्वात आयकॉनिक शो दूरदर्शनच्या प्राईम टाईमवर घेऊन येत आहे२७ मे २०२६

    मुंबई: NH Studioz ने ‘कौन बनेगा करोडपती’ या शोचे दूरदर्शनवरील प्रक्षेपणाचे हक्क मिळवले आहेत. यामुळे भारताचा हा अत्यंत लोकप्रिय क्विझ शो दूरदर्शनच्या प्राईम-टाइम लाईन-अपमध्ये रोज रात्री ९ वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
    या निर्णयामुळे दूरदर्शनच्या मनोरंजन क्षेत्रातील स्थान आणखी मजबूत होईल आणि देशभरातील कोट्यवधी प्रेक्षकांमध्ये या शोचे सदाबहार आकर्षण पुन्हा निर्माण होईल, अशी अपेक्षा आहे.
    महानायक अमिताभ बच्चन यांनी होस्ट केलेल्या ‘कौन बनेगा करोडपती’ या शोने भारतीय टेलिव्हिजनला एक नवी ओळख दिली आणि पिढ्यानपिढ्या लोकांच्या मनात घर करून तो एक सांस्कृतिक उत्सव बनला. या भागीदारीच्या माध्यमातून, दूरदर्शनच्या शहरी आणि ग्रामीण भागातील अफाट पोहोचचा वापर करून हा शो जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा NH Studioz चा मानस आहे.
    भारतीय प्रेक्षकांमध्ये सध्या जुन्या आठवणींना उजाळा देणारा (नॉस्टॅल्जिया) आणि संपूर्ण कुटुंबाने एकत्र बसून पाहण्याचा कंटेंट पुन्हा एकदा लोकप्रिय होत असतानाच हा निर्णय घेण्यात आला आहे. याआधी कोविड काळातही उद्योग समीक्षकांनी असाच अनुभव घेतला होता, जेव्हा दूरदर्शनवर ‘महाभारत’च्या पुनक्षेपणाने रेकॉर्डब्रेक व्ह्यूअरशिप मिळवली होती आणि भारतातील टेलिव्हिजन पाहण्याचे गणितच बदलून टाकले होते.
    “आमचा ठाम विश्वास आहे कि सदाबहार कंटेंट कोणत्याही पिढीचा किंवा प्लॅटफॉर्मचा असला, तरी तो आपले नवीन प्रेक्षक शोधून घेतोच,” असे NH Studioz चे चेअरमन श्री. नरेंद्र हिरावत यांनी म्हटले. “कौन बनेगा करोडपती हा केवळ एक टेलिव्हिजन शो नसून ती एक भावना आहे, ज्याच्याशी संपूर्ण भारतातील प्रेक्षक वर्षानुवर्षे जोडलेले आहेत. हा शो दूरदर्शनच्या प्राईम-टाइम बँडवर आणल्यामुळे जुन्या प्रेक्षकांना तो अनुभव पुन्हा जगण्याची संधी मिळेल, तर नवीन प्रेक्षकांना या अप्रतिम फॉरमॅटची जादू अनुभवता येईल.”
    दूरदर्शनची देशातील सर्वात व्यापक पोहोच लक्षात घेता, ‘केबीसी’ (KBC) च्या समावेशामुळे प्रेक्षकांचे मनोरंजन तर होईलच, सोबतच प्राईम-टाइम सेगमेंटमध्ये दूरदर्शनच्या मनोरंजनात्मक कार्यक्रमांची बाजू अधिक भक्कम होईल. हे संपादन टेलिव्हिजन आणि डिजिटल क्षेत्रात आयकॉनिक मनोरंजन प्रॉपर्टीज पुनरुज्जीवित करण्यावर NH Studioz चा वाढता भर दर्शवते, ज्यामुळे भारतातील लोकप्रिय फॉरमॅट्सची पोहोच आणि आयुष्य अधिक वाढवता येईल.

  • कॅप्टन भोंदू बाबाचा पर्दाफाश करणार ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’; मोशन पोस्टरमधून उलगडले रहस्याचे संकेत

    “आता सगळं उघड होणार…!” टॅगलाईनमुळे चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता

    समाजात घडणाऱ्या धक्कादायक घटनांवर आणि गाजलेल्या प्रकरणांवर आधारित चित्रपट नेहमीच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतात. वास्तववादी मांडणी आणि समाजातील लपलेल्या बाजूंवर प्रकाश टाकणाऱ्या अशाच एका आगामी मराठी चित्रपटाची आता घोषणा करण्यात आली आहे. ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ या चित्रपटाचे मोशन पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले असून, त्यानंतर चित्रपटाबद्दलची चर्चा जोर धरताना दिसत आहे.

    २ ऑक्टोबर २०२६ रोजी होणार प्रदर्शित

    मोशन पोस्टरद्वारे करण्यात आलेल्या घोषणेनुसार ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ हा चित्रपट २ ऑक्टोबर २०२६ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. जैन फिल्म प्रोडक्शन आणि मातोश्री एन्टरटेन्मेंट वर्ल्ड प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती देवेंद्र भट, सुर्यकांत भुंडे आणि प्रशांत कदमपुरे यांनी केली आहे. वास्तवाशी जवळीक साधणाऱ्या कथानकामुळे हा चित्रपट सुरुवातीपासूनच चर्चेचा विषय ठरत आहे.

    मोशन पोस्टरमधून मिळाले अनेक संकेत

    चित्रपटाच्या पोस्टरमध्ये एक पाठमोरी व्यक्ती दिसते. कुर्ता-पायजमा आणि जॅकेट परिधान केलेल्या या व्यक्तीच्या हातात पाचशे रुपयांच्या नोटांची बंडल्स आहेत. त्याच्या सभोवती क्राईम सीनच्या पिवळ्या फिती दिसतात. समोरील भिंतीवर काही फोटो आणि ‘नाशिक’, ‘भोंदूबाबा’ अशी शब्दरचना दिसते. टेबलावर तांब्याचा जग, पुस्तके, चहाचा ग्लास आणि इतर वस्तू ठेवण्यात आल्या आहेत. या सर्व गोष्टींमधून एका गाजलेल्या प्रकरणाचा संदर्भ दिल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

    “आता सगळं उघड होणार…”

    चित्रपटाची “आता सगळं उघड होणार…!” ही टॅगलाईन सध्या सोशल मीडियावर विशेष चर्चेत आहे. ही कथा नेमकी कोणत्या घटनांवर आधारित आहे, कोणाचा पर्दाफाश होणार आहे आणि कोणत्या ‘फाईल्स’ उघड केल्या जाणार आहेत, याबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

    दिग्दर्शक स्वरूप बी. सावंत यांचे धाडसी पाऊल

    या चित्रपटाचे दिग्दर्शन स्वरूप बी. सावंत यांनी केले असून, वास्तवदर्शी विषय हाताळत त्यांनी एक धाडसी प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे. चित्रपटाची कथा सागरकुमार एस. जैन यांनी लिहिली असून पटकथा आणि संवादलेखन संजय नवगिरे यांनी केले आहे.

    कलाकारांची नावे अद्याप गुप्त

    विशेष म्हणजे चित्रपटातील कलाकारांची नावे अद्याप जाहीर करण्यात आलेली नाहीत. निर्मात्यांनी कथानक आणि स्टारकास्टबाबत सध्या गुप्तता राखली असून, लवकरच चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

    तांत्रिक बाजूही मजबूत

    या चित्रपटाचे सिनेमॅटोग्राफी आकाश काकडे करणार असून कला दिग्दर्शन अक्षय आंबेकर यांनी सांभाळले आहे. वेशभूषा आकांक्षा गांधी यांची असून, सचिन घणवंत प्रोडक्शन हेड तर नेहा घोडके प्रॉडक्शन कंट्रोलर म्हणून काम पाहणार आहेत.

    मोशन पोस्टरमधून मिळालेल्या संकेतांमुळे ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ हा चित्रपट आता मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक चर्चेत असलेल्या आगामी प्रोजेक्ट्सपैकी एक ठरताना दिसत आहे.

  • लाडक्या कलाकारांसोबत रंगला, झी मराठी ‘आंबा महोत्सव’ पर्व २

    नव्या मालिकेसह, वहिनींसाठी लवकरच खास सरप्राईज !

    महाराष्ट्राची महावाहिनी म्हणून आपले स्थान अधिक भक्कम करत झी मराठी ‘ने अत्यंत उत्साहात आणि दिमाखात आपल्या ‘ आंबा महोत्सव २०२६’ च्या दुसऱ्या पर्वाचे आयोजन केले होते. फळांचा राजा आंबा आणि मनोरंजनाची राणी झी मराठी यांनी या महोत्सवात कलाकार, पत्रकार आणि मान्यवर मंडळींसोबत अविस्मरणीय अनुभव घेतला. पहिल्या पर्वाला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर झी मराठीने यंदा अधिक भव्य आणि आकर्षक स्वरूपात ‘आंबा महोत्सव’चे दुसरे पर्व सादर केले. या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनची जबाबदारी घेतली होती ती अभिनेता प्रणव रावराणे आणि अभिनेत्री तनिष्का विशे यांनी.

    या महोत्सवात ‘सनई चौघडे’, ‘कमळी’, ‘तारिणी’, ‘शुभ श्रावणी’, ‘दीपज्योती’, ‘वीण दोघातली हे तुटेना’, ‘सावळ्याची जणू सावली’, ‘लक्ष्मी निवास’ आणि ‘तुला जपणार आहे’ या मालिकांमधील कलाकारांनी उत्साहाने सहभाग घेतला. हास्य, आठवणी आणि आंब्यावर आधारित मजेशीर खेळांनी संपूर्ण दिवस रंगून गेला. सर्वात पहिल्या खेळात जोड्या मंचावर अवतरल्या आणि चढाओढ रंगली ती वर टांगलेल्या टोपलीत कोण जास्त लवकर आंबे पोहोचवणार? या खेळात धमाल उडाली. काही जोडप्यांनी खेळात भाग घेतला, तर काहींनी प्रेक्षक म्हणून या मजेचा मनमुराद आनंद लुटला. यानंतर कलाकारांनी “आंबा-कारल शॉट्स” या खेळात दरम्यान सेटवरील अनेक मजेशीर किस्से उलगडले यात आपल्या लाडक्या ज्योतीला कारल्याचा जूस प्यावा लागला. त्यानंतर घरातील मोठ्यांनी पुढाकार घेत आमरस काढण्याची जबाबदारी सांभाळली. आणि आमरस तयार करून त्यांनी आपल्या टीममधील सह कलाकारांना तो चाखायला दिला आणि आपल्या टीमला विजयी बनवले. शेवटी झी मराठीच्या सर्वात छोट्या सदस्यांनी म्हणजेच सावल्याची जणू सावली मालिकेतील अबीर आणि ओवी यांनी “आंबा-पाणी” हा खेळ रंगवला. या खेळात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनीच उत्साहाने सहभाग घेत जल्लोष केला. एकूणच, आंबा महोत्सवात प्रत्येक जण उत्साह, आनंद आणि धमाल मस्तीमध्ये रंगून गेला. खेळांतील विजेत्यांना आणि सर्व कलाकार, पत्रकार मित्रांना हापूस आंब्यांची भेट देण्यात आली, ज्यामुळे उत्सवाची गोडी आणखी वाढली.

    याच मंचावरून झी मराठीने त्यांच्या आगामी ‘कृष्णाईच्या लेकी’ ह्या मालिकेचा नवीन प्रोमो पत्रकार आणि प्रेक्षकांसमोर आणला. या मालिकेतून बहुआयामी आणि जेष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ ‘कृष्णा आई’ची भूमिका साकारणार आहेत. तसेच, या ‘आंबा महोत्सवात’ आणखी काही खास चाहूलही लागली असून महाराष्ट्रातील लाडक्या वहिनींसाठी एक आनंदाची बातमी ती म्हणजे ‘दार उघड बये’ म्हणत झी मराठी लवकरच कोणीतरी येणार आहे. याचसोबत मराठी Z5 ला एक वर्ष पूर्ण झाल्याचा आनंदही येथे साजरा करण्यात आला आणि वाहिनीने प्रेक्षकांचे मनापासून आभार मानले.

    ‘आंबा महोत्सव’च्या दुसऱ्या पर्वासह झी मराठीने परंपरा, संस्कृती, आणि प्रभावी कथाकथनाचा उत्सव अधिक भक्कमपणे साजरा केला आहे.

  • राहुल देशपांडे यांची अभंगवारी : जेव्हा भक्ती संगीताच्या पलीकडे जाऊन भावना बनते

    काही मैफिली फक्त ऐकल्या जात नाहीत.
    त्या मनात उतरतात.
    आणि शेवटचा स्वर संपल्यानंतरही दीर्घकाळ आत कुठेतरी घुमत राहतात.

    राहुल देशपांडे यांची अभंगवारी हा तसाच एक अनुभव आहे.

    महाराष्ट्राच्या संतपरंपरेतून जन्मलेली ही संगीतमय यात्रा आज जगभरातील रसिकांच्या मनात घर करणारी एक वैश्विक भावयात्रा बनली आहे. तानपुर्‍याचा नाद, टाळ-मृदंगाचा ठेका आणि संतांच्या शब्दांमधील अध्यात्म यांच्या संगमातून अभंगवारी ही केवळ एक मैफल राहत नाही, तर ती एक सामूहिक अनुभूती बनते.

    आजच्या धावपळीच्या, आवाजाने भरलेल्या जगात अभंगवारी माणसाला थांबायला शिकवते.
    स्वतःकडे परत यायला शिकवते.
    मनाने ऐकायला शिकवते.

    राहुल देशपांडे यांच्या आवाजात केवळ सुरांची ताकद नाही, तर पूर्ण समर्पण आहे. प्रत्येक अभंग ते गात नाहीत, तर जगतात. म्हणूनच शेकडो वर्षांपूर्वी संतांनी लिहिलेली वाणी आजही इतकी जिवंत वाटते.

    आणि कदाचित म्हणूनच अभंगवारी जगभरातील लोकांच्या मनाला स्पर्श करते.

    कारण भक्तीला भाषा नसते.

    पुण्यात डोळे पुसणारी एक आजी.
    लंडनमध्ये पहिल्यांदाच संत तुकाराम ऐकणारा तरुण.
    दुबईमध्ये तालावर नकळत टाळ्या वाजवणारे मूल.
    मुंबईत दिवसाच्या थकव्याने आलेला एखादा माणूस, जो मैफिल संपेपर्यंत आतून हलका होऊन जातो.

    अभंगवारी ही सगळ्यांची आहे.

    या प्रवासातील सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे इथे प्रेक्षक फक्त प्रेक्षक राहत नाहीत. एखाद्या क्षणी संपूर्ण सभागृह एकत्र गाऊ लागते. हात ताल धरू लागतात. डोळे मिटतात. काहींच्या डोळ्यांत पाणी येते. काहींच्या चेहऱ्यावर शांत स्मित उमटते.

    आणि काही क्षणांसाठी बाहेरचं जग थांबतं.

    मोबाईलचे स्क्रीन विसरले जातात.
    दिखावा संपतो.
    आणि माणूस पुन्हा मनाने जगू लागतो.

    आजच्या काळात हे फार दुर्मिळ आहे.

    अल्गोरिदम, वेग आणि क्षणिक प्रसिद्धीच्या युगात अभंगवारीने लोकांना पुन्हा भावनेशी जोडले आहे. संगीत अजूनही माणसाला आतून स्पर्श करू शकते, भक्ती अजूनही लोकांना एकत्र आणू शकते आणि अध्यात्म अजूनही शांतपणे अनुभवता येते, याची जाणीव अभंगवारी करून देते.

    म्हणूनच अभंगवारी ही केवळ एक संगीत मैफल राहिलेली नाही.
    ती जगभर पोहोचलेली एक सांस्कृतिक आणि आध्यात्मिक चळवळ बनली आहे.

    शेवटचा स्वर विरून गेल्यानंतरही काहीतरी मनात राहते.

    एक शांत भावना.
    एक प्रार्थना.
    एक सुंदर हुरहूर.

    आणि त्या शांततेत कुठेतरी संत अजूनही गात राहतात.

  • ITC Foods Launches Sunfeast Breakfast Smoothie for India’s Fast-Paced Mornings

    A first-of-its-kind ready-to-drink breakfast smoothie designed for modern on-the-go lifestyles

    ITC Foods has announced the launch of Sunfeast Breakfast Smoothie, a new ready-to-drink beverage created for today’s fast-moving and convenience-driven lifestyle. With this launch, Sunfeast enters the emerging on-the-go breakfast segment with an innovative product that combines familiar kitchen ingredients with modern consumption habits.

    Made with wholesome ingredients

    The new Sunfeast Breakfast Smoothie is made with Banana, Milk, Almonds, Oats, Dates and 4 Super Seeds. Designed as a quick and enjoyable breakfast accompaniment, the smoothie offers 6g of protein per serving and contains no added sugar, preservatives or artificial flavours, catering to consumers looking for healthier beverage choices.

    Catering to changing breakfast habits

    Breakfast consumption patterns in India are rapidly evolving as busy schedules and rising health awareness drive consumers toward portable and convenient food formats. The product has been specially developed for modern consumers looking for quick nutrition during morning commutes, hectic workdays and mid-morning hunger gaps.

    ITC Foods on the launch

    Commenting on the launch, Mr. Vivek Kookkal, Vice President and Head – Dairy and Beverages, Foods Division, ITC Ltd., said, “Consumer expectations from the breakfast category are evolving rapidly. Today’s consumers, especially Gen Z, are looking for products that are convenient yet tasty. This insight led us to create Sunfeast Breakfast Smoothie, a differentiated and innovation-led offering designed for these emerging needs.”

    Stylized digital campaign unveiled

    To support the launch, the brand has also released a high-energy digital film that presents breakfast as a moment of expression and delight. The film features a young woman turning her kitchen into a performance stage, where a sip of the smoothie transforms into a playful bartender-style act with spinning jars and flying ingredients. The campaign reflects the product’s positioning as a fun, modern and convenient breakfast option.

    Price and availability

    Priced at ₹45 for a 160ml pack, Sunfeast Breakfast Smoothie is now available across quick commerce platforms, modern trade outlets and general trade stores in metro cities across India.

  • अभिनेता आदिनाथ कोठारेच्या ‘सिस्टम’ चित्रपटाच्या कास्टिंगमागची भन्नाट फिल्मी गोष्ट

    टेलिव्हिजन, मराठी चित्रपटसृष्टी आणि ओटीटी या तिन्ही माध्यमांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने वेगळी ओळख निर्माण करणारा अभिनेता आदिनाथ कोठारे सध्या विविध प्रोजेक्ट्समुळे चर्चेत आहे. वैविध्यपूर्ण भूमिका, सहज अभिनयशैली आणि सातत्यपूर्ण कामगिरीमुळे आदिनाथने मराठीसोबतच हिंदी मनोरंजनविश्वातही स्वतःचं खास स्थान निर्माण केलं आहे. सध्या ॲमेझॉन प्राईमवरील ‘सिस्टम’ या प्रोजेक्टमधील त्याच्या भूमिकेची विशेष चर्चा रंगली असून, या प्रोजेक्टमध्ये त्याला कास्ट कसं करण्यात आलं यामागची एक रंजक आणि प्रेरणादायी गोष्ट आता समोर आली आहे.

    मनापासून केलेलं मॅनिफेस्टेशन ठरलं खरं

    *‘सिस्टम’*मध्ये आदिनाथने ‘आलोक’ ही महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. या भूमिकेच्या निमित्ताने त्याने नुकताच सोशल मीडियावर एक खास अनुभव शेअर केला. एखादी गोष्ट मनापासून हवी असेल आणि तिच्यासाठी सकारात्मक विचार केला, तर ती आपल्या आयुष्यात नक्की येते, याचा प्रत्यक्ष अनुभव त्याला या प्रोजेक्टमुळे आला असल्याचं त्याने सांगितलं.

    आदिनाथ म्हणाला, “मी एका बॉलिवूड अवॉर्ड फंक्शनला गेलो होतो. तिथे माझी भेट दिग्दर्शिका अश्विनी अय्यर तिवारी यांच्यासोबत झाली. गप्पांच्या ओघात मी त्यांना सहज म्हणालो की, मला तुमच्यासोबत काम करण्याची खूप इच्छा आहे. विशेष म्हणजे अगदी दुसऱ्याच दिवशी मला कास्टिंगसाठी फोन आला. त्यानंतर माझं *‘सिस्टम’*साठी ऑडिशन झालं आणि मी या प्रोजेक्टचा भागही झालो. कधी कधी आपण मनापासून मॅनिफेस्ट केलेल्या गोष्टी खरंच पूर्ण होतात.”

    दिग्गज कलाकारांसोबत स्क्रीन शेअर

    *‘सिस्टम’*मध्ये आदिनाथने दिग्गज अभिनेते आणि दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर तसेच अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा यांच्यासोबत स्क्रीन शेअर केली आहे. त्याच्या भूमिकेला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून, हिंदी ओटीटी विश्वातही त्याच्या अभिनयाची दखल घेतली जात आहे.

    बिग बजेट प्रोजेक्ट्समध्ये झळकणार आदिनाथ

    आगामी काळात आदिनाथ कोठारे अनेक मोठ्या हिंदी प्रोजेक्ट्समध्ये दिसणार असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे ‘रामायण’ आणि *‘गांधी’*सारख्या बिग बजेट प्रोजेक्ट्समध्येही तो महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळकणार असल्याचं समोर येत आहे. त्यामुळे मराठीसोबतच हिंदी इंडस्ट्रीतही आदिनाथचा प्रवास अधिक वेगाने पुढे जाताना दिसत आहे.

  • ११ वर्षांनंतर ‘देऊळ बंद २’ची ब्लॉकबस्टर एन्ट्री; प्रदर्शित होताच प्रेक्षक झाले स्वामीमय

    गुरुपुष्यामृत योगावर ब्रह्ममुहूर्तात रिलीज; पहाटेच्या शोसाठीही थिएटरबाहेर तुफान गर्दी

    २०१३ साली प्रदर्शित झालेल्या ‘देऊळ बंद’ या चित्रपटाने श्रद्धा, अध्यात्म आणि वास्तव यांचा संगम घडवत मराठी चित्रपटसृष्टीत वेगळी ओळख निर्माण केली होती. प्रेक्षकांच्या मनात घर करणाऱ्या या चित्रपटाचा बहुप्रतिक्षित सिक्वेल ‘देऊळ बंद २ – आता परीक्षा देवाची’ अखेर तब्बल ११ वर्षांनंतर प्रदर्शित झाला असून, रिलीज होताच चित्रपटाने महाराष्ट्रभर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. पहिल्याच दिवशी मिळालेल्या जबरदस्त प्रतिसादामुळे हा चित्रपट यंदाच्या सर्वाधिक चर्चेत असलेल्या मराठी चित्रपटांपैकी एक ठरला आहे.

    ब्रह्ममुहूर्तावर रिलीज; पहाटेपासून थिएटरबाहेर गर्दी

    मराठी चित्रपटसृष्टीत क्वचितच पाहायला मिळणारा प्रयोग करत ‘देऊळ बंद २’ हा चित्रपट पारंपरिक शुक्रवारऐवजी गुरुवारी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर प्रदर्शित करण्यात आला. गुरुपुष्यामृत योग साधत सकाळी सहा वाजताच चित्रपटाचे शो सुरू झाले. विशेष म्हणजे, पहाटेच्या या शोसाठीही प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने थिएटरमध्ये गर्दी केली. अनेक ठिकाणी तिकीट खिडक्यांवर रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळालं.

    महाराष्ट्रभर हाऊसफुल्ल शो

    पुणे, पिंपरी-चिंचवड, मुंबई, ठाणे, नाशिक, जळगाव, विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रासह राज्यभरात चित्रपटाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मुंबईतील भांडुप, कल्याण, नालासोपारा, अंधेरी, ठाणे आणि लोअर परळ या मराठीबहुल भागांमध्ये चित्रपटाचे अनेक शो हाऊसफुल्ल झाले. ऑनलाइन बुकिंग प्लॅटफॉर्म BookMyShow वरही तिकिटांसाठी मोठी झुंबड उडाल्याचं दिसून आलं.

    सोशल मीडियावर ‘देऊळ बंद २’ची जोरदार चर्चा

    चित्रपट प्रदर्शित होताच सोशल मीडियावर ‘देऊळ बंद २’ ट्रेंड होऊ लागला. चित्रपटातील संवाद, भावनिक प्रसंग, श्रद्धेचा प्रभावी आशय, पार्श्वसंगीत आणि कलाकारांच्या अभिनयाचं प्रेक्षकांकडून भरभरून कौतुक होत आहे. अनेकांनी हा चित्रपट “भावनिक आणि अध्यात्मिक अनुभव” असल्याच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

    प्रवीण तरडे यांची प्रभावी मांडणी

    चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शनाची जबाबदारी प्रवीण विठ्ठल तरडे यांनी सांभाळली आहे. वास्तववादी शैलीत कथा मांडण्याची त्यांची खासियत या चित्रपटातही प्रकर्षाने जाणवते. श्रद्धा आणि समाजव्यवस्थेतील संघर्षाला त्यांनी भावनिक आणि प्रभावी रूप दिलं आहे.

    स्वामी समर्थांच्या भूमिकेत मोहन जोशींचा प्रभावी अभिनय

    चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी पुन्हा एकदा स्वामी समर्थांच्या भूमिकेत झळकले असून, त्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळत आहे. संवादफेक, देहबोली आणि भावनिक प्रसंगांमधून त्यांनी साकारलेली दैवी छटा प्रेक्षकांना भावताना दिसत आहे.

    भव्य निर्मितीमूल्यांनी सजलेला चित्रपट

    वटवृक्ष इंटरटेनमेंट निर्मित या चित्रपटाची निर्मिती कैलास वाणी, जयश्री वाणी, कैवल्य वाणी आणि जुईली वाणी-सूर्यवंशी यांनी केली आहे. उत्कृष्ट छायांकन, प्रभावी पार्श्वसंगीत आणि भव्य सादरीकरणामुळे चित्रपट अधिक प्रभावी ठरला आहे.

    विक्रमी प्रतिसादाची चर्चा

    चित्रपटाच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्रातील सुमारे ५०० चित्रपटगृहांमध्ये २ हजारांहून अधिक शो प्रदर्शित झाले. पुण्यातील सिटी प्राईड मल्टिप्लेक्समध्ये *‘देऊळ बंद २’*चे तब्बल २५ शो हाऊसफुल्ल झाल्याची माहिती समोर आली आहे. मराठी चित्रपटासाठी मिळालेला हा प्रतिसाद विक्रमी मानला जात असून, चित्रपटाच्या ओपनिंगची सर्वत्र चर्चा रंगली आहे.

    मराठी चित्रपटसृष्टीतील दमदार ओपनिंग

    दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीप्रमाणे वेगळ्या दिवशी आणि विशेष मुहूर्तावर चित्रपट प्रदर्शित करण्याचा प्रयोग *‘देऊळ बंद २’*च्या माध्यमातून करण्यात आला. विशेष म्हणजे, या प्रयोगालाही प्रेक्षकांनी मोठा प्रतिसाद दिला. त्यामुळे हा चित्रपट मराठी सिनेमातील सर्वात दमदार आणि चर्चित ओपनिंगपैकी एक मानला जात आहे.

  • “मी धर्मेंद्र यांचा मुलगा आहे” : ‘शेखर टुनाइट’मध्ये वडिलांच्या आठवणींनी भावुक झाले बॉबी देओल

    शेखर सुमन पुन्हा एकदा त्यांच्या मनमोकळ्या आणि भावनिक मुलाखतींमधून प्रेक्षकांची मनं जिंकताना दिसत आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या  पहिल्या  दमदार भागानंतर आता ‘शेखर टुनाइट’चा दुसरा भागही तितकाच खास असणार आहे. या भागात अभिनेता बॉबी देओल खास पाहुणे म्हणून सहभागी झाले आहेत. ‘ॲनिमल’ चित्रपटानंतर मिळालेल्या प्रचंड यशामुळे सध्या बॉबी देओल चर्चेत आहेत. मात्र या भागात प्रेक्षकांना त्यांचा एक अतिशय भावुक आणि हळवा पैलू पाहायला मिळणार आहे. आपल्या वडिलांबद्दल आणि ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या आठवणी सांगताना बॉबी भावुक झालेले दिसतात.

    कार्यक्रमातील एका भावनिक क्षणी बॉबी देओल यांनी सांगितले की, “माझ्या वडिलांवर संपूर्ण जग प्रेम करत होतं. हे मला नेहमीच माहिती होतं. पण ते आपल्यात नसताना जे दुःख आणि पोकळी निर्माण झाली, ती फक्त आमच्या कुटुंबानेच नाही तर जगभरातील चाहत्यांनीही अनुभवली. आजही मी कुठेही गेलो तरी लोक धर्मेंद्रजींची आठवण काढताना भावुक होतात. ते खूप खास व्यक्ती होते आणि त्यांची जागा कोणीही घेऊ शकत नाही.” यानंतर शेखर सुमन यांनी जेव्हा त्यांना विचारलं  की, वडिलांची कोणती गोष्ट त्यांना सर्वात जास्त आठवेल, तेव्हा बॉबी पुन्हा भावुक होतात. ते म्हणाले , “एखादी एकच गोष्ट सांगणं कठीण आहे, कारण त्यांची प्रत्येक गोष्ट खास होती. त्यांचा रागसुद्धा प्रेमासारखाच वाटायचा.”

    भावनिक संवादांसोबतच या भागात काही हलकेफुलके आणि मनाला भिडणारे क्षणही पाहायला मिळणार आहेत. शेखर सुमन गंमतीत बॉबींना विचारतात की, “आज तुम्ही विजय सिंह देओल म्हणून आलात, बॉबी देओल म्हणून, बाबा देओल म्हणून की इंटरनेटचा  ‘लॉर्ड बॉबी’ म्हणून?” यावर बॉबी हसत उत्तर दिल , “मी धर्मेंद्र यांचा मुलगा आहे.” त्यांच्या या एका उत्तरातून वडिलांप्रती असलेलं प्रेम आणि अभिमान सुंदरपणे दिसून येतो.

    अध्ययन सुमन यांनी संकल्पना केलेला आणि धर्मेश संगानी यांनी निर्मित केलेला ‘शेखर टुनाइट’ हा कार्यक्रम आता फक्त सेलिब्रिटी टॉक शो राहिलेला नाही, तर मनापासून होणाऱ्या संवादांचं एक खास व्यासपीठ बनत आहे. पहिल्या भागाला मिळालेल्या उत्स्फूर्त  प्रतिसादानंतर ‘शेखर टुनाइट’ दर शुक्रवारी संध्याकाळी ६ वाजता यूट्यूबवर प्रदर्शित होत आहे. बॉबी देओल यांची खास मुलाखत २२ मे २०२६ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.