
लोकप्रिय आणि प्रेक्षकप्रिय महामालिका ‘लक्ष्मी निवास’ सध्या आपल्या कथानकाच्या अत्युच्च टप्प्यावर पोहोचली आहे. गोव्यात सुरू असलेल्या या विशेष ट्रॅकमध्ये एका बाजूला भावना आणि सिद्धूच्या नात्यात जवळीक वाढताना दिसते आहे, तर दुसऱ्या बाजूला जयंत आणि जान्हवीच्या आयुष्यात अनपेक्षित वादळ येताना दिसत आहे.
गोव्याच्या पार्श्वभूमीवर रंगणार रोमांचक ट्रॅक
संपतराव भावना आणि सिद्धूला हनीमूनसाठी गोव्याला पाठवण्याचा निर्णय घेतात. सिद्धू हा प्रवास आपल्या प्रेमाची कबुली देण्याची संधी मानतो आणि आपल्या खास मैत्रिणी लक्ष्मी श्रीनिवासलाही सोबत यायचा आग्रह करतो. परिणामी भावना-सिद्धू आणि लक्ष्मी-श्रीनिवास या दोघांच्या जोड्या गोव्यात पोहोचतात.
जयंत-जान्हवीच्या आयुष्यातील उलथापालथ

दुसरीकडे जयंत जान्हवीला फिरायला घेऊन जातो, आणि तेही गोव्यातच. या तिन्ही जोडप्यांची एकाच ठिकाणी भेट झाल्याने एक नवा ड्रामा तयार होतो. गोव्याच्या सुंदर किनाऱ्यावर भावना आपल्या मनातील प्रेम सिद्धूसमोर व्यक्त करते, आणि दोघांचं नातं एका नव्या अध्यायात प्रवेश करतं. परंतु जयंतच्या वागणुकीमुळे जान्हवी अस्वस्थ होते आणि ती परत जाण्याचा हट्ट धरते.
रहस्य आणि भावनांचा संघर्ष…
जयंतला लक्ष्मी आणि श्रीनिवासही तिथेच आहेत हे कळल्यावर तो जान्हवी आणि त्यांची भेट होऊ नये म्हणून धडपड सुरू करतो. पण नियतीचं वेगळंच नियोजन असतं — कारण जान्हवीला समजतं की जयंतने तिच्या आजीला मारण्याचा प्रयत्न केला होता! या धक्क्याने तिचं मन हादरून जातं. तिच्या मनातील प्रेम, विश्वास आणि राग यांचा स्फोट होतो.
क्रूजवरील थरारक क्लायमॅक्स आणि अनपेक्षित वळणं
क्रूजवर या सगळ्याचा शेवट एका जोरदार, भावनिक आणि धक्कादायक वळणावर होणार आहे. आता प्रश्न असा की — जान्हवी पुढे काय निर्णय घेईल? जयंतला त्याच्या कर्मांची शिक्षा मिळेल का? भावना आणि सिद्धूचं नातं कोणत्या नव्या टप्प्यावर जाईल? आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे, लक्ष्मी श्रीनिवासची भूमिका या सर्व घटनांमध्ये किती निर्णायक ठरेल?
तेव्हा बघायला विसरू नका — ‘लक्ष्मी निवास’, दररोज रात्री ८:०० वाजता, सदैव तुमच्या झी मराठीवर.
