Home

  • The Real Reason Behind IPS Officers Visiting Aamir Khan’s Home

    A recent visit by IPS trainee officers to Bollywood superstar Aamir Khan’s residence sparked widespread speculation online. Now, the real reason behind their visit has finally come to light. According to a member of Aamir Khan’s team, “The IPS trainees from the current batch had expressed a desire to meet him, and Aamir graciously invited them to his home for a conversation.”

    Speculations Triggered by Viral Video

    A video clip of the officers arriving in a luxury bus and entering Aamir Khan’s apartment complex had quickly gone viral, giving rise to multiple theories. Some netizens assumed the visit was related to a secret film project involving high-level security. Others linked it to recent concerns surrounding the actor’s luxury car collection, which had reportedly caused concern within his team.

    Long-Standing Bond with IPS Trainees Since Sarfarosh

    This isn’t the first time Aamir Khan has interacted with future law enforcement officers. Ever since his acclaimed performance in the 1999 film Sarfarosh, which portrayed a principled police officer, many IPS trainees have wanted to meet him. Over the years, Aamir has regularly welcomed batches of young officers, making this a continued tradition.

    Successful Release of Sitaare Zameen Par

    On the professional front, Aamir Khan’s latest film Sitaare Zameen Par has received positive feedback from both critics and audiences. The actor has been busy organizing special screenings and interacting with fans and stakeholders. Sources suggest that a major announcement from Aamir Khan Productions may be on the horizon.

    Upcoming Projects: Coolie and a Lokesh Kanagaraj Film

    Aamir Khan’s acting calendar looks exciting. He is set to share screen space with superstar Rajinikanth in Coolie, and is also collaborating with celebrated filmmaker Lokesh Kanagaraj for an upcoming project. More details on both films are expected to be revealed soon.

  • आमिर खानच्या घरी पोहोचले IPS अधिकारी – खरे कारण आले समोर

    IPS प्रशिक्षु अधिकाऱ्यांनी आमिर खानची घेतली खास भेट

    बॉलिवूड अभिनेता आमिर खान यांच्या निवासस्थानी नुकतीच काही IPS प्रशिक्षु अधिकाऱ्यांची भेट झाली. या भेटीचं कारण अनेकांच्या कुतूहलाचं कारण ठरत असतानाच आता त्यामागील सत्य समोर आलं आहे. आमिर खान यांच्या टीममधील एका सदस्याने स्पष्ट केलं की, “या बॅचमधील IPS प्रशिक्षु अधिकारी आमिर खान यांची भेट घेण्याची इच्छा व्यक्त करत होते. त्यामुळे आमिर खान यांनी स्वतः त्यांना घरी बोलावलं आणि सुसंवाद साधला.”

    व्हिडिओ व्हायरल; चर्चांना मिळाला ऊत

    या भेटीचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामध्ये IPS अधिकारी एक आलिशान बसमधून उतरून आमिर खान यांच्या इमारतीत जाताना दिसत होते. त्यामुळे अनेक तर्कवितर्क रंगले – काहींनी अंदाज बांधला की, आमिर खान काही विशेष प्रोजेक्टवर काम करत असून त्यासाठी सुरक्षेची गरज आहे. त्यांच्या लक्झरी कार्सशी संबंधित चर्चांमुळेही काहीजणांनी वेगवेगळ्या गृहितकांना खतपाणी घातलं.

    ‘सर्फरोश’नंतर पोलिस अधिकाऱ्यांशी असलेली नाळ

    मात्र हे उघड झालं आहे की, आमिर खान गेल्या अनेक वर्षांपासून IPS प्रशिक्षु अधिकाऱ्यांच्या विविध बॅचेसना भेट देत आहेत. त्यांच्या सर्फरोश या चित्रपटामुळे पोलिस क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या अनेक अधिकाऱ्यांनी त्यांच्याशी संवाद साधण्याची इच्छा वेळोवेळी व्यक्त केली आहे. त्यांच्या भूमिकेने देशभरात पोलिसांविषयीचा दृष्टिकोन अधिक संवेदनशील झाला होता.

    ‘सितारे ज़मीन पर’च्या यशानंतर आगामी प्रोजेक्टकडे लक्ष

    आमिर खान यांचा अलीकडेच प्रदर्शित झालेला सितारे ज़मीन पर हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. सध्या ते या चित्रपटाच्या खास स्क्रीनिंग्सचे आयोजन करत आहेत. यासोबतच ‘आमिर खान प्रॉडक्शन्स’तर्फे लवकरच एक मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे.

    रजनीकांतसोबत ‘कुली’ आणि लोकेश कनगराजसोबत नवा चित्रपट

    अभिनयाच्या आघाडीवरही आमिर खान नव्या प्रकल्पांमध्ये व्यस्त आहेत. त्यांचा कुली नावाचा आगामी चित्रपट सुपरस्टार रजनीकांत यांच्यासोबत असून दोघंही पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत. याशिवाय, ते प्रसिद्ध दिग्दर्शक लोकेश कनगराज यांच्या आगामी सिनेमातही प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत.

  • मुरांबा मालिकेतल्या ७ वर्षांच्या लीपनंतर समोर आला रमाचा नवा लूक

    अक्षयपासून दुरावल्यानंतर रमाचं पाचगणीतील नवीन आयुष्य

    स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘मुरांबा’मध्ये आता एक नवा अध्याय सुरू झालाय. कथानकात सात वर्षांचा लीप आल्यानंतर रमा आणि अक्षय यांच्या नात्यात मोठा बदल झाला आहे. गैरसमजांमुळे रमा आणि अक्षय वेगळे झाले आणि अक्षयने आपल्या मुली आरोहीसोबत नव्या आयुष्याला सुरुवात केली. दुसरीकडे, रमा आता पाचगणीत नव्या ओळखीने जगू पाहते आहे.

    रमाचा नवा लूक – वेण्या कापलेल्या, आत्मविश्वास अधिक ठाम

    गेल्या अनेक भागांमध्ये रमाला प्रेक्षकांनी दोन वेण्यांमध्ये पाहिलं होतं. मात्र लीपनंतर रमाचा संपूर्ण लूक बदललेला आहे. तिने भूतकाळाला मागे टाकत दोन वेण्या कापून टाकल्या आहेत. आता ती पाचगणीतल्या सर्वात मोठ्या शाळेची ट्रस्टी आहे आणि तिच्या व्यक्तिमत्त्वात अधिक आत्मविश्वास झळकतो. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असलेली, स्वतंत्र निर्णय घेणारी आणि अधिक ठाम असणारी ही नवी रमा आता जगासमोर आहे.

    लेकीसाठीच रमाचं मन गोड राहिलं, पण तोंडात गोड नाही

    जरी रमा भूतकाळ मागे टाकण्याचा प्रयत्न करत असली, तरी आपल्या लेकीला ती विसरू शकलेली नाही. आपल्या लेकीला ‘बबडू’ असं प्रेमाचं नाव तिने दिलं आहे. तिच्यापासून दुरावल्यानंतर रमाने स्वतः गोड खाणं सोडलं आहे. ती इतरांना गोड खायला घालते, पण स्वतः काहीच गोड खात नाही – हे तिच्या अंतर्मनातील वेदना अधोरेखित करतं.

    पुढच्या भागांमध्ये काय घडणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष

    आता मालिकेच्या आगामी भागांमध्ये रमाची आणि तिच्या मुलीची भेट होणार का? रमा आणि अक्षय पुन्हा एकत्र येणार का? हे पाहणं प्रेक्षकांसाठी अत्यंत उत्सुकतेचं ठरणार आहे. तेव्हा नक्की पाहा ‘मुरांबा’ – दररोज दुपारी १.३० वाजता, फक्त स्टार प्रवाहवर.

  • ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर ‘नाफा जीवन गौरव – २०२५’ पुरस्काराने सन्मानित!

    अमेरिकेतील ‘नाफा फिल्म अवॉर्ड नाईट’चा भव्य सोहळा

    ‘नॉर्थ अमेरिकन फिल्म असोशिएशन’तर्फे देण्यात येणाऱ्या ‘नाफा जीवन गौरव पुरस्काराने’ यंदा ज्येष्ठ अभिनेते व दिग्दर्शक अमोल पालेकर यांना गौरवण्यात आले. हिंदी, मराठी, बंगाली, कन्नड आणि मल्याळम भाषांतील चित्रपटांत त्यांच्या प्रगल्भ अभिनयाने रसिकांच्या मनात घर केलेल्या पालेकरांचा गौरव अमेरिकेतील ‘द कॅलिफोर्निया थिएटर’, सॅन होजे येथे २५ जुलै रोजी संपन्न झाला. या दिमाखदार सोहळ्याला महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री ॲड. आशिष शेलार, नाफाचे संस्थापक अभिजीत घोलप आणि मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज उपस्थित होते.

    ‘हॉलिवूडमध्ये काम करण्याचे स्वप्न आता पूर्ण होईल’ – अमोल पालेकर

    पुरस्कार स्वीकारताना अमोल पालेकर म्हणाले, “गौरी देशपांडेच्या कथेनुसार मी एक मराठी सिनेमा बनवत होतो, ज्यात निकोल किडमन आणि अमिताभ बच्चन यांना घेण्याचा विचार होता. निकोलने पटकथेला होकार दिला होता, मात्र हॉलिवूड स्टुडिओच्या अटीमुळे तो प्रकल्प थांबला. त्या वेळी NAFAसारखी संस्था असती, तर तो सिनेमा पूर्ण झाला असता. आज NAFAच्या माध्यमातून हॉलिवूडमध्ये काम करण्याचे स्वप्न पूर्ण होईल अशी आशा आहे.”

    ‘अमोल पालेकर म्हणजे भारतीय सिनेमा विश्वातील जुबिलीस्टार’ – अभिजीत घोलप

    नाफाचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत घोलप म्हणाले, “पालेकर यांच्या सहजसुंदर अभिनयाने आणि हळुवार प्रेमळ भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनात कायमचे स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या सन्मानाने ‘नाफा’चा गौरव वाढला आहे.”

    अमोल पालेकर – अभिनय, दिग्दर्शन आणि चित्रकलेतील त्रिवेणी संगम

    पालेकर यांनी ‘सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट’मधून चित्रकलेचे शिक्षण घेतले. सुरुवातीला चित्रकार म्हणून काम करत असताना त्यांनी रंगभूमी आणि सिनेमात प्रवेश केला. ‘शांतता! कोर्ट चालू आहे’, ‘गोलमाल’, ‘छोटी सी बात’, ‘बातों बातों में’, ‘रजनीगंधा’, ‘धूसर’, ‘पहेली’, ‘अनाहत’, ‘ध्यासपर्व’ यांसारख्या चित्रपटांतील त्यांच्या भूमिका आजही आठवणीत राहतात.

    रेड कार्पेटवर झळकले मराठी सिनेविश्वातील तारे

    स्वप्नील जोशीने नव्या लूकमध्ये केलेली रेड कार्पेट एंट्री विशेष लक्षवेधी ठरली. त्यानंतर वैदेही परशुरामी, आदिनाथ कोठारे, अमोल पालेकर व संध्या गोखले, सोनाली कुलकर्णी (मुलीसह), अश्विनी भावे, सचिन खेडेकर, गजेंद्र अहिरे, महेश कोठारे, डॉ. मोहन आगाशे आणि मधुर भांडारकर यांच्यासह सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची उपस्थिती दिसून आली.

    गौरव, नृत्य आणि ‘बाई बाई मनमोराचा’ची धुन

    या रंगतदार सोहळ्यात मराठी लोकनृत्य सादर झाले. त्यानंतर कलाकारांना सन्मानचिन्हे देण्यात आली. अवधूत गुप्ते यांना ‘बाई बाई मनमोराचा’ आणि ‘आयुष्य हे’ या गाण्यांची विशेष फर्माइश करण्यात आली, ज्यावर प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली.

  • निवेदिता सराफ – गिरीश ओक पुन्हा एकत्र!

    ‘बिन लग्नाची गोष्ट’च्या नव्या मोशन पोस्टरने वाढवली उत्सुकता

    गॉडगिफ्ट एंटरटेनमेंट प्रा. लि. आणि एस. एन. प्रॉडक्शन्स निर्मित तसेच तेजश्री अडिगे आणि नितीन वैद्य प्रॉडक्शन प्रस्तुत ‘बिन लग्नाची गोष्ट’ या आगामी चित्रपटाचं मोशन पोस्टर नुकतंच सोशल मीडियावर प्रदर्शित झालं. याआधी प्रदर्शित झालेल्या प्रिया बापट आणि उमेश कामत यांच्या फ्रेश जोडीच्या पोस्टरने प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच वाढवली होती. त्याची चर्चा अजून थांबली नाही, तोच आता दुसऱ्या पोस्टरमधून निवेदिता सराफ आणि गिरीश ओक हे लोकप्रिय कलाकार एकत्र दिसले आहेत.

    मोशन पोस्टरमध्ये दिसलं एका हटके नात्याचं गुपित

    या मोशन पोस्टरमध्ये निवेदिता सराफ सोफ्यावर मुंडावळ्या घालून बसलेल्या दिसतात, पण चेहऱ्यावर नवरीसारखी लाज नाही, तर एक मिश्किल शांतता आहे. त्यांच्या मागे गिरीश ओक खुश चेहऱ्याने हात हलवत काहीतरी सांगत आहेत. हे दृश्य पाहून लगेच लक्षात येतं की हे पारंपरिक नवरा-बायकोसारखं जोडपं नाही, पण त्यांचं नातं मात्र अतिशय घट्ट आहे.

    नात्यांच्या नव्या व्याख्या सांगणारी कथा

    दिग्दर्शक आदित्य इंगळे सांगतात, “आजच्या तरुण पिढीला नात्यांबाबत प्रामाणिकपणा आणि स्पष्टता असली तरी लग्नाविषयी अजूनही गोंधळ आहे. काही नाती लग्नाच्या चौकटीत न बसता अधिक अर्थपूर्ण असतात. ‘बिन लग्नाची गोष्ट’ ही त्याचीच हलकीफुलकी पण अंतर्मुख करणारी मांडणी आहे.”

    गंमतीदार मांडणीतून वास्तवाचं प्रतिबिंब

    चित्रपटाचे निर्माते नितीन वैद्य म्हणतात, “आजची तरुणाई नात्यांकडे नव्या दृष्टीने पाहते. आम्ही हा दृष्टिकोन चित्रपटात जपताना त्याला हास्याचा आणि हृदयस्पर्शी संवादांचा हलकाफुलका स्पर्श दिला आहे. हे चित्रपट सगळ्या वयोगटातल्या प्रेक्षकांना नक्कीच भावेल.”

    चार दमदार कलाकारांची जादू एकत्र अनुभवायला मिळणार

    या चित्रपटात प्रिया बापट, उमेश कामत, निवेदिता सराफ आणि गिरीश ओक या चारही लोकप्रिय कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर सुनील बियानी, पवन मेहता आणि नितीन प्रकाश वैद्य या चित्रपटाचे निर्माते आहेत. प्रेक्षकांसाठी एक नवं नातं, नवी कहाणी लवकरच मोठ्या पडद्यावर उलगडणार आहे.

  • Ananya Panday Introduces a First-of-Its-Kind Kindness Curriculum in Schools

    Ananya Panday has taken a heartwarming step beyond the spotlight with her mental health initiative, So Positive. Teaming up with Slam Out Loud, she has launched India’s first dedicated Kindness Curriculum — a social-emotional learning (SEL) module aimed at cultivating empathy and emotional intelligence among school children.

    Nurturing Young Minds Through Empathy and Expression

    This newly launched curriculum goes beyond textbooks, focusing on building emotional strength, self-expression, and kindness as core values in students. By personally interacting with children and educators, Ananya aims to help children navigate their emotions, foster respect for others, and grow into more compassionate individuals.

    A National Movement Rooted in Kindness

    The program is designed to be implemented across schools in India, offering educators a structured way to integrate kindness into their classrooms. Ananya’s commitment to making mental health accessible and emotionally empowering continues to set new benchmarks for youth-driven social change.

    Kindness Becomes Action, Not Just a Word

    In a world often shaped by competition and comparison, Ananya’s Kindness Curriculum reminds us of the strength found in sensitivity. With this initiative, kindness is no longer an abstract virtue — it’s a practical, learnable life skill shaping India’s future generation.

  • “बेटी पढाओ”च्या प्रसाराबद्दल देवेंद्र फडणवीस यांचा आंतरराष्ट्रीय गौरव

    ‘लाडली बेटीयाँ’ चित्रपटाच्या माध्यमातून सामाजिक संदेश

    महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “बेटी बचाओ, बेटी पढाओ” या मोहिमेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. या उपक्रमातून प्रेरणा घेत “लाडली बेटीयाँ” हा हिंदी चॅरिटी चित्रपट तयार करण्यात आला आहे. या चित्रपटाची निर्मिती इरॉस इंटरनॅशनल मीडिया लिमिटेड, नेदरलँड येथील आरएफआय स्टुडिओ, नेपाळ फिल्म असोसिएशन आणि उत्तराखंड सरकार यांच्या संयुक्त सहकार्याने करण्यात आली असून, हा चित्रपट १५ ऑगस्ट २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे.

    आंतरराष्ट्रीय स्तरावर फडणवीस यांचा सन्मान

    या सामाजिक कार्याच्या गौरवार्थ, सुरिनाम देशात आयोजित समारंभात राष्ट्रपती चंद्रिका प्रसाद संतोखी यांच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना INSCR 2025 हा आंतरराष्ट्रीय विशेष गौरव सन्मान प्रदान करण्यात आला. त्यांच्या सामाजिक बांधिलकीची ही आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेली आहे.

    सुरेश धस आणि नवकिरण संस्थेचे अभिनंदन

    या सन्मानानंतर आमदार सुरेश धस यांनी नवकिरण संस्था, बीड जिल्हा पोलिस फाऊंडेशन आणि सुरिनाम प्रशासनाचे अभिनंदन केले. लवकरच आमदार सुरेश धस, नवकिरण संस्था पोलिस फाऊंडेशनचे सदस्य आणि श्री. राकेश गायकवाड यांच्या उपस्थितीत महाराष्ट्रात एक विशेष कार्यक्रम आयोजित करून या पुरस्काराचे औपचारिक वितरण केले जाणार आहे, अशी माहिती नवकिरण संस्था (फिल्म्स) पोलिस फाऊंडेशनतर्फे देण्यात आली.

  • दिलीप जाधव यांना मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाचा ‘नटवर्य केशवराव दाते पुरस्कार’ जाहीर

    रंगभूमीवरील अपूर्व कार्यासाठी दिलीप जाधव यांचा गौरव

    रंगभूमीवर महत्त्वाचे आणि वेगळ्या प्रकारचे काम करणाऱ्या व्यक्तींच्या योगदानाला मान्यता देण्यासाठी, मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या कलामंडळ शाखेतर्फे दरवर्षी ‘नटवर्य मामा पेंडसे पुरस्कृत नटवर्य केशवराव दाते पुरस्कार’ प्रदान केला जातो. यंदाचा हा सन्मान अष्टविनायक नाट्यनिर्मिती संस्थेचे संस्थापक आणि ज्येष्ठ नाट्यनिर्माते दिलीप जाधव यांना जाहीर झाला आहे.

    शारदा मंगल सभागृहात पुरस्कार सोहळा १ ऑगस्ट रोजी

    दिलीप जाधव यांनी गेली अनेक दशके रंगभूमीची सेवा केली आहे. या निःस्वार्थ समर्पणाची दखल घेत त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. पुरस्कार वितरणाचा सोहळा शुक्रवार, १ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ६ वाजता, शारदा मंगल सभागृहात पार पडणार आहे. ज्येष्ठ साहित्यिका आणि ग्रंथ संग्रहालयाच्या वार्षिकोत्सवाच्या अध्यक्षा मोनिका गजेंद्रगडकर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जाईल.

    दिलीप जाधव यांनी व्यक्त केली कृतज्ञता

    या पुरस्काराबद्दल दिलीप जाधव म्हणाले, “गेली ५३ वर्षे मी रंगभूमीची अखंड सेवा करत आहे. या काळात महाराष्ट्र शासन, झी गौरव, मटा सन्मान, आर्यन सन्मान यांसारख्या अनेक पुरस्कारांनी माझ्या नाटकांना गौरव मिळाला आहे. पण मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाचा हा पुरस्कार माझ्यासाठी विशेष महत्त्वाचा आहे.”

    रंगभूमी हीच खरी कर्मभूमी असल्याचा पुनःसंवेदन

    “या रंगभूमीवर माझे शिक्षण झालं, अनुभव मिळाला. नाट्यनिर्मिती संस्था, लेखक, दिग्दर्शक, कलावंत, तंत्रज्ञ, माझे मित्र आणि ग्रंथ संग्रहालयाची निवड समिती – या सर्वांचा मी ऋणी आहे. त्यांच्या पाठबळामुळेच आजचा सन्मान शक्य झाला. माझ्या हातून अजूनही रंगभूमीची सेवा होत राहील, हे मी वचन देतो,” अशी कृतज्ञ भावना दिलीप जाधव यांनी बोलून दाखवली.

  • ‘वॉर २’चा थरारक ट्रेलर प्रदर्शित – ऋतिक रोशन, एनटीआर आणि कियारा अडवाणी यांचा त्रिवेणी संगम

    या वर्षातील सर्वात मोठा अ‍ॅक्शनपट

    यश राज फिल्म्सने आज वर्षातील सर्वात मोठ्या आणि बहुप्रतिक्षित चित्रपट ‘वॉर २’ चा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. या चित्रपटात सुपरस्टार ऋतिक रोशन, एनटीआर जूनियर आणि कियारा अडवाणी प्रमुख भूमिकांमध्ये झळकणार आहेत. अ‍ॅक्शन आणि थरार यांची पराकाष्ठा दाखवणाऱ्या या ट्रेलरमुळे चित्रपटाविषयीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

    २५ जुलै रोजी कलाकारांच्या गौरवाच्या निमित्ताने ट्रेलर रिलीज

    भारतीय सिनेमातील दोन दिग्गज कलाकार – ऋतिक रोशन आणि एनटीआर – यांच्या २५ वर्षांच्या यशस्वी प्रवासाचा गौरव करण्यासाठी, २५ जुलै या खास दिवशी ‘वॉर २’ चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. चाहत्यांसाठी हा एक मेजवानी ठरतो आहे.

    वाईआरएफ स्पाय युनिव्हर्सचा भाग असलेला महत्त्वाचा चित्रपट

    ‘वॉर २’ हा यश राज फिल्म्सच्या ‘वाईआरएफ स्पाय युनिव्हर्स’मधील एक महत्त्वाचा भाग आहे. अयान मुखर्जी दिग्दर्शित या चित्रपटात दोन महाशक्तीशाली व्यक्तिरेखा एकमेकांविरुद्ध भिडणार असून ही लढत प्रेक्षकांच्या मनात खोलवर ठसणारी ठरणार आहे.

    कियारा अडवाणीची प्रभावी भूमिका

    या चित्रपटात कियारा अडवाणी एका महत्त्वाच्या आणि प्रभावी महिला भूमिकेत झळकणार आहे. तिची भूमिका चित्रपटाच्या कथेला एक वेगळी दिशा देणारी आहे, असे ट्रेलरमधून दिसून येते.

    १४ ऑगस्टपासून जगभरात प्रदर्शित होणार

    ‘वॉर २’ हा चित्रपट १४ ऑगस्ट रोजी हिंदी, तेलुगू आणि तमिळ भाषांमध्ये जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. अ‍ॅक्शनप्रेमी प्रेक्षकांसाठी ही एक पर्वणी ठरणार असून, भारतीय सिनेमाच्या जागतिक पातळीवरील प्रभावाची पुन्हा एकदा साक्ष मिळणार आहे.

  • ‘वेल डन आई’मध्ये विशाखा सुभेदारची धम्माल

    १४ नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात होणार प्रदर्शित

    शिकलेली किंवा अशिक्षीत, मॅाडर्न किंवा साधीभोळी, शांत किंवा तापट – कशीही असली तरी आई ही आई असते. निसर्गाने दिलेल्या पुनर्निमितीच्या वरदानामुळे आईला देवानंतरचं सर्वोच्च स्थान दिलं जातं. आजवर अनेक कवींनी आणि चित्रपट निर्मात्यांनी आईवर आधारित कलाकृती सादर केल्या, तरीही आईच्या प्रेमाची महती संपत नाही. आता त्याच भावनेला विनोदी बाज देणारा ‘वेल डन आई’ हा नवा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

    मोशन पोस्टर आणि प्रदर्शनाची घोषणा

    दीपाली प्रोडक्शन प्रस्तुत ‘वेल डन आई’ या चित्रपटाचे मोशन पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले. चित्रपट १४ नोव्हेंबर रोजी राज्यभरात प्रदर्शित होणार असून, पोस्टरमध्ये चाळीच्या पार्श्वभूमीवर थम्प-अप करणारी आईच्या रूपातील विशाखा सुभेदार लक्ष वेधून घेतात. ‘वेल डन आई’ या शीर्षक गीतासह हे पोस्टर सोशल मीडियावर चर्चेत आले आहे.

    विशाखा सुभेदारची आईच्या भूमिकेत धमाल

    ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम विनोद कलाकार विशाखा सुभेदार या चित्रपटात एका अशा आईची भूमिका साकारत आहेत, जी आपल्या मुलावर जीवापाड प्रेम करते. मुलाच्या सुखासाठी नवऱ्याशी आणि संपूर्ण जगाशी वैर घेणारी, खानावळीत काम करत संसार चालवणारी, लहानसहान व्यवसाय करणारी ही आई म्हणजे असंख्य सामान्य आईंचं प्रतिक आहे.

    कलाकार आणि तांत्रिक बाजूचा भक्कम संच

    या चित्रपटात विशाखा सुभेदारसोबत विजय निकम, आयुष पाटील, जयवंत वाडकर, सिमरन खेडेकर, बीना सिद्धार्थ, तन्वी धुरी, विपुल खंडाळे यांच्यासारखे अनुभवी कलाकार सहभागी आहेत. चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन शंकर अर्चना बापू धुलगुडे यांनी केले असून, निर्मिती सुधीर पाटील यांची आहे. छायांकन रंजीत साहू, संकलन निलेश गावंड, संगीत निशाद गोलांबरे, पार्श्वसंगीत ऍग्नेल रोमन, तर गीते संदीप गचांडे यांची आहेत.

    तांत्रिक टीमची भक्कम साथ

    कलादिग्दर्शन देवेंद्र तावडे, वेशभूषा प्रतिभा गायकवाड, रंगभूषा माधव म्हापणकर, केशभूषा मयुरी बस्तावडेकर, नृत्य दिग्दर्शन चिनी चेतन, सहदिग्दर्शन मानस रेडकर यांनी जबाबदारी सांभाळली आहे. पोस्ट प्रोडक्शन आय फोकस स्टुडिओ (विजय दिनेश) यांनी केलं असून, विज्युअल प्रमोशन प्रेमांकुर बोस यांचं आहे. चित्रपटाचं वितरण सिनेपोलीस करत आहे.

    आईच्या अस्सल प्रेमाची विनोदी मांडणी

    ‘वेल डन आई’ हा चित्रपट आईच्या अस्सल प्रेमाचा विनोदी आणि भावनिक अविष्कार असून, आईच्या संघर्षातलं हास्य आणि हळवेपण प्रेक्षकांच्या मनाला भिडणार आहे. १४ नोव्हेंबरला हा चित्रपट थिएटरमध्ये पाहायला विसरू नका!