
-
Who is the Real ‘Chatur’? Teaser of Ek Chatur Naar Unveiled

The much-anticipated comedy thriller Ek Chatur Naar has dropped its teaser, giving audiences a hilarious yet intriguing glimpse into the film. Starring Divya Khossla and Neil Nitin Mukesh, the teaser is every bit as chaotic, clever, and ‘chatur’ as promised.
A Teaser Full of Madness and Wit
The teaser introduces viewers to a world of charm, mind games, and comical misadventures. With Ravi Kishan’s playful voiceover adding to the fun, the teaser cleverly balances humour with suspense. Director Umesh Shukla’s vibrant storytelling sets the stage for a high-stakes game of wits, where nothing is what it seems and every character has secrets of their own.
Humour Meets Suspense
Packed with sharp humour, unexpected twists, and visually striking sequences, the first look keeps the audience entertained while building curiosity for what lies ahead. It promises a rollercoaster experience of laughter and surprises, perfectly blending comedy with thrilling elements.
Production and Release Details
Ek Chatur Naar is presented by T-Series and produced by Umesh Shukla, Ashish Wagh, and Zeeshan Ahmad under the Merry Go Round Studios banner. Directed by Umesh Shukla, the film stars Divya Khossla and Neil Nitin Mukesh in lead roles. The comedy thriller is all set to release in cinemas on 12th September 2025.
-
‘फकिरीयत’चा ट्रेलर आणि संगीत प्रकाशन सोहळा दिमाखात संपन्न

निष्ठावान शिष्या आणि सक्षम गुरुची गोष्ट सांगणाऱ्या ‘फकिरीयत’ या हिंदी चित्रपटाचा ट्रेलर आणि संगीत प्रकाशन सोहळा नुकताच मुंबईतील प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिरात मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्याला सुप्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल आणि अभिनेत्री-निर्मात्या मेधा मांजरेकर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. कलाकार-तंत्रज्ञ आणि मान्यवरांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली.
चित्रपटाची कथा आणि आध्यात्मिक आधार


‘फकिरीयत’ हा चित्रपट गुरूमाई माँ रुद्रात्मिका यांच्या आध्यात्मिक प्रवासावर आधारित आहे. महावतार बाबाजींच्या आदेशानुसार २०२४ मध्ये या चित्रपटाची निर्मिती सुरू झाली. या चित्रपटात महावतार बाबाजींसह श्री रामकृष्ण परमहंस, स्वामी समर्थ, शंकर महाराज, बाबा श्री कालभैरव, बाबा श्री भद्रबाहू, हेडाखान बाबा आणि माँ काली यांचे दर्शन घडणार आहे. क्रियायोग, मुद्रायोग, प्राणायाम आणि गुरु-शिष्य परंपरेची महती या चित्रपटाच्या कथेतून प्रकट होणार आहे.
निर्मिती आणि दिग्दर्शन टीम
भद्रबाहू डिव्हाइन क्रिएशन्स एलएलपीच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. दिग्दर्शनाची जबाबदारी संतोष मांजरेकर यांनी सांभाळली असून, या चित्रपटाद्वारे त्यांनी हिंदी सिनेसृष्टीत पाऊल ठेवले आहे. ‘चिरुट जलती है’ आणि ‘अध्यात्म एक विद्रोह, एक क्रांती’ या अनुजा जानवलेकर लिखित पुस्तकांवर कथा आधारित आहे. पटकथा अनिल पवार यांनी लिहिली असून संवाद अनुजा जानवलेकर आणि अनिल पवार यांनी एकत्रित लिहिले आहेत.
कलाकार आणि व्यक्तिरेखा
या चित्रपटात दीपा परब यांनी गुरूमाता साकारली आहे, तर इतर प्रमुख भूमिकांमध्ये उदय टिकेकर, संदेश जाधव, विनीत शर्मा, अक्षय वर्तक, नयन जाधव, अनीषा सबनीस आदींचा समावेश आहे. अभिनेता संतोष जुवेकर पाहुण्या भूमिकेत दिसणार आहे. दीपा परब यांनी साकारलेली भूमिका क्रियायोग आणि प्राणायामाबाबत जनजागृती करणारी आहे.
संगीत आणि तांत्रिक बाजू
संगीतकार प्रवीण कुंवर यांच्या सुरेल धूनांना गीतकार समृद्धी पवार यांच्या शब्दांची जोड मिळाली आहे. मनीष राजगिरे, मनोज मिश्रा, जसराज जोशी आणि नेहा राजपाल यांनी गायलेली गीते प्रेक्षकांना भावस्पर्शी ठरणार आहेत. संकलन निलेश गावंड यांनी केले असून, छायाचित्रण अजित रेड्डी यांनी केले आहे.
चित्रीकरण आणि विशेष ठिकाणं
‘फकिरीयत’चे काही चित्रीकरण काशी मणिकर्णिका आणि उत्तराखंड येथे करण्यात आले आहे. कुंभमेळ्याच्या काळात मणिकर्णिकावर चित्रीकरण करणे आव्हानात्मक होते, परंतु बाबाजींच्या कृपेने ते शक्य झाले. उत्तराखंडमधील दुर्गम स्थळांवरही चित्रीकरण झाले असून, तेथील निसर्गसौंदर्य चित्रपटात आकर्षण ठरणार आहे.
प्रदर्शनाची तारीख
‘फकिरीयत’ हा आध्यात्मिकता, भक्तीभाव आणि त्यागाची महती सांगणारा चित्रपट १९ सप्टेंबर २०२५ रोजी संपूर्ण भारतभर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाद्वारे क्रियायोगाचा दैवी संदेश आणि गुरु-शिष्य परंपरेची ओळख प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली जाणार आहे.
-
‘बिन लग्नाची गोष्ट’ने उलगडली नात्यांची नवीन परिभाषा

रंगतदार ट्रेलर प्रदर्शित
नात्यांचा गुंता, प्रेमाची गोडी आणि थोडीशी नोकझोक… हे सगळं सांगणारी ‘बिन लग्नाची गोष्ट’ ही गोड कथा आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांच्या उत्सुकतेला अधिकच उधाण आले आहे. या चित्रपटात रिअल लाईफ कपल प्रिया बापट आणि उमेश कामत परत एकदा रील लाईफमधून प्रेक्षकांना मोहवणार आहेत. दोघांची पडद्यावरची केमिस्ट्री यापूर्वीही प्रेक्षकांना भावली होती आणि त्यामुळेच आता या चित्रपटाबद्दलची उत्कंठा अधिक वाढलेली आहे.
कथेचा गाभा आणि ट्रेलरमधील झलक
ट्रेलरमध्ये कथा प्रिया, उमेश, निवेदिता सराफ आणि गिरीश ओक यांच्याभोवती फिरताना दिसते. प्रिया प्रेग्नन्ट असून, छोट्या-मोठ्या गोष्टींमुळे आणि कामाच्या व्यापामुळे तिच्या-उमेशमध्ये नोकझोक दाखवली आहे. अशा वेळी घरात मदतनीस म्हणून गिरीश ओक आणि निवेदिता सराफ दाखल होतात आणि खरी कथा रंग घेऊ लागते. प्रिया नाराज असल्याचे दाखवले आहे, तिच्या नाराजीमागचे कारण काय? गिरीश-निवेदिता कोणत्या अटी घालतात? आणि या चौघांच्या नात्यांचा हा प्रवास नेमका कुठे नेणार, याची उत्तरं प्रेक्षकांना चित्रपटगृहात मिळणार आहेत.
कलाकारांची रसायनशास्त्र आणि संवादांची ताकद

ट्रेलरमध्ये निवेदिता सराफ यांच्या पात्राच्या भूतकाळाची चाहूल दिली आहे. त्यात गिरीश ओक यांच्यासोबतची त्यांची अनोखी केमिस्ट्री, प्रिया-उमेश यांचा गोड संसार आणि या चौघांमधले संवाद, नात्यांतील गोड-तिखट प्रसंग प्रेक्षकांना भरपूर मनोरंजन देतील, हे ट्रेलरमधून स्पष्ट होतं.
दिग्दर्शक आदित्य इंगळे यांची दृष्टी
चित्रपटाबद्दल दिग्दर्शक आदित्य इंगळे म्हणाले, “एकदा प्रिया-उमेशच्या घरी गेलो असताना त्यांच्या वागण्यातली नैसर्गिकता आणि संवादातील सहजता बघून वाटलं, ही कथा त्यांच्याशिवाय दुसरं कोणी करू शकत नाही. त्यांनाही ही कल्पना आवडली आणि त्यांनी होकार दिला. तसेच निवेदिता ताई आणि गिरीश सरांची जोडी प्रेक्षकांना याआधीही आवडली आहे. त्यामुळे ही चौकडी एकदम परफेक्ट होती.”
ते पुढे म्हणाले, “हा चित्रपट फक्त नात्यांवर भाष्य करणारा नसून तो प्रत्येक प्रेक्षकाला स्वतःच्या आयुष्याशी जोडणारा आहे. नातं टिकवण्यासाठी परस्परांवरील विश्वास, मोकळेपणा आणि जिव्हाळा हाच पाया आहे. या कथेत प्रेक्षकांना हे सगळं अनुभवता येईल.”
निर्मात्यांचे मत
निर्माते नितीन वैद्य म्हणाले, *”हा चित्रपट मनोरंजनासोबतच नात्यांच्या बदलत्या परिभाषेवर विचार करायला लावणारा आहे. आजच्या पिढीचं राहणीमान, नात्यांची व्याख्या, त्यातील संघर्ष आणि गोडवा हे सगळं *‘बिन लग्नाची गोष्ट’मध्ये पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांनी हा चित्रपट नक्की पाहावा कारण तो हसवतो, विचार करायला लावतो आणि नात्यांची सुंदरता नव्याने दाखवतो.”
चित्रपटाची टीम आणि चित्रपट प्रदर्शित तारीख
गॉडगिफ्ट एंटरटेनमेंट प्रा. लि. आणि एस. एन. प्रॉडक्शन्स निर्मित ‘बिन लग्नाची गोष्ट’ १२ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. कथा समीर कुलकर्णी यांची असून दिग्दर्शन आदित्य इंगळे यांनी केलं आहे. प्रिया बापट, उमेश कामत, निवेदिता सराफ, गिरीश ओक, सुकन्या मोने आणि संजय मोने यांच्या दमदार अभिनयाने सजलेला हा चित्रपट प्रेक्षकांसाठी नात्यांची नवी सफर ठरणार आहे.
-
‘समर्थयोगी’ चित्रपटाचा भव्य मुहूर्त सोहळा संपन्न

१५ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ९ वाजता वसई येथील भुईगावातील स्वामी समर्थ मठात स्वयंभू प्रॉडक्शन निर्मित ‘समर्थयोगी’ या मराठी चित्रपटाचा मुहूर्त पार पडला. या सोहळ्याला मठाचे अधिपती श्री संदीप म्हात्रे, नितीन परुळेकर आणि अनंत नाईक यांच्या शुभहस्ते मुहूर्त क्लॅप देण्यात आला. या प्रसंगी उपस्थितांनी चित्रपटाला शुभेच्छा दिल्या आणि स्वामी समर्थ तसेच रसिक प्रेक्षकांचे आशीर्वाद कायम लाभोत अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
निर्मिती व दिग्दर्शनाची टीम
या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन चंद्रशेखर छबूबाई व्यंकटराव सांडवे यांनी केली असून, क्रिएटिव्ह दिग्दर्शनाची धुरा सुनील खेडेकर यांच्यावर आहे. प्रॉडक्शन कंट्रोलर म्हणून तन्मय सांडवे आणि सर्वेश सांडवे कार्यरत आहेत. सहनिर्मात्यांमध्ये प्रकाश राणे आणि विवेक पर्वते यांचा समावेश आहे. कथा प्रकाश राणे यांनी लिहिली असून पटकथा आणि संवाद कय्युम काझी यांनी दिले आहेत.
तांत्रिक चमू आणि कलावंत

सिनेमॅटोग्राफी रितेश पाटील यांची असून संकलन विघ्नेश वाळुंज यांचे आहे. लाईन प्रोड्युसर म्हणून सुधीर सोमवंशी काम पाहत आहेत. या चित्रपटात नामवंत कलाकारांचा सहभाग असून स्वामी समर्थांच्या भूमिकेत ज्येष्ठ अभिनेते अशोक कुलकर्णी झळकणार आहेत.
शूटिंगचे वेळापत्रक
चित्रपटाच्या पहिल्या शेड्युलमधील दोन दिवसांचे शूटिंग यशस्वीरित्या पूर्ण झाले असून पुढील शेड्युल सप्टेंबर महिन्यात पार पडणार आहे. या चित्रपटाची कथा अध्यात्म, श्रद्धा आणि समाजाला दिशा देणाऱ्या विचारांवर आधारित असून मराठी प्रेक्षकांसाठी एक आगळीवेगळी भेट ठरणार आहे.
-
‘शंकराचा बाळ आला’ – सूर, श्रद्धा आणि भावनांचा सुंदर संगम

वैशाली माडे यांच्या सुरेल आवाजातील भक्तीगीत
लवकरच श्री गणेशाचे आगमन होणार आहे आणि त्याआधीच गणेशभक्तांसाठी एक खास गाणं प्रदर्शित झालं आहे. पीसफुल बिट्स प्रॉडक्शन्स निर्मित आणि वैशाली माडे प्रस्तुत ‘शंकराचा बाळ आला’ या गाण्याला मंदार चोळकर यांनी काव्यरचना केली असून, वरुण लिखाते यांचे संगीत लाभले आहे. वैशाली माडे यांच्या भावपूर्ण गायकीतून या गाण्यात भक्तीभावाची झलक अनुभवायला मिळते.
गाण्यामागची कथा आणि भावविश्व
या गीतात फक्त सणाचा उत्साह नाही, तर एक हृदयस्पर्शी कथा आहे – सैनिक असलेल्या एका आईची. गणेशोत्सवासाठी घरी परतलेली ही आई बाप्पाची सेवा करून पुन्हा देशसेवेसाठी निघते. या कथेत भक्ती, कुटुंब आणि देशभक्ती यांचा अनोखा संगम दिसतो. गणेशोत्सवाच्या चैतन्यमय वातावरणासोबत देशसेवेचा संदेश देणारं हे गीत प्रेक्षकांच्या मनाला भिडणारं ठरतं.
कलाकारांची भावपूर्ण सादरीकरणं

गीतामध्ये योगिता चव्हाण यांच्या चेहऱ्यावरचे भाव, अभिजीत केळकर यांची उत्सवी ऊर्जा आणि आरव आयेरचा निरागस आनंद प्रेक्षकांना आपल्या घरच्या गणेशोत्सवाची आठवण करून देतो. ढोल-ताशांचा गजर, आरत्या, प्रसादाचा सुवास आणि फुलांची सजावट या सगळ्याचा मिलाफ गाण्यातून सजीव होतो.
दिग्दर्शक आणि गायिकेचे अनुभव

गायिका वैशाली माडे यांनी सांगितलं की, “गणेशभक्तीचा स्वर माझ्या गायकीचा नेहमीच महत्त्वाचा भाग राहिला आहे. हे गीत भक्तीभाव जागवणारं असून ऐकणाऱ्याला थेट गणेशोत्सवाच्या वातावरणात नेणारं आहे.”
दिग्दर्शक पराग सावंत यांनी सांगितलं की, “प्रत्येक फ्रेममध्ये आम्ही भक्तीभावाचा आत्मा पकडण्याचा प्रयत्न केला असून दृश्य, संगीत आणि भावना यांचा संगम प्रेक्षकांच्या मनाला भिडेल.” गायिका वैशाली माडे यांनीही सांगितलं की, “गणेशभक्तीचा स्वर माझ्या गायकीचा नेहमीच महत्त्वाचा भाग राहिला आहे. हे गीत भक्तीभाव जागवणारं असून ऐकणाऱ्याला थेट गणेशोत्सवाच्या वातावरणात नेणारं आहे.”
गणेशभक्तांसाठी भावनांची नवी भेट
‘शंकराचा बाळ आला’ हे गीत केवळ मनोरंजनासाठी नाही, तर भक्तीभाव जागवण्यासाठी आहे. यातून गणेशोत्सवाचा उत्साह, भक्तीची गोडी आणि देशभक्तीचा संदेश एकत्रितपणे प्रकट होतो. हे गीत गणेशोत्सवात भक्तांच्या मनात दीर्घकाळ गुंजत राहील.
-
अभिनेत्री नक्षत्रा मेढेकरला १२व्या गोवा राज्य चित्रपट महोत्सवात विशेष सन्मान

‘मोग’ चित्रपटासाठी बेस्ट अॅक्ट्रेस ज्युरी पुरस्कार
मराठी मालिकांमधून घराघरात पोहोचलेली आणि काही काळ ब्रेक घेतल्यानंतर पुनरागमन केलेली अभिनेत्री नक्षत्रा मेढेकर पुन्हा चर्चेत आली आहे. नुकत्याच पार पडलेल्या १२व्या गोवा राज्य चित्रपट महोत्सवात (२०२२–२३) तिच्या मोग या कोंकणी चित्रपटासाठी तिला ‘बेस्ट अॅक्ट्रेस’चा विशेष ज्युरी पुरस्कार जाहीर झाला.चित्रपटातील व्यक्तिरेखा आणि तयारी
जोजो डिसुझा दिग्दर्शित मोग हा प्रेम, संघर्ष आणि मानवी नात्यांचा वेध घेणारा चित्रपट आहे. यात नक्षत्राने साकारलेली सेलिना ही साधी पण भावनिक गुंतागुंतीत अडकलेली व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली. या भूमिकेसाठी नक्षत्राने शून्यापासून कोंकणी भाषा शिकली, स्थानिक बोली आत्मसात केली आणि उच्चारांवर मेहनत घेतली. तिच्या या प्रामाणिक तयारीमुळे व्यक्तिरेखेला वास्तवाचा स्पर्श मिळाला आणि ज्युरींनी तिच्या अभिनयाला विशेष दाद दिली.
चित्रपटाला मिळालेला सन्मान
मोग चित्रपटाला या महोत्सवात एकूण ८ पुरस्कार मिळाले, ज्यात सर्वोत्कृष्ट कोंकणी चित्रपट हा मानाचाही समावेश आहे. पणजीतील कला अकादमी येथे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत या सोहळ्याचा समारोप झाला. गोवा राज्य चित्रपट महोत्सव हा स्थानिक चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च सन्मान मानला जातो.नक्षत्राचा अभिनय प्रवास
नक्षत्राचा प्रवास मालिकांपासून मोठ्या पडद्यापर्यंत गेला आहे. माझीया माहेरामधील पल्लवी, लेक माझी लाडकीमधील सानिका, सुर राहू देमधील आरोही, चंद्र आहे साक्षीलामधील सुमन काळे या भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहिल्या. तर फत्तेशिकस्तमधील बहू बेगम, प्रीतममधील सुवर्ण, तसेच सापळा, मुक्ताई आणि अलीकडील ऑल इज वेलमधील भूमिकांनी तिच्या कारकिर्दीला वेगळं स्थान मिळवलं.नक्षत्राची भावना
पुरस्कार स्वीकारताना नक्षत्रा म्हणाली :
“हा सन्मान माझ्यासाठी फक्त पुरस्कार नाही, तर नव्या प्रवासाची सुरुवात आहे. मोगसाठी घेतलेली मेहनत आणि प्रामाणिक प्रयत्न यांची दखल मिळणं हा मोठा आनंद आहे. हा पुरस्कार मला आणखी जबाबदारी देतो — दर्जेदार, प्रेक्षकांच्या मनात ठसतील अशा भूमिका साकारत राहण्याची. मग ते टीव्ही, वेब सिरीज किंवा चित्रपट असो — मी प्रत्येक माध्यमासाठी तयार आहे.”
पुढील कामाविषयी उत्सुकता
या सन्मानामुळे नक्षत्रा मेढेकरचं पुनरागमन अधिक प्रभावी झालं असून प्रेक्षक तिच्या आगामी प्रकल्पांची आतुरतेने वाट पाहत आहेत. -
‘दशावतार’ चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित

पोस्टर, गाण्यानंतर ट्रेलरने वाढवली उत्सुकता
‘दशावतार’ चित्रपटाचं पोस्टर, पहिला लूक आणि “आवशीचो घो” गाणं यामुळे आधीच प्रेक्षकांमध्ये उत्कंठा निर्माण झाली होती. आता नुकत्याच झालेल्या शानदार समारंभात या चित्रपटाचा भव्य ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. झी स्टुडिओज प्रस्तुत, ओशन फिल्म कंपनी आणि ओशन आर्ट हाऊस निर्मित ‘दशावतार’ मराठी चित्रपटसृष्टीत नवा झळाळी आणणारा ठरणार आहे.कोकणातून आलेली प्रेरणा
महाराष्ट्रातील कोकणात गणेशोत्सव आणि दशावतार या दोन्ही परंपरांना सारखंच महत्त्व आहे. या परंपरेतून प्रेरित झालेल्या ‘दशावतार’चा प्रवास १२ सप्टेंबरपासून मोठ्या पडद्यावर सुरू होतोय.दिग्गज कलाकारांची फौज
या मल्टीस्टारर चित्रपटात दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, भरत जाधव, सिद्धार्थ मेनन, अभिनय बेर्डे, प्रियदर्शिनी इंदलकर अशा अनेक दिग्गज कलाकारांचा समावेश आहे. याशिवाय विजय केंकरे, सुनील तावडे, रवी काळे, लोकेश मित्तल आणि आरती वडगबाळकर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.कथा आणि आशय

‘दशावतार’मध्ये कोकणातील इरसाल माणसं, त्यांच्या प्रथा, परंपरा, समृद्ध निसर्गवैभव आणि दशावतारी नाट्यकला यांचा अनोखा संगम पाहायला मिळतो. कलासक्त वृद्ध बाबुली मेस्त्रीच्या आयुष्यातील संघर्ष आणि भावनांचा प्रवास या कथेतून उलगडतो.
दिग्दर्शकाची नवी झेप
‘तुझ्यात जीव रंगला’, ‘भागो मोहन प्यारे’, ‘माझा होशील ना’, ‘कमळी’ यांसारख्या मालिकांमध्ये आणि ‘संदूक’, ‘हापूस’ चित्रपटांमध्ये लेखन केलेले सुबोध खानोलकर यांनी प्रथमच दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. कथा-पटकथा लेखनासोबत संवाद आणि गीतलेखन गुरु ठाकूर यांनी केलं असून संगीत ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांचं आहे.
निर्मितीमागची ताकद
या चित्रपटाचे निर्माते सुजय हांडे, ओंकार काटे, अशोक हांडे, आदित्य जोशी, नितिन सहस्त्रबुद्धे, मृणाल सहस्त्रबुद्धे, संजय दुबे आणि विनायक जोशी आहेत. अजित भुरे हे चित्रपटाचे सृजनात्मक निर्माते आहेत.झी स्टुडिओजचा विश्वास
झी स्टुडिओ मराठीचे व्यवसाय प्रमुख बवेश जानवलेकर यांनी सांगितलं की, ‘दशावतार’ हा नवा विचार आणि ताज्या दमाची टीम घेऊन आलेला चित्रपट आहे. त्याच्या ट्रेलरमधूनच त्याचा भव्यपणा आणि वेगळेपणा जाणवतो.👉 हा चित्रपट १२ सप्टेंबरपासून महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार असून प्रेक्षकांना भव्य तांत्रिकदृष्ट्या आणि भावनिक दृष्ट्या समृद्ध अनुभव देणार आहे.
-
सबसे कातील गौतमी पाटीलचं ‘राणी एक नंबर’ गाणं प्रदर्शित

पिवोट म्युझिक प्रस्तुत भन्नाट गाणं
पिवोट म्युझिक प्रस्तुत ‘राणी एक नंबर’ हे भन्नाट गाणं नुकतंच प्रदर्शित झालं असून सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय ठरत आहे. बॉलिवूड स्टाईल आणि ग्राफिक्सचा वापर करून तयार झालेलं हे गाणं प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत आहे. गायिका सोनाली सोनवणे हिने आपल्या सुमधूर आवाजात गाण्याला जिवंत केलं आहे, तर गौतमी पाटील हिच्या अदांनी गाण्याला वेगळीच रंगत आणली आहे.निर्मिती आणि सादरीकरण
या गाण्याचे बोल रोहन साखरे यांनी लिहिले असून, दिग्दर्शनाची धुरा कैलाश पवार यांनी सांभाळली आहे. प्रसिद्ध संगीतकार मोहन उपासनी यांनी संगीत दिलं असून, संगीत नियोजन मोहन उपासनी आणि संकेत गुरव यांनी केलं आहे. गाण्याची कोरिओग्राफी गोपी बैरागी आणि निलेश भोर यांनी केली असून, प्रोजेक्ट हेड विनया सावंत आहेत. गाण्याची पब्लिसिटी फॉरेवर पीआर या कंपनीमार्फत केली जात आहे.गौतमी पाटीलची प्रतिक्रिया

गाण्याबाबत बोलताना गौतमी पाटील म्हणाली, “या गाण्याच्या नावातच ‘राणी एक नंबर’ आहे, त्यामुळे गाणंही एक नंबरचं असणार हे तुम्हाला कळालंच असेल. मला या गाण्याच्या शूटदरम्यान खूप मजा आली. मला खात्री आहे की प्रेक्षक नक्कीच या गाण्यावर थिरकतील. मी पिवोट म्युझिक आणि संगीतकार मोहन उपासनी यांची आभारी आहे.”
सोनाली सोनवणेची अनुभवकथन
गायिका सोनाली सोनवणे म्हणाली, “‘राणी एक नंबर’ हे कम्प्लीटली फीमेल सेंट्रिक गाणं आहे. एक आत्मविश्वासू मुलगी काय बोलेल याचा विचार करून मी हरकती घेतल्या. गाणं गाताना मला खूप मजा आली आणि प्रेक्षकांचा मिळणारा सुंदर प्रतिसाद पाहून आनंद वाटतो.”
संगीतकार मोहन उपासनी यांचे मत
संगीतकार मोहन उपासनी म्हणाले, “एक नंबर हा शब्द डोक्यात घोळत होता आणि त्यावरच हे गाणं बनवलं. आज या गाण्याला प्रेक्षकांचा अप्रतिम प्रतिसाद मिळतोय. ‘राणी एक नंबर’ इंस्टाग्रामवर ट्रेंडिंगमध्ये असून, पिवोट म्युझिक नेहमीच उत्तम गाणी घेऊन येईल.” -
शिकण्याचं स्वातंत्र्य, स्वप्न पाहण्याचं स्वातंत्र्य – भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणाची ताकद

स्वातंत्र्य दिनाची खरी जाणीव
स्वातंत्र्य दिन हा आपल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाची आणि त्यागातून मिळालेल्या स्वातंत्र्याची आठवण करून देणारा विशेष दिवस आहे. मात्र राजकीय स्वातंत्र्यासोबतच शिकण्याचं, विचार करण्याचं आणि स्वप्न पाहण्याचं स्वातंत्र्य हेच राष्ट्राच्या प्रगतीचं खरं बळ आहे. हे बळ फक्त शिक्षणातूनच मिळतं. नेल्सन मंडेला यांनी म्हटले आहे, “शिक्षण हे जग बदलण्यासाठीचं सर्वात प्रभावी शस्त्र आहे.” मुलांना जेव्हा शोध घेण्याची, प्रश्न विचारण्याची आणि स्वतःला मोकळेपणाने व्यक्त करण्याची संधी मिळते, तेव्हा ते अज्ञानाच्या बंधनातून मुक्त होऊन उद्याचे नेते, नवकल्पक आणि जागतिक नागरिक बनतात.
शाळा – स्वातंत्र्याचा पाया
गोपी बिर्ला मेमोरियल स्कूलमध्ये आम्ही शाळेला केवळ अभ्यासाचं ठिकाण न मानता, स्वातंत्र्याचा पाया मानतो. येथे विद्यार्थी नवीन कल्पना करण्याचं, स्वतःचा दृष्टिकोन विकसित करण्याचं आणि समाजाशी निगडित विचार करण्याचं शिक्षण घेतात. महात्मा गांधीजींचं वचन “जणू तुम्ही सदैव जगणार आहात, अशा प्रकारे शिका” हे आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. खरं स्वातंत्र्य म्हणजे प्रत्येक मुलाला, त्याच्या घरची परिस्थिती कशीही असो, दर्जेदार शिक्षण मिळणं. मलाला युसुफझाई म्हणते, “एक मूल, एक शिक्षक, एक पुस्तक आणि एक पेन जग बदलू शकतात.” हीच आमच्या कामाची दिशा आहे.
समान संधी आणि जबाबदारी
शिक्षणाचा खरा उद्देश केवळ अभ्यासक्रम पूर्ण करणं नाही, तर विद्यार्थ्यांच्या मनात सहानुभूती, सामाजिक जाण, आणि नेतृत्वगुण विकसित करणं हा आहे. स्वातंत्र्यासोबत जबाबदारीही येते. विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच लोकशाही मूल्यांची जाणीव करून दिली, तर ते पुढे जाऊन समाजात सकारात्मक बदल घडवू शकतात.
उज्ज्वल भविष्यासाठीचा संकल्प
या स्वातंत्र्य दिनी आपण प्रत्येक मुलाला शिकण्याचं, विचार करण्याचं आणि स्वप्न पाहण्याचं स्वातंत्र्य देण्याचा संकल्प करूया. शिक्षणाच्या बळावर आपण व्यक्तीचं, समाजाचं आणि अख्ख्या राष्ट्राचं भविष्य बदलू शकतो. सर्वसमावेशक, प्रगत आणि संवेदनशील भारत घडवण्यासाठी हीच खरी गुरुकिल्ली आहे.
-
‘कढीपत्ता’ – हृदयस्पर्शी प्रेमकथा ७ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

आजवर अनेक प्रेमकथांनी प्रेक्षकांच्या मनावर जादू केली आहे, मात्र ‘कढीपत्ता’ हा चित्रपट त्या सर्वांपेक्षा वेगळा ठरणार आहे. A Bittersweet Love Story या टॅगलाईनसह हा चित्रपट तरुणाईच्या भावना, नातेसंबंधातील गुंतागुंत आणि वास्तवाशी भिडणारे क्षण या सर्वांचा संगम मांडणार आहे. निसर्गरम्य पार्श्वभूमी, भावनिक ओघ आणि संगीताची मोहिनी यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांना एका वेगळ्या भावविश्वात घेऊन जाणार आहे.
निर्मिती आणि दिग्दर्शनातील पदार्पण
युवान प्रोडक्शनच्या बॅनरखाली निर्माते स्वप्नील युवराज मराठे आणि दिग्दर्शक विश्वा यांचा हा पहिलाच चित्रपट आहे. कथा लेखन आणि दिग्दर्शनाची जबाबदारी विश्वा यांनी सांभाळली असून, पहिल्याच प्रयत्नात त्यांनी एक आशयघन, संगीतप्रधान प्रेमकथा उभी केली आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या मोशन पोस्टरमध्ये नायक-नायिकेची जोडी निसर्गरम्य पार्श्वभूमीवर दिसते, मात्र नायिकेचा चेहरा अद्याप गुप्त ठेवण्यात आला आहे. तिचा पाठमोरा लूक आणि संवाद — “कढीपत्त्याचे गुणधर्म कायम राहतात, उपयोग क्षणभंगुर असतो” — प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवतो.
कलाकारांची मांदियाळी
चित्रपटात नायकाच्या भूमिकेत भूषण पाटील झळकणार असून, त्याच्यासोबत अक्षय टांकसाळे, संजय मोने, शुभांगी गोखले, गार्गी फुले, आनंदा कारेकर, गौरी सुखटणकर आदी कलाकार आहेत. विशेष पाहुण्या कलाकार म्हणून आनंद इंगळे आणि चेतना भट यांच्या भूमिका चित्रपटाला रंगतदार वळण देणार आहेत. अनुभवी आणि तरुण कलाकारांचा हा संगम ‘कढीपत्ता’च्या कथानकाला अधिक प्रभावीपणे साकारेल.
संगीताची मोहिनी
संगीत हा या चित्रपटाचा गाभा असून, प्रेक्षकांना भावविश्वात गुंतवून ठेवणारी मोहिनी त्यात आहे. गीतकार मंदार चोळकर, मुकुंद भालेराव आणि विनू सांगवान यांनी लिहिलेल्या गीतांना संगीतकार पद्मनाभ गायकवाड आणि आशिष खांडल यांनी सुरेल बांधणी दिली आहे. या गीतांना रोहित राऊत, पद्मनाभ गायकवाड, अनन्या वाडकर, साज भट्ट आणि प्रियांशी श्रीवास्तवा यांच्या गोड स्वरांची जादू लाभली आहे. पार्श्वसंगीताची जबाबदारी तन्मय भिडे यांनी पार पाडली असून, कथा आणि भावनांचा परिणाम अधिक प्रभावी केला आहे. चित्रपटाचे संकलन ऋषीराज जोशी यांनी कुशलतेने केले आहे.
दिग्दर्शक आणि निर्मात्यांचे विचार
दिग्दर्शक विश्वा यांच्या मते, ‘कढीपत्ता’ ही आजच्या पिढीच्या विचारविश्वाला साजेशी असून, ती प्रेक्षकांच्या मनाच्या गाभ्याला भिडेल. निर्माते स्वप्नील मराठे यांच्या म्हणण्यानुसार, पदार्पणातच भावनिकतेचा आणि संगीताचा संगम असलेली निर्मिती करण्याचा आनंद त्यांना लाभला आहे.
प्रदर्शनाची तारीख
‘कढीपत्ता’ संपूर्ण महाराष्ट्रात ७ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रदर्शित होणार असून, प्रेक्षकांना एक वेगळ्या वाटेवरील, हृदयाला भिडणारी प्रेमकथा अनुभवता येईल.
