१०० व्या नाट्यसंमेलनानिमित्त महाराष्ट्रभर ‘नाट्यकलेचा जागर’ कार्यक्रम.

रंगभूमीची मध्यवर्ती संघटना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मुंबई आयोजित, नाट्य संस्कृती लाभलेल्या महाराष्ट्र राज्यात मानाचे शतकमहोत्सवी अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन जानेवारी २०२४ ते मे २०२४ याकालावधीत महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने मोठ्या स्वरूपात आणि धुमधडाक्यात साजरे होणार आहे. या संमेलनाचा महत्वाचा भाग महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील कलावंत, नाट्यकर्मींसाठी ‘नाट्यकलेचा जागर’ हा स्पर्धात्मक महोत्सव दिनांक १५ जानेवारी… Read More १०० व्या नाट्यसंमेलनानिमित्त महाराष्ट्रभर ‘नाट्यकलेचा जागर’ कार्यक्रम.

शतक महोत्सवी नाट्यसंमेलन महाराष्ट्रभर संपन्न होणार

शंभरावे नाट्यसंमेलन महाराष्ट्रात विविध ठिकाणी संपन्न होणार आहे या संमेलनाचा उद्घाटन सोहळा ५ जानेवारीला होणार असून मे महिन्यात याची सांगता करण्यात येणार असल्याची घोषणा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष ‘प्रशांत दामले’ यांनी केली शंभराव्या नाट्यसंमेलनाची सविस्तर माहिती प्रसार माध्यमांना देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रशांत दामले यांच्यासोबत नाट्य संमेलनाचे मुख्य निमंत्रण… Read More शतक महोत्सवी नाट्यसंमेलन महाराष्ट्रभर संपन्न होणार

मान्यवरांच्या उपस्थितीत रंगला ‘यदा कदाचित रिटर्न्स’ नाटकाचा शंभरावा प्रयोग

लेखन-दिग्दर्शनासोबतच विविध व्यक्तिरेखा साकारत रसिकांचे मनोरंजन करणारा रंगकर्मी संतोष पवारच्या ‘यदा कदाचित’ या नाटकाने मराठी रंगभूमीवर विक्रमी घोडदौड केली होती. मागील काही दिवसांपासून संतोषच्या ‘यदा कदाचित रिटर्न्स’ या नाटकाने रसिकांवर मोहिनी घातली आहे. नुकताच या नाटकाने शंभर प्रयोगांचा टप्पा पार केला. या नाटकाने शंभराव्या प्रयोगाचे औचित्य साधत ऐतिहासिक कलाकृतींचे साक्षीदार असलेल्या रॉयल ऑपेरा हाऊस या… Read More मान्यवरांच्या उपस्थितीत रंगला ‘यदा कदाचित रिटर्न्स’ नाटकाचा शंभरावा प्रयोग

दुबईत रंगला सुवर्णपर्व एकांकिका करंडक !

एम.पी.एफ.एस म्हणजेच महाराष्ट्र मंडळ दुबई, यंदा सुवर्णपर्व दिमाखात साजरे करत आहे. गेली दोन वर्षे करोनाच्या प्रादुर्भावामुळे एकांकिका स्पर्धा होऊ शकली नाही, पण यंदा मात्र ही स्पर्धा म्हणजेच सुवर्णपर्व एकांकिका करंडक २०२३ मंडळाच्या ५० व्या वर्षात जल्लोषात पार पडला. प्राथमिक फेरीत पूर्ण युएई तून सहभागी झालेल्या११ एकांकिका सादर झाल्या आणि त्यातून विनोदी, कौटुंबिक, सामाजिक अशा विविध… Read More दुबईत रंगला सुवर्णपर्व एकांकिका करंडक !

गालिब अनुभवायचा असेल तर…सोळा डिसेंबरची संध्याकाळ राखून ठेवा….

इश्क ने ग़ालिब निकम्मा कर दिया वरना हम भी आदमी थे काम के – मिर्ज़ा ग़ालिब गालिबला करी ही बेकाम प्रेमव्याधी अमुच्यातही उभारी होती बरीच आधी – कुसुमाग्रज ‘ग़ालिब’… आठराव्या शतकात जन्मलेला कवी… स्वतःच्या कल्पनांना.. “सोमनाथी खयाल” (भारतीय संस्कृतीतला विचार) म्हणणारा … वाराणसी-नगरीच्या प्रेमात “चराग ए दैर” (देवालयातील दीप) हे फारसी काव्य लिहीणारा.. आयुष्यातील दुःखांवर… Read More गालिब अनुभवायचा असेल तर…सोळा डिसेंबरची संध्याकाळ राखून ठेवा….

ओरिजनल ‘नथुराम गोडसे’ आजपासून पुन्हा एकदा रंगमंचावर!

सखाराम बाईंडर, हमीदाबाईची कोठी, डार्लिंग डार्लिंग, आई रिटायर होते, गांधी विरुद्ध सावरकर, घर तिघांचं हवं, सोयरीक, आकाश पेलताना, सविता दामोदर परांजपे अशी अनेक उत्तमोत्तम नाटके मराठी रंगभूमीला देऊन मराठी रंगभूमीचे अवकाश विस्तारण्यास सहाय्यभूत ठरलेल्या माऊली प्रॉडक्शन्स चे अजून एक वादग्रस्त नाटक म्हणजे ‘मी नथुराम गोडसे बोलतोय…!’ या नाटकानेही मराठी रंगभूमीवर एक इतिहास घडवला आणि सारी… Read More ओरिजनल ‘नथुराम गोडसे’ आजपासून पुन्हा एकदा रंगमंचावर!

पाल्य-पाल्यांनी एकत्र अनुभवावी अशी ‘सुंदर ती दुसरी दुनिया’ ३ आणि १७ डिसेंबरला होणार महाबालनाट्याचा प्रयोग

सोशल मीडिया, इंटरनेट, रिल्सच्या युगात लहान मुले त्यांचे बालपण विसरत आहेत. मे महिन्यात मित्रमैत्रिणींसोबत दिवसभर हुंडाळणे, विटीदांडू, साखळीसाखळी असे अनेक खेळ तर हल्ली कालबाह्य झाले आहेत. हल्लीच्या लहान मुलांना या खेळांची नावही माहित नाहीत. स्पर्धेच्या नावाखाली मुलांची केवळ धावपळच सुरु आहे. या सगळ्यात मुलांची हिरावलेली निरागसता परत मिळवून बालपणात घेऊन जाणारे ‘सुंदर ती दुसरी दुनिया’… Read More पाल्य-पाल्यांनी एकत्र अनुभवावी अशी ‘सुंदर ती दुसरी दुनिया’ ३ आणि १७ डिसेंबरला होणार महाबालनाट्याचा प्रयोग

मधुरा वेलणकर-साटम, तुषार दळवी यांच मराठी व्यावसायिक रंगभूमीवर पुनरागमन

अभिनेत्री मधुरा वेलणकर-साटम आणि अभिनेते तुषार दळवी मराठी व्यावसायिक रंगभूमीवर पुनरागमन करत आहेत. विजय केंकरे दिग्दर्शित ‘आपण यांना पाहिलंत का?’ या नव्याकोऱ्या नाटकात मधुरा आणि तुषार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. वरदा-वैध निर्मित प्रवेश प्रकाशित या नाटकाची निर्मिती आदिती देवेंद्र राव, वैशाली धनेश पोतदार यांनी केली आहे. सुशील स्वामी यांनी या नाटकाचं लेखन केलं आहे. आपल्या… Read More मधुरा वेलणकर-साटम, तुषार दळवी यांच मराठी व्यावसायिक रंगभूमीवर पुनरागमन