
-
Airtel Introduces ‘Airtel Cartoon Network Classics’ for Nostalgic Family Entertainment

Bharti Airtel has expanded its entertainment portfolio with the exclusive launch of Airtel Cartoon Network Classics, a new value-added channel on Airtel Digital TV, introduced in collaboration with Warner Bros. Discovery. The channel offers ad-free access to some of the most iconic animated shows that defined childhoods across generations.
A Dedicated Home for Iconic Cartoon Network Shows
Airtel Cartoon Network Classics brings together a curated collection of timeless animated franchises from Cartoon Network. Popular favourites such as Tom & Jerry, The Flintstones, Looney Tunes, Scooby Doo, and Johnny Bravo form the core of the channel’s programming, creating a single destination for classic animation lovers.
Nostalgia for Adults, Discovery for the Next Generation
Curated especially for audiences who grew up watching these shows in the ’90s and early 2000s, the channel also enables families to introduce younger viewers to stories and characters that became part of global pop culture. These cartoons continue to resonate today with their universal humour, storytelling, and memorable characters.
Airtel’s Vision for Curated Entertainment Experiences
Commenting on the launch, Pushpinder Singh Gujral, DTH-Business Head at Airtel, said that Airtel Cartoon Network Classics adds a distinctive entertainment layer to Airtel’s offerings. He highlighted that the channel allows viewers to reconnect with iconic characters still loved today and will be available across Airtel’s DTH and IPTV platforms, with more such curated experiences planned in the future.
Pricing, Language Options, and Wide Accessibility
Priced at ₹59 per month, the ad-free channel is available on Channel 445 in both English and Hindi. Subscribers can access it across all Airtel set-top boxes, including connected devices such as Xstream and IPTV, as well as non-connected HD and SD boxes, ensuring uninterrupted viewing without additional equipment.
Warner Bros. Discovery on Reviving Classic Characters
Arjun Nohwar, Managing Director for South Asia at Warner Bros. Discovery, noted that Cartoon Network Classics celebrates the enduring legacy of animated characters that have entertained audiences worldwide for generations. He added that the collaboration with Airtel helps bring these original cartoons to Indian homes in an accessible format, allowing fans to relive cherished childhood memories while introducing new audiences to content that shaped global pop culture.
Simple and Instant Activation for Subscribers
Customers can activate Airtel Cartoon Network Classics easily through their set-top box, by giving a missed call, or via the Airtel Thanks app. With quick and user-friendly activation options, viewers can start enjoying classic cartoons within seconds.
Strengthening Airtel’s Family-Friendly Content Portfolio
The collaboration further strengthens Airtel’s growing lineup of value-added entertainment services. By offering Cartoon Network Classics as an exclusive channel, Airtel reinforces its focus on high-quality, family-friendly content while deepening engagement with viewers across all age groups.
-
संगीत विश्वात २० वर्षांचा प्रवास ते सदाबहार जुन्या गाण्यांना नवा ट्विस्ट — या कारणांनी गायक अभिजीत सावंत यांच्यासाठी २०२५ ठरलं खास!

२०२५ : अभिजीत सावंतसाठी चर्चेचं वर्ष
सरत्या वर्षाला निरोप देत नव्या वर्षाचं जंगी स्वागत करत असताना, २०२५ हे वर्ष अनेक कलाकारांसाठी लक्षवेधी ठरताना दिसलं. नवनवीन प्रोजेक्ट्स, अनपेक्षित कोलॅबोरेशन्स आणि वेगळ्या माध्यमांतून स्वतःला सिद्ध करणारे कलाकार चर्चेत राहिले. याच यादीत ठळकपणे उठून दिसलं एक नाव — गायक अभिजीत सावंत. सदाबहार गाण्यांनी प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणाऱ्या अभिजीतने २०२५ मध्ये पुन्हा एकदा रसिकांची मनं जिंकली. विशेष म्हणजे, जेन झी पिढीसाठी त्याने एका OG गाण्याचं नवं, फ्रेश व्हर्जन सादर केलं, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
२० वर्षांचा संगीतप्रवास आणि नावीन्यपूर्ण वाटचाल
संगीत विश्वात २० वर्षं पूर्ण करत असताना, २०२५ हे वर्ष अभिजीतसाठी नावीन्यपूर्ण संधी घेऊन आलं. वैविध्यपूर्ण प्रोजेक्ट्स, सुमधुर गायनासोबत गाण्यांमधील अभिनय आणि सादरीकरणाचा वेगळा बाज — या सगळ्यांचा अनुभव प्रेक्षकांना मिळाला. गायक म्हणूनच नव्हे, तर परफॉर्मर म्हणूनही अभिजीतने या वर्षात स्वतःची वेगळी ओळख अधोरेखित केली.
इंडियन आयडॉलपासून रियालिटी शोपर्यंतचा प्रवास
इंडियन आयडॉलपासून सुरू झालेला अभिजीतचा प्रवास अनेक रियालिटी शोपर्यंत विस्तारला. २०२५ मध्ये ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’मध्ये सहभाग घेत त्याने नामवंत शेफ्ससोबत प्रेक्षकांची मनं जिंकली. गाणं आणि खाणं — या दोन्ही गोष्टींचा समतोल साधत, या वर्षात त्याने अनेक गाजलेली आणि लोकप्रिय गाणीही सादर केली.
बॉलिवूड म्युझिक प्रोजेक्टमध्ये मराठी गाण्याची जादू
बॉलिवूडमधील सर्वात मोठ्या संगीत महोत्सवांपैकी एक असलेल्या ‘बॉलिवूड म्युझिक प्रोजेक्ट’मध्ये अभिजीतने मराठी गाणं सादर करत हिंदी रसिक प्रेक्षकांनाही भुरळ घातली. अजय–अतुल या जोडी नंतर या मंचावर मराठी गाण्याचा मान पटकावणारा अभिजीत हा कलाकार ठरला. हा क्षण त्याच्या कारकिर्दीत महत्त्वाचा आणि अभिमानास्पद ठरला.
जुन्या गाण्यांना मॉडर्न ट्विस्ट, जेन झीचा ट्रेंड
जुन्या आयकॉनिक गाण्यांना मॉडर्न ट्विस्ट देत, आय पॉपस्टारसारख्या मंचावर किंगसोबत ‘मोहब्बते लुटाऊंगा’ हे गाणं अभिजीतने नव्या ढंगात सादर केलं. या नव्या व्हर्जनला केवळ जेन झीच नव्हे, तर मिलेनियल्सकडूनही भरभरून प्रतिसाद मिळाला. जुन्या गाण्यांची नवी बाजू प्रेक्षकांना भावली आणि हे गाणं सोशल मीडियावर ट्रेंडही झालं.
‘तुझी चाल तुरु तुरु’ ते ‘रुपेरी वाळूत’ — सदाबहार गाण्यांचं पुनरुज्जीवन
‘तुझी चाल तुरु तुरु’, ‘ढगाला लागली कळ’, ‘रुपेरी वाळूत’ यांसारख्या सदाबहार गाण्यांना हटके ट्विस्ट देत अभिजीतच्या आवाजाने ही गाणी पुन्हा एकदा रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवू लागली. २०२५ मध्ये आयकॉनिक गाणी री-क्रिएट करत, त्यातील मज्जा आणि भावनात्मक ओलावा त्याने नव्या पिढीपर्यंत पोहोचवला. त्यामुळे आजची पिढी या गाण्यांवर ट्रेंड करू लागली.
गौतमी पाटीलसोबत अनपेक्षित कोलॅबोरेशन
वर्षाच्या शेवटी अभिजीतने आणखी एका मोठ्या, अनपेक्षित कोलॅबोरेशनने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. नृत्यांगना गौतमी पाटीलसोबत ‘रुपेरी वाळूत’ हे धमाकेदार गाणं सादर करत तो पुन्हा चर्चेत आला. ट्रेंडी गाणी, प्रभावी सादरीकरण आणि गाण्यातील अभिनय — सगळ्याच बाबी लक्षवेधी ठरल्या.
नव्या वर्षाकडे अपेक्षेने पाहणारे प्रेक्षक
मराठी संगीतविश्वासोबतच हिंदी इंडस्ट्रीतही अभिजीत सावंत नव्या गाण्यांसह सक्रिय राहणार का, हे पाहणं आता उत्सुकतेचं ठरणार आहे. २०२५ प्रमाणेच येणारं वर्षही त्याच्यासाठी तितकंच दमदार आणि संगीतप्रेमींसाठी खास ठरो, हीच अपेक्षा.
-
ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांचा जन्मदिन…विनम्र अभिवादन 🙏

संघर्षातून घडलेलं व्यक्तिमत्त्व
भारतीय उद्योगविश्वात शांत, संयमी आणि मूल्याधिष्ठित नेतृत्वाचं प्रतीक ठरलेलं नाव म्हणजे रतन टाटा. ऐश्वर्याच्या वातावरणात जन्म असूनही त्यांचं बालपण भावनिक संघर्षांनी व्यापलेलं होतं. पालक विभक्त झाल्यानंतर आजी नवाजबाई टाटा यांच्या संस्कारांत त्यांची जडणघडण झाली. अमेरिकेत शिक्षण घेत असताना “टाटा” हे आडनाव बाजूला ठेवून स्वतःच्या कष्टांवर उभं राहण्याचा त्यांनी जाणीवपूर्वक निर्णय घेतला. हॉटेलमध्ये भांडी घासण्यापासून साध्या नोकऱ्यांपर्यंतचे अनुभव त्यांच्या स्वभावाला अधिक विनम्र, जमिनीशी जोडलेलं बनवत गेले.
नेतृत्वाची सुरुवात तळापासून
१९६२ मध्ये टाटा समूहात प्रवेश केल्यानंतर रतन टाटांनी थेट उच्च पद स्वीकारण्याऐवजी जमशेदपूरच्या टाटा स्टीलमध्ये कोळसा उचलण्यापासून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. नेल्को आणि एम्प्रेस मिलसारखी अपयशं त्यांच्या वाट्याला आली; पण त्यातून ते खचले नाहीत. उलट, या अनुभवांनी निर्णयक्षमता, दूरदृष्टी आणि धैर्य अधिक पक्कं केलं. १९९१ मध्ये समूहाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी भारतीय उद्योगविश्वाला जागतिक स्तरावर आत्मविश्वासानं उभं केलं.
नफ्यापेक्षा मूल्यांना प्राधान्य देणारा टाटा समूह
इतर अनेक उद्योगसमूहांप्रमाणे “करलो पैसा मुठ्ठी मे” अशी मानसिकता टाटा समूहाची कधीच राहिलेली नाही. टाटा उद्योगांची मुळेच समाजाभिमुख विचारांत रोवलेली आहेत. आज टाटा सन्समधील सुमारे ६६ टक्के हिस्सा टाटा ट्रस्ट्सकडे असल्याने समूहातून मिळणाऱ्या नफ्याचा मोठा भाग शिक्षण, आरोग्य, संशोधन, ग्रामीण विकास आणि आपत्ती निवारणासाठी खर्च होतो. नफा कमावणं महत्त्वाचं असलं, तरी तो समाजाकडे परत जाणं हीच टाटा संस्कृतीची खरी ओळख आहे.
ग्राहक विश्वास आणि टाटा संस्कृती
ग्राहकाला फसवून पैसा कमावणं, दर्जाशी तडजोड करणं किंवा दिशाभूल करणाऱ्या जाहिराती करणं—हे टाटा समूहाच्या विचारधारेत कधीच बसलेलं नाही. म्हणूनच “टाटा नमक – देश का नमक” अशी जाहिरात आली, तेव्हा लोकांना त्यावर आक्षेप घ्यावा असं वाटलं नाही. कारण हा दावा जाहिरातीपुरता मर्यादित नव्हता; तो दशकानुदशकं प्रामाणिक व्यवहारातून कमावलेल्या विश्वासावर उभा होता.
जागतिक भरारी आणि भारतीय आत्मविश्वास
रतन टाटांच्या नेतृत्वाखाली टाटा समूहाने केवळ व्यवसाय विस्तार केला नाही, तर भारतीय उद्योगजगतालाच जागतिक आत्मविश्वास दिला. टेटली, कोरस, जग्वार–लँड रोव्हर यांसारख्या आंतरराष्ट्रीय ब्रँड्सची खरेदी ही केवळ आर्थिक गुंतवणूक नव्हती, तर “भारतीय कंपन्याही जगात नेतृत्व करू शकतात” हा ठाम संदेश होता. या निर्णयांमुळे भारताचा उद्योगविश्वातील दर्जा बदलला आणि नव्या पिढीला मोठी स्वप्नं पाहण्याचं बळ मिळालं.
नॅनो : नफ्यापेक्षा माणूस केंद्रस्थानी
टाटा नॅनो हा प्रकल्प आर्थिकदृष्ट्या फारसा यशस्वी ठरला नाही, तरी तो रतन टाटांच्या विचारसरणीचं उत्तम उदाहरण आहे. सुरक्षित चारचाकी वाहन सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबापर्यंत पोहोचवण्याचं स्वप्न त्यांनी पाहिलं. इथे नफा दुय्यम होता आणि माणूस केंद्रस्थानी होता. उद्योग केवळ आकड्यांसाठी नाही, तर समाजाच्या गरजांसाठी असावा—हा विचार नॅनोमधून स्पष्टपणे दिसून आला.
शांत नेतृत्व आणि स्वतः घालून दिलेले नियम
रतन टाटांच्या नेतृत्वाची आणखी एक महत्त्वाची ओळख म्हणजे त्यांनी स्वतः घालून दिलेले नियम स्वतः काटेकोरपणे पाळले. निवृत्तीचं वय ७५ वर्ष निश्चित करून त्यांनी अनेक वरिष्ठांना सन्मानाने बाजूला केलं आणि स्वतःही ७५ व्या वर्षी निवृत्त झाले. बॉम्बे हाऊसमध्ये जाणं थांबवून त्यांनी पुढील नेतृत्वाला पूर्ण स्वातंत्र्य दिलं. सत्तेवर चिकटून राहण्याऐवजी योग्य वेळी बाजूला होणं—हेच त्यांच्या नेतृत्वाचं मोठेपण आहे.
आज रतन टाटा यांच्या जन्मदिनी, मूल्य, विश्वास, संवेदनशीलता आणि जबाबदारीवर उभ्या राहिलेल्या या द्रष्ट्या नेतृत्वाला मनःपूर्वक अभिवादन 🙏
-
मराठमोळा स्वॅग आणि प्रेमाचा नवा साज,अनुश्री माने दाखवणार ‘दिसली तू पहिल्यांदा २’ मध्ये नखरेल अंदाज!

लोकप्रिय रियालिटी शोमधून अल्बम सॉंगपर्यंतचा प्रवास
सध्या मराठी संगीतविश्वात नव्या गाण्यांची लाट उसळलेली असताना, ठेका धरायला लावणारं आणि मनाला भिडणारं गाणं म्हणून दिसली तू पहिल्यांदा २ प्रचंड चर्चेत आलं आहे. रोमँटिक भावविश्व आणि रॅपचा आधुनिक ठसा यांचा सुंदर मेळ साधत हे गाणं सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या गाण्यात अभिनेत्री अनुश्री माने तिच्या नखरेल, मराठमोळ्या स्वॅगमधून प्रेक्षकांना पुन्हा एकदा भुरळ घालताना दिसते.
सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर ते लोकप्रिय चेहरा

सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर म्हणून आपल्या रिलेटेबल रील्समधून ओळख निर्माण करणाऱ्या अनुश्री मानेने अभिनय क्षेत्रातही आपला ठसा उमटवला आहे. चल भावा सिटीत या लोकप्रिय रियालिटी शोमुळे तिला विशेष लोकप्रियता मिळाली. त्यानंतर ‘नखरेवाली’ या अल्बम सॉंगमुळे अनुश्री खऱ्या अर्थाने चर्चेत आली आणि तिचा चाहता वर्ग अधिक विस्तारला.
‘दिसली तू पहिल्यांदा २’ मधील कलाकारांची भक्कम फळी
‘दिसली तू पहिल्यांदा २’ या गाण्यात अनुश्री मानेसोबत अक्या जाधव, तृप्ती राणे, ऋषी कणेकर आणि अस्मिता जाधव ही कलाकार मंडळी दिसत असून, सर्वांचाच अभिनय आणि केमिस्ट्री गाण्याला वेगळं वजन देते. दृश्यरचना, स्टाईल आणि सादरीकरण यामुळे हे गाणं तरुणाईमध्ये विशेष पसंतीस उतरत आहे.
जगदंबा प्रोडक्शनस्ची नवी म्युझिकल पेशकश
‘जगदंबा प्रोडक्शनस्’ प्रस्तुत ‘दिसली तू पहिल्यांदा २’ या गाण्याची निर्मिती ऋतुजा कणेकर यांनी केली असून, आधुनिक ढंगात साकारलेलं हे गाणं मराठी अल्बम सॉंग्सच्या ट्रेंडला नवा आयाम देताना दिसत आहे. संगीत, शब्द आणि व्हिज्युअल्स यांचा समतोल साधत हे गाणं प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे.
अनुश्री मानेचं मनमोकळं मनोगत
या गाण्याबद्दल बोलताना अनुश्री माने म्हणाली की, “आजवर माझ्या चाहत्यांनी मला भरभरून प्रेम दिलं. ‘दिसली तू पहिल्यांदा २’ या गाण्यातून मी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे आणि या गाण्यालाही तसंच प्रेम मिळेल अशी मला खात्री आहे. हा अल्बम सॉंग माझ्यासाठी नवा अनुभव होता. शूटिंगदरम्यान खूप मजा आली आणि बरंच काही नव्याने शिकायला मिळालं. मागे वळून न पाहता, नवनवीन प्रयोग करत माझा प्रवास सुरू ठेवायचा आहे.”
नव्या गाण्यातून पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकण्याचा प्रयत्न
मराठमोळा स्वॅग, प्रेमाची झलक आणि आधुनिक सादरीकरण यांचा संगम असलेलं ‘दिसली तू पहिल्यांदा २’ हे गाणं अनुश्री मानेच्या करिअरमधील आणखी एक महत्त्वाचं पाऊल ठरत आहे. प्रेक्षकांच्या प्रेमावर विश्वास ठेवत, नवनवीन आशयातून भेटीला येणारी अनुश्री माने येत्या काळात आणखी कोणते नवे प्रयोग घेऊन येते, याकडे तिच्या चाहत्यांचं लक्ष नक्कीच लागून राहणार आहे.
-
दार उघडणार, नशिबाचा गेम पालटणार!

“दार उघडणार, नशिबाचा गेम पालटणार!” या दमदार थीमसोबत बिग बॉस मराठी सिझन ६चा बहुप्रतिक्षित प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला असून, संपूर्ण महाराष्ट्रात नव्या सिझनची चर्चा जोरात सुरू झाली आहे. सहाव्या पर्वाचा हा प्रोमो केवळ उत्सुकता वाढवणारा नाही, तर यंदाचा खेळ मनोरंजनाच्या चौकटीपलीकडे जात नशिबालाच आव्हान देणारा ठरणार असल्याचे स्पष्ट संकेत देतो.
रितेश भाऊंच्या कडक संवादांनी सेट झाला ‘मूड’
प्रोमोमधील सर्वात मोठं आकर्षण म्हणजे रितेश भाऊंचे प्रभावी आणि कोड्यातून अर्थ सांगणारे संवाद. “फॅन्सचा जीव जडला, की ते पाठ नाही सोडत… आणि आपण शब्द दिला की मागे नाही हटत…” अशा कडक ओळींनी यंदाच्या सिझनचा टोन ठरवला आहे. प्रत्येक प्रोमोमधून प्रेक्षकांना काहीतरी नवं देण्याची रितेश भाऊंची परंपरा यंदाही कायम असून, हटके लूक, खास स्वॅग आणि ठसकेबाज अंदाज यामुळे हा प्रोमो लक्ष वेधून घेतो.
थीम वेगळी, खेळ वेगळा
यंदाच्या सिझनची टॅगलाईन “दार उघडणार, नशिबाचा गेम पालटणार!” ही केवळ घोषणा नसून संपूर्ण खेळाची दिशा दाखवणारी आहे. दारापलीकडे काय ट्विस्ट असणार, कोणाचा खेळ कधी पालटणार, पास कोण होणार आणि फेल कोण ठरणार—या सगळ्या प्रश्नांची उत्सुकता प्रोमोने आणखी वाढवली आहे. “ह्याला प्रेम म्हणा नाहीतर वेड, चकवा देणार यंदाचा खेळ” या ओळी सोशल मीडियावर आधीच चर्चेचा विषय ठरत आहेत.
भव्य घर, शेकडो दारं आणि क्षणाक्षणाला बदलणारा डाव

घराची भव्य रचना, शेकडो दारखिडक्यांनी सजलेला जंगी थाट आणि दारापल्याड लपलेली सरप्राइझेस—हे सगळं मिळून यंदाचा खेळ प्रत्येक क्षणी कलाटणी घेणार असल्याचा ठाम इशारा प्रोमो देतो. एका क्षणात डाव कसा बदलू शकतो, कोणाची वाट कशी ठरू शकते, याची झलक या प्रोमोमध्ये पाहायला मिळते. त्यामुळेच घर कसं असणार आणि नक्की कोणते ट्विस्ट प्रेक्षकांना थक्क करणार, याची चर्चा सध्या सर्वत्र रंगली आहे.
११ जानेवारीपासून नवा अध्याय
प्रेक्षकांच्या प्रचंड उत्सुकतेच्या पार्श्वभूमीवर बिग बॉस मराठी सिझन ६चा नवा प्रवास ११ जानेवारीपासून सुरू होत आहे. दररोज रात्री ८ वाजता आपल्या लाडक्या कलर्स मराठी आणि JioHotstarवर हा ‘नशिबाचा खेळ’ प्रेक्षकांना खिळवून ठेवणार, यात शंका नाही.
-
एन.डी. स्टुडिओत कार्निव्हलला थाटात सुरुवात

कर्जत–खालापूर येथील एन.डी. स्टुडिओ येथे आयोजित कार्निव्हलला आजपासून उत्साहात सुरुवात झाली. विशेष मुलांच्या हस्ते उद्घाटन करत या उपक्रमाचा भावनिक आणि प्रेरणादायी प्रारंभ करण्यात आला. उद्घाटनानंतर वातावरण अधिकच रंगले ते अभिनेत्री कविता लाड यांच्या अनुभवकथनातून झालेल्या मुलाखतीमुळे.
पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद
महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाअंतर्गत कार्यरत असलेल्या एन.डी. स्टुडिओत २५ ते ३१ डिसेंबरदरम्यान हा कार्निव्हल आयोजित करण्यात आला आहे. पहिल्याच दिवशी दोनशेहून अधिक पर्यटकांनी हजेरी लावली. उद्घाटन प्रसंगी प्रशासकीय अधिकारी सचिन निंबाळकर आणि मुख्य लेखावित्त अधिकारी चित्रलेखा खातू-रावराणे यांची उपस्थिती लाभली.

तिकीट दर आणि बुकिंगची माहिती
३१ डिसेंबरपर्यंत सुरू राहणाऱ्या या कार्निव्हलमध्ये पाच वर्षांपासून सर्व वयोगटांसाठी प्रवेश खुला आहे. तिकीट दर ₹९९९ असून जेवणासह पॅकेजसाठी ₹१४९९ आकारण्यात येत आहेत. एकाचवेळी २५ किंवा त्यापेक्षा अधिक तिकिटांचे बुकिंग केल्यास प्रति तिकीट ₹१३९९ दर लागू होणार आहे. तिकीट बुकिंग http://www.ndartworld या संकेतस्थळावर ऑनलाइन तसेच स्टुडिओच्या ठिकाणी ऑफलाइन उपलब्ध आहे.
कलाकारांची मांदियाळी आणि गप्पांचा कार्यक्रम

या कार्निव्हलदरम्यान विविध क्षेत्रांतील मान्यवर कलाकारांशी थेट संवाद साधण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. २६ डिसेंबर रोजी सुव्रत जोशी आणि सखी गोखले यांच्याशी दुपारी ४ ते ६ या वेळेत गप्पांचा कार्यक्रम होणार आहे. २७ डिसेंबर रोजी अदिती सारंगधर यांची उपस्थिती लाभणार आहे.
२८ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता विराजस कुलकर्णी, उर्मिला कोठारे आणि विक्रम गायकवाड यांचा संवाद कार्यक्रम रंगेल. २९ डिसेंबर रोजी आनंद इंगळे, ३० डिसेंबर रोजी डॉ. गिरीश ओक आणि ३१ डिसेंबर रोजी संजय मोने यांच्यासोबत दुपारी ४ ते ६ या वेळेत गप्पांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
चित्रपट, रंगभूमी आणि संस्कृती यांचा संगम साधणारा हा कार्निव्हल रसिकांसाठी एक वेगळीच अनुभूती ठरणार आहे.
-
“चित्रकला माझ्यासाठी नाही” असं म्हणण्याआधी एकदा कागद आणि रंग हातात घ्या… – चित्रकार सुनिल रेडेकर

चित्रकार घडविण्यासाठी नव्हे, तर माणूस घडविण्यासाठी
“मला चित्र काढता येत नाही.” हे वाक्य आपण अनेकदा ऐकतो आणि बोलतोही. जणू काही चित्रकला ही फक्त जन्मजात गुण असलेल्या किंवा व्यावसायिक कलाकारांसाठी राखीव असलेली गोष्ट आहे. प्रत्यक्षात मात्र चित्रकला ही कौशल्याची परीक्षा नसून, माणूस म्हणून जगताना उपयोगी पडणारी, मनाला आधार देणारी आणि विचारांना दिशा देणारी एक सहज प्रक्रिया आहे. म्हणूनच चित्रकलेचा फायदा हा केवळ चित्रकारांपुरता मर्यादित नसून, प्रत्येक व्यक्तीसाठी आहे.
कला आधी जन्माला येते, कलाकार नंतर
खरं तर कला ही आधी जन्माला येते आणि कलाकार नंतर. माणसाच्या आयुष्यातील अनुभव, संवेदना, संघर्ष, आनंद, दुःख, प्रश्न आणि शोध यांच्यातून कलेचा जन्म होतो. या कलेच्या प्रवासातच “कलाकार” ही ओळख आकार घेते. त्यामुळे कलाकार कलानिर्मिती करतो एवढ्यावर थांबण्यापेक्षा, कलेतून माणसाची निर्मिती होते असं म्हणणं अधिक समर्पक ठरतं.
चित्र म्हणजे प्रवासाची साक्ष
कलाकार हा आधी माणूस असतो—अनुभवांनी घडलेला, परिस्थितीतून अस्वस्थ झालेला आणि शोधाच्या प्रक्रियेत असलेला. कागद किंवा कॅनव्हासवर उमटणारी रेषा ही केवळ कौशल्याचा परिणाम नसून, त्या माणसाच्या आत चाललेल्या संवादाची नोंद असते. म्हणूनच चित्र ही वस्तू नसून, ती एका प्रवासाची साक्ष असते.
चित्रकला माणसाला आतून पाहायला शिकवते
चित्रकला माणसाला पाहायला शिकवते—बाहेरचं जग नव्हे, तर आतलंही. ती संवेदना तीक्ष्ण करते, विचार खोल करते आणि माणसाला स्वतःशी प्रामाणिक राहण्याची हिंमत देते. या प्रक्रियेत माणूस केवळ चित्र काढत नाही; तो स्वतःला घडवत असतो. कलेच्या सहवासातूनच संयम, समज, करुणा आणि संवेदनशीलता यांचा विकास होतो.
अभिव्यक्तीपेक्षा घडण महत्त्वाची
म्हणूनच कला ही केवळ अभिव्यक्तीचं साधन नसून, ती एक घडण आहे—माणसाच्या व्यक्तिमत्त्वाची. कलाकार ही ओळख कलेतून निर्माण होते; पण त्याही आधी कला माणसाला माणूस बनवते. या अर्थाने पाहिलं तर चित्रनिर्मितीपेक्षा माणूसनिर्मिती हीच कलेची खरी भूमिका आहे.
शब्दांपलीकडची भाषा
सर्वसामान्य दैनंदिन जीवन सतत शब्दांनी भरलेलं असतं—कामाच्या बैठका, फोन, संदेश, सामाजिक अपेक्षा. पण अनेक भावना अशा असतात ज्या शब्दांत सांगता येत नाहीत. तिथेच चित्रकला आपलं काम करते. कागदावर उमटलेली एक साधी रेषा, एखादा रंगाचा ठिपका किंवा आकृती ही मनातल्या गुंतागुंतीला वाट करून देते. चित्रकला ही बोलण्याची गरज नसलेली, पण ऐकून घेणारी भाषा आहे.
कॉपी नव्हे, स्वतःचा शोध
आज अनेक ठिकाणी चित्रकलेचे वर्ग चालतात. बहुतेक वेळा या वर्गांमध्ये सर्वांना एकच चित्र काढायला लावलं जातं. ते चित्र सुंदर दिसतं, चौकटीत लावण्यासारखंही असतं; पण सगळ्यांचं एकसारखं असतं. या प्रक्रियेत हात चालतो, पण विचार थांबतो. चित्रकलेचा खरा उद्देश मात्र कॉपी करणं नसून, स्वतःच्या आत डोकावणं आहे. प्रत्येक माणसाचा अनुभव, भावविश्व आणि दृष्टी वेगळी असते; मग चित्र एकसारखी कशी असू शकतील?
चित्रकला म्हणजे नकळत ध्यान
चित्र काढताना माणूस काही काळासाठी बाह्य जगापासून दूर जातो. कामाचा ताण, घरच्या जबाबदाऱ्या, आर्थिक चिंता, अपेक्षा आणि तुलना—हे सगळं थोड्या वेळासाठी बाजूला राहतं. रंग निवडताना आणि रेषा काढताना लक्ष वर्तमान क्षणावर केंद्रित होतं. मन शांत होतं, श्वास स्थिर होतो. म्हणूनच चित्रकला नकळत ध्यानासारखी काम करते. यासाठी वयाची अट नसते, मात्र योग्य दिशा देणारा अभ्यासपूर्ण मार्गदर्शक महत्त्वाचा ठरतो.
आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर सोबत करणारी कला
लहान मुलांसाठी चित्रकला म्हणजे कल्पनाशक्तीला मोकळं आकाश. किशोरवयीन आणि तरुणांसाठी ती गोंधळलेल्या मनाला दिशा देते. प्रौढांसाठी तणाव कमी करणारी, तर वृद्धांसाठी आठवणी आणि अनुभव नव्या रंगात मांडणारी प्रक्रिया ठरते. म्हणजेच चित्रकला ही आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर सोबत करणारी कला आहे.
सुंदर की प्रामाणिक?
चित्रकलेत “हे सुंदर आहे का?” हा प्रश्न दुय्यम असतो. “हे माझं आहे का?” हा प्रश्न महत्त्वाचा असतो. इथे बरोबर–चूक अशी मोजमापं नसतात. असते ती फक्त प्रामाणिक अभिव्यक्ती. ही अभिव्यक्ती माणसाला अधिक संवेदनशील बनवते आणि नात्यांमध्येही त्याचा सकारात्मक परिणाम दिसतो.
आजच्या काळाची गरज
आजच्या धावपळीच्या आणि स्पर्धात्मक जीवनात मानसिक समतोल राखणं मोठं आव्हान आहे. अशा वेळी चित्रकला ही लक्झरी नसून गरज ठरते. ती औषध नाही, पण मनाला आधार देणारी आहे. प्रश्नांना थेट उत्तर देत नसली, तरी त्यांना सामोरे जाण्याची ताकद नक्की देते.
माणूस घडवणारी कला
चित्रकला कलाकार घडवते, हे खरं आहे. पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे ती संवेदनशील, जागरूक आणि समतोल माणूस घडवते. प्रत्येकाने व्यावसायिक कलाकार व्हावं, अशी अपेक्षा नाही; पण स्वतःशी संवाद साधण्यासाठी चित्रकलेचा अनुभव घेणं आज अत्यावश्यक आहे.
एकदा तरी कागद आणि रंग हातात घ्या…
म्हणूनच “चित्रकला माझ्यासाठी नाही” असं म्हणण्याआधी एकदा कागद आणि रंग हातात घ्या. काही मोठं निर्माण होईलच असं नाही, पण मन हलकं होईल, विचार स्पष्ट होतील आणि कदाचित स्वतःशी ओळख थोडी अधिक घट्ट होईल. आणि कधी कधी, एवढंच पुरेसं असतं—माणूस म्हणून थोडं अधिक समतोल जगण्यासाठी.
सुनिल शालिनी विष्णु रेडेकर
चित्रकार | कला मार्गदर्शक | कला संशोधक | समीक्षक
संस्थापक – द चितारी
संपर्क: ८२८६०३२९९९
ईमेल: sunilredekar@gmail.com -
Inside Ahan Shetty’s Intense Prep for Border 2: Military Training, 12-Hour Shoots and Extreme Heat

Military-Style Training for a Patriotic Role
Following the buzz around the recently unveiled teaser of the much-awaited patriotic film Border 2, Ahan Shetty has opened up about the intense physical preparation and military-style training he underwent for his role. Portraying a Navy officer in the film, the actor described the journey as both physically gruelling and deeply transformative, demanding complete mental and physical immersion.Training at NDA Khadakwasla: Authenticity Over Acting
Reflecting on the impact of filming at real locations, Ahan highlighted how shooting at NDA Khadakwasla in Pune reshaped his approach to the role. Training at the same grounds where real officers prepare left no room for pretence. According to him, posture, body language, and intensity had to feel instinctive, driven by the environment itself rather than performance alone.A Relentless Routine Across Multiple Locations
Ahan revealed that his preparation remained non-negotiable across all shooting locations, including Pune, Amritsar, Khopoli, and Mumbai. His daily routine consisted of rigorous strength training, sports like football and cricket to build agility and cardio endurance, and a strict recovery protocol. Ice baths, steam sessions, sauna, and red light therapy became essential tools to ensure his body could recover and consistently perform during demanding shoot schedules.Extreme Conditions and Tactical Challenges
Filming at actual military installations added another layer of difficulty to the process. Ahan spoke about facing real terrain, unpredictable weather, and the physical toll of tactical combat sequences. Shooting in 40-degree heat while carrying tactical gear during 12-hour-long shoot days pushed his endurance to the limit, making his training crucial to surviving and performing under such conditions.Stepping Into the Boots of a Navy Officer
In Border 2, Ahan Shetty is seen fully embodying the role of a Navy officer. The first-look poster released by the makers captures him in a high-intensity war zone, blood smeared across his face, eyes filled with resolve, and a heavy weapon in hand—signalling the film’s gritty scale and emotional intensity.A Legacy of Patriotism Continues
Presented by Gulshan Kumar, T-Series, and J.P. Dutta’s J.P. Films, Border 2 is backed by producers Bhushan Kumar, Krishan Kumar, J.P. Dutta, and Nidhi Dutta, and directed by Anurag Singh. Staying true to its legacy, the film honours the heroism and indomitable spirit of Indian soldiers, promising audiences a powerful journey of patriotism, courage, and sacrifice when it releases in cinemas on January 23, 2026. -
‘हमाल दे धमाल’च्या रम्य आठवणींना उजाळा

मराठी चित्रपट रसिकांच्या मनावर एकेकाळी राज्य केलेल्या ‘हमाल दे धमाल’ या अजरामर चित्रपटाच्या विशेष शोला रविवारी उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या निमित्ताने चित्रपटाच्या चित्रीकरणापासून ते प्रदर्शनानंतरच्या अनेक रम्य आठवणींना उजाळा मिळाला. विशेषतः लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आठवणींनी उपस्थित रसिक भावूक झाले.
स्मृतीदिनानिमित्त विशेष शो
सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळाच्या वतीने, दिवंगत कलाकार लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या स्मृतीदिनानिमित्त प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या लघुनाट्यगृहात ‘हमाल दे धमाल’ चित्रपटाचा विशेष शो आयोजित करण्यात आला होता.

पडद्यावर लक्षाची एन्ट्री, टाळ्यांचा कडकडाट
चित्रपट सुरू होताच पडद्यावर लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या एन्ट्रीला रसिकांनी जोरदार टाळ्यांनी दाद दिली. एकेकाळी प्रेक्षकांच्या हसण्यातून आणि प्रेमातून जिवंत राहिलेल्या या भूमिका आजही तितक्याच आपुलकीने स्वीकारल्या जात असल्याचं या क्षणी प्रकर्षाने जाणवलं.
कलाकारांच्या आठवणी आणि किस्से
या विशेष शोदरम्यान पुरुषोत्तम बेर्डे, विजय पाटकर, जयवंत वाडकर, समीर आठल्ये आणि चेतन दळवी यांची खास मुलाखत घेण्यात आली. या सर्वांनी चित्रपटाच्या चित्रीकरणातील आठवणी, लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबतचे अनुभव आणि काही मजेशीर किस्से रसिकांसमोर उलगडले. या संवादातून त्या काळातील मराठी चित्रपटसृष्टीचं एक जिवंत चित्र उभं राहिलं.
प्रिया बेर्डे यांची उपस्थिती

कार्यक्रमाला अभिनेत्री प्रिया बेर्डे यांची विशेष उपस्थिती लाभली. त्यांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण कार्यक्रमाला भावनिक आणि आपुलकीची किनार लाभली. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आठवणींना मानाचा मुजरा करण्याचा हा क्षण उपस्थितांसाठी खास ठरला.
प्रास्ताविक आणि स्वागत
चित्रनगरीचे सह व्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर यांनी मान्यवरांचे स्वागत करून कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यांनी अशा उपक्रमांमधून मराठी चित्रपटांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
लक्षाचा अभिनय कायम स्मरणात
चित्रपटाचे दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे यांनी मुलाखतीदरम्यान लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आठवणी सांगताना, ‘हमाल दे धमाल’ मधील त्यांची भूमिका ही त्यांच्या कारकिर्दीतील सर्वांत गाजलेल्या भूमिकांपैकी एक असल्याचं नमूद केलं. मराठी रसिकांनी त्यांच्यावर अपार प्रेम केलं असून त्यांचा अभिनय आजही प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहे आणि तो कायम राहील, असं त्यांनी भावनिक शब्दांत सांगितलं. विजय पाटकर आणि जयवंत वाडकर यांनीही आपापल्या आठवणी शेअर करत त्या सुवर्णकाळाला पुन्हा उजाळा दिला.
-
श्रेयस तळपदे आणि ॲफ्लुएन्स मोशन पिक्चर्स प्रा. लि. प्रस्तुत “मर्दिनी” चित्रपटाचा मुहूर्त शॉट संपन्न!

मंगल मुहूर्ताने ‘मर्दिनी’च्या प्रवासाला सुरुवात
श्री स्वामी समर्थ आणि गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने आगामी मराठी चित्रपट ‘मर्दिनी’चा मुहूर्त शॉट उत्साहात पार पडला. या मंगल क्षणासह चित्रपटाच्या निर्मिती प्रवासाला अधिकृत सुरुवात झाली असून, दमदार विषय आणि प्रभावी मांडणीसह ‘मर्दिनी’ प्रेक्षकांच्या भेटीस येण्यासाठी सज्ज होत आहे. श्रेयस तळपदे आणि ॲफ्लुएन्स मोशन पिक्चर्स प्रा. लि. प्रस्तुत हा चित्रपट मनोरंजनाच्या पलीकडे जाऊन प्रत्येक स्त्रीच्या सामर्थ्याची, सहनशक्तीची आणि अंतर्गत शक्तीची गाथा मांडणार आहे.स्त्रीशक्तीचा प्रभावी आशय
“प्रत्येक स्त्री ही मुळात मर्दिनी असते… वेळ आली की रूप दाखवते…” या विचाराभोवती फिरणारी ‘मर्दिनी’ची कथा समाजातल्या स्त्रीच्या संघर्षाला, तिच्या धैर्याला आणि तिच्या न लोपणाऱ्या ताकदीला अधोरेखित करते. भावनिक आणि वास्तवाशी जोडलेला हा विषय प्रेक्षकांना विचार करायला लावणारा ठरणार आहे.दमदार कलाकारांची भक्कम फळी
या चित्रपटात प्रार्थना बेहेरे, अभिजीत खांडकेकर, जितेंद्र जोशी आणि राजेश भोसले यांसारखे अनुभवी आणि लोकप्रिय कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. त्यांच्यासोबत बालकलाकार मायरा वैकुळचीही महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. अनुभवी कलाकारांची ताकद आणि नव्या पिढीची संवेदनशील उपस्थिती यामुळे ‘मर्दिनी’चा आशय अधिक प्रभावीपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे.दिग्दर्शनात अजय मयेकर यांचे पदार्पण
‘मर्दिनी’ या चित्रपटाच्या माध्यमातून अजय मयेकर चित्रपट दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहेत. त्यांच्या दिग्दर्शनातून स्त्रीशक्तीचा विषय वेगळ्या आणि प्रभावी शैलीत मांडला जाणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. चित्रपटाची निर्मिती दीप्ती तळपदे यांनी केली आहे.२०२६ मध्ये मोठ्या पडद्यावर
आशयघन कथा, दमदार कलाकार आणि सशक्त दिग्दर्शन यांच्या जोरावर ‘मर्दिनी’ हा चित्रपट २०२६ साली प्रेक्षकांच्या भेटीस मोठ्या पडद्यावर येणार असून, तो एक वेगळा आणि लक्षवेधी मराठी सिनेमॅटिक अनुभव ठरणार आहे.
